शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

साहित्य जगायला शिकविते, दु:ख कागदावर मांडल तर मन हलकं होत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 12:33 IST

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त नवनाथ गोरे : ‘फेसाटी’ने आपुलकीची माणसं दिली, चिंतन, वाचन आणि निरीक्षण असले तर तुमचे लिखाण सर्वोत्कृष्ट

आनंद सुरवाडेजळगाव : साहित्य हे जगायला शिकविते, दु:ख हे कागदावर मांडल तर मन हलक होतं, तुम्ही मोकळे होतात़ ‘फेसाटी’मुळे या सर्व गोष्टी अनुभवायला मिळाल्या व आपुलकीची माणसं भेटत गेली, असे सांगत लवकरच आणखी एक उत्कृष्ट कादंबरी घेऊन येणार असल्याची माहिती साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ‘फेसाटी’कर नवनाथ गोरे यांनी दिली़ जळगावात आला असता त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.प्रश्न - फेसाटी कादंबरीने आयुष्य किती बदललं ?नवनाथ गोरे- विद्यार्थी दशेपासून जगण्याची धडपड सुरू होती़ एटीएमवर जॉब केला़ गवंडी काम केले़ उपसमारीचे चटके सहन केले़ आई वडीलांना नेहमी वाटायचे मुलगा शिकावा व सरकारी नोकरी मिळावी, मात्र शिक्षणाचे वातावारण नसल्याने शाळेत कधी चित्त लागले नाही़ पडत-धडपडत बारावी, पदवी घेतली़लिहिण्याची सवय जडली...मात्र, आजुबाजूचं आयुष्य, दुष्काळाचे चटके, ते सहन करून जगणारी माणसं हे सर्व वास्तव अगदी भयावह होतं़ लिहिण्याची सवय जडल्यापासून छोट्या छोट्या कथा लिहित असताना हे वास्तव कागदावर उतरविण्याचे ठरविले व ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने ते कागदावर बोलीभाषेतच मांडले़ एमएच्या द्वितीय वर्षाला असताना २०१३ मध्ये फेसाटी कादंबरी लिहून पूर्ण झाली़ती रणधीर शिंदे यांच्याकडे घेऊन गेलो, प्रकाशकांकडे पाठविली़ मात्र, कोणाचेही उत्तर येत नव्हते़ अखेर २५ आॅगस्ट २०१७ मध्ये साहित्य संस्कृती मंडळाने ती प्रकाशित केली़ या कादंबरीला जवळपास ३० पुरस्कार मिळाले व २२ जून २०१८ रोजी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला़आणि ओळख मिळालीत्यानंतर एक ओळख मिळाली़ आपुलकीची माणसं मिळाली व आई-वडिलांच्या चेहऱ्यावर हसू फुलले व लिहिण्याची एक उमेद, एक नवा आत्मविश्वास मिळाला़वाचनापासून लोक दूर जात आहेत का?अस वाटतं नाही़ तुम्ही वाचकांच्या हाती काही उत्कृष्ट दिलं तर ते वाचतातच, लेखक बनायचं असेल तर आधी वाचक व्हावे लागते. तुमच लिखाण हे कुणाच्या प्रभावाखाली नको व बनावटी नको, वास्तव, प्रामाणिकपणा हा असला तर ते वाचायला भरपूर वाचक आहेत़ माध्यमं बदलली आहेत, वाचन संस्कृतीला चांगले दिवस आहेत़ नव लेखकांनी महाविद्यालयाच्या व्यासपीठाचा आपल्या कलेच्या सादरीकरणासाठी पुरेपूर उपयोग करावा, गाव, शहर हा भेद राहिलेला नाही़ लिहितांना दूरदृष्टी, सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही दृष्टीकोनातून कुठल्याही घटनेला प्रसंग पाहण्याचा दृष्टीकोन हवा. चिंतन, निरीक्षण, वाचन असलं तर तुमचं लिखाण उत्कृष्ट होतचं.पुरस्कार मिळाल्यानंतर लिखाणात काय बदल हवा ?पुरस्काराची कल्पना नव्हती़ जे होतं ते बोलीभाषेत मांडले, ते वाचकांनी स्वीकारले. मात्र, एखादी चांगली कलाकृती समोर ठेवल्यानंतर सहाजिकच तुमच्याकडून अपेक्षा वाढतात व तुमची जबादारीही. फेसाटीनंतर एक मॅच्युरिटी आली़ मात्र, फेसाटीनंतर खरे विषय सुरू झाले आहेत़ फेसाटी लिहून संपलेले नाही, मी जोपर्यंत आहे, तो पर्यंत प्रश्न संपणार नाही, रोज काहीना काही घडत असते. त्यामुळे लिहीत राहणार, विचार मांडत राहणाऱ एका चित्रपटाची प्रक्रिया सुरू असून लवकरच त्यावर काम होणार आहे़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव