शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य जगायला शिकविते, दु:ख कागदावर मांडल तर मन हलकं होत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 12:33 IST

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त नवनाथ गोरे : ‘फेसाटी’ने आपुलकीची माणसं दिली, चिंतन, वाचन आणि निरीक्षण असले तर तुमचे लिखाण सर्वोत्कृष्ट

आनंद सुरवाडेजळगाव : साहित्य हे जगायला शिकविते, दु:ख हे कागदावर मांडल तर मन हलक होतं, तुम्ही मोकळे होतात़ ‘फेसाटी’मुळे या सर्व गोष्टी अनुभवायला मिळाल्या व आपुलकीची माणसं भेटत गेली, असे सांगत लवकरच आणखी एक उत्कृष्ट कादंबरी घेऊन येणार असल्याची माहिती साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ‘फेसाटी’कर नवनाथ गोरे यांनी दिली़ जळगावात आला असता त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.प्रश्न - फेसाटी कादंबरीने आयुष्य किती बदललं ?नवनाथ गोरे- विद्यार्थी दशेपासून जगण्याची धडपड सुरू होती़ एटीएमवर जॉब केला़ गवंडी काम केले़ उपसमारीचे चटके सहन केले़ आई वडीलांना नेहमी वाटायचे मुलगा शिकावा व सरकारी नोकरी मिळावी, मात्र शिक्षणाचे वातावारण नसल्याने शाळेत कधी चित्त लागले नाही़ पडत-धडपडत बारावी, पदवी घेतली़लिहिण्याची सवय जडली...मात्र, आजुबाजूचं आयुष्य, दुष्काळाचे चटके, ते सहन करून जगणारी माणसं हे सर्व वास्तव अगदी भयावह होतं़ लिहिण्याची सवय जडल्यापासून छोट्या छोट्या कथा लिहित असताना हे वास्तव कागदावर उतरविण्याचे ठरविले व ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने ते कागदावर बोलीभाषेतच मांडले़ एमएच्या द्वितीय वर्षाला असताना २०१३ मध्ये फेसाटी कादंबरी लिहून पूर्ण झाली़ती रणधीर शिंदे यांच्याकडे घेऊन गेलो, प्रकाशकांकडे पाठविली़ मात्र, कोणाचेही उत्तर येत नव्हते़ अखेर २५ आॅगस्ट २०१७ मध्ये साहित्य संस्कृती मंडळाने ती प्रकाशित केली़ या कादंबरीला जवळपास ३० पुरस्कार मिळाले व २२ जून २०१८ रोजी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला़आणि ओळख मिळालीत्यानंतर एक ओळख मिळाली़ आपुलकीची माणसं मिळाली व आई-वडिलांच्या चेहऱ्यावर हसू फुलले व लिहिण्याची एक उमेद, एक नवा आत्मविश्वास मिळाला़वाचनापासून लोक दूर जात आहेत का?अस वाटतं नाही़ तुम्ही वाचकांच्या हाती काही उत्कृष्ट दिलं तर ते वाचतातच, लेखक बनायचं असेल तर आधी वाचक व्हावे लागते. तुमच लिखाण हे कुणाच्या प्रभावाखाली नको व बनावटी नको, वास्तव, प्रामाणिकपणा हा असला तर ते वाचायला भरपूर वाचक आहेत़ माध्यमं बदलली आहेत, वाचन संस्कृतीला चांगले दिवस आहेत़ नव लेखकांनी महाविद्यालयाच्या व्यासपीठाचा आपल्या कलेच्या सादरीकरणासाठी पुरेपूर उपयोग करावा, गाव, शहर हा भेद राहिलेला नाही़ लिहितांना दूरदृष्टी, सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही दृष्टीकोनातून कुठल्याही घटनेला प्रसंग पाहण्याचा दृष्टीकोन हवा. चिंतन, निरीक्षण, वाचन असलं तर तुमचं लिखाण उत्कृष्ट होतचं.पुरस्कार मिळाल्यानंतर लिखाणात काय बदल हवा ?पुरस्काराची कल्पना नव्हती़ जे होतं ते बोलीभाषेत मांडले, ते वाचकांनी स्वीकारले. मात्र, एखादी चांगली कलाकृती समोर ठेवल्यानंतर सहाजिकच तुमच्याकडून अपेक्षा वाढतात व तुमची जबादारीही. फेसाटीनंतर एक मॅच्युरिटी आली़ मात्र, फेसाटीनंतर खरे विषय सुरू झाले आहेत़ फेसाटी लिहून संपलेले नाही, मी जोपर्यंत आहे, तो पर्यंत प्रश्न संपणार नाही, रोज काहीना काही घडत असते. त्यामुळे लिहीत राहणार, विचार मांडत राहणाऱ एका चित्रपटाची प्रक्रिया सुरू असून लवकरच त्यावर काम होणार आहे़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव