शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

लेवा बोली व अहिराणी ह्या भाषा भगिनीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 11:51 IST

डॉ. नी.रा.पाटील : दोहोत लय व माधुर्य

चुडामण बोरसे ।अहिराणी भाषेतील लकेर आणि लय ही लेवा गण बोलीतही आहे. रसाळपणा आणि माधुर्य जेवढे गण बोलीत आहे तेवढेच अहिराणी भाषेतही आहे, त्यामुळे अहिराणी आणि लेवा गण बोली ह्या भाषा भगिनीच आहेत, असे प्रतिपादन इतिहासाचे अभ्यासक आणि राज्याच्या गॅझेटीयर विभागाचे निवृत्त अधिकारी डॉ. नी.रा. पाटील यांनी यांनी केले.प्र्रश्न - लेवा गण बोली कशी जन्माला आली?डॉ. पाटील- १५ व्या शतकात पावागडवर मुगल राजाने स्वारी केली. त्यावेळी पाटाई रावळ हा राजा होता. यात रावळ राजाचा पराभव झाला. यानंतर यातील बरीच मंडळी वºहाडाकडे आली.खान्देशात त्यावेळी फारुकी राजवट होती. या राजाने मग लेवा समाजातील लोकांना जमीन कसण्यासाठी दिली शिवाय त्यांना देशमुखी आणि महाजनकी दिली. तिथली मग घाटोळी, वºहाडी, आपल्याकडील अहिराणी, महानुभाव पंथीयांची बोली, चांगदेव आणि मुक्ताईची बोली यातून मग लेवा गण बोली जन्माला आली. लेवा बोलीसोबतच अहिराणीही आली. तिची लकेर आणि लय ही लेवा गणबोली सारखीच आहे.प्र्रश्न - लेवा गण बोली पुस्तकाची निर्मिती कशी झाली.डॉ. पाटील- राज्याच्या गॅझेटीयर विभागात कार्यरत असल्याने अनेक ठिकाणी भेटी देण्याचा योग आला. १९७७ मध्ये प्रेक्षणीय स्थळांची माहिती एकत्र करण्याचे काम गॅझेटीयर विभागाला दिले. नंतर ही योजनाच बंद पडली. पण किल्ल्यांची माहिती एकत्र करीत गेलो. गॅझेटीयरमुळे बहुतेक जाती-जमातींवर लिखाण भरपूर केले. यातून लेवा पाटील समाजाचा आणि बोलीचा अभ्यास व्हावा, अशी कल्पना सूचली त्यातून या पुस्तकाची निर्मिती झाली.याशिवाय लेवा गण बोली या पुस्तकाला सन २००६ मध्ये राज्य शासनाचा उत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कार मिळाला होता. यात बोलीचा पूर्ण इतिहास हा व्याकरणासह देण्यात आला आहे. आता खान्देशातील हेमाडपंथी मंदिरांवर पुस्तक लिहिले आहे.अनेक पुस्तके प्रकाशितजळगावात रविवार २४ रोजी लेवा गण बोली साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे निमंत्रक असलेले डॉ. पाटील शनिवारी जळगावात आले. यानंतर त्यांनी जिल्हापेठेतील रहिवासी व निवृत्त प्रा ए.यू,पाटील यांच्या निवासस्थानी ‘लोकमत’ शी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्वागताध्यक्ष अरविंद नारखेडे आणि तुषार वाघुळदे उपस्थित होते. डॉ. पाटील हे पिळोदा ता. यावल येथील रहिवासी आहेत.डॉ. पाटील यांनी महाराष्ट्रातील किल्ल्यांवर आधारित ‘किल्ले महाराष्टÑ’ या पुस्तकांचा खंड लिहिला आहे. पाच खंडांच्या या पुस्तकात २४०० पाने आहेत. लवकरच हे खंड प्रकाशित करण्यात येणार आहे. याशिवाय या खंडांचा एक भाग कोकण विभागातील किल्ल्यांवर आधारित पुस्तक १९१६ मध्येच प्रकाशित झाले होते.याशिवाय आणखी काही पुस्तकांवर त्यांचे लिखाण सुरु आहे.