शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

लेवा बोली व अहिराणी ह्या भाषा भगिनीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 11:51 IST

डॉ. नी.रा.पाटील : दोहोत लय व माधुर्य

चुडामण बोरसे ।अहिराणी भाषेतील लकेर आणि लय ही लेवा गण बोलीतही आहे. रसाळपणा आणि माधुर्य जेवढे गण बोलीत आहे तेवढेच अहिराणी भाषेतही आहे, त्यामुळे अहिराणी आणि लेवा गण बोली ह्या भाषा भगिनीच आहेत, असे प्रतिपादन इतिहासाचे अभ्यासक आणि राज्याच्या गॅझेटीयर विभागाचे निवृत्त अधिकारी डॉ. नी.रा. पाटील यांनी यांनी केले.प्र्रश्न - लेवा गण बोली कशी जन्माला आली?डॉ. पाटील- १५ व्या शतकात पावागडवर मुगल राजाने स्वारी केली. त्यावेळी पाटाई रावळ हा राजा होता. यात रावळ राजाचा पराभव झाला. यानंतर यातील बरीच मंडळी वºहाडाकडे आली.खान्देशात त्यावेळी फारुकी राजवट होती. या राजाने मग लेवा समाजातील लोकांना जमीन कसण्यासाठी दिली शिवाय त्यांना देशमुखी आणि महाजनकी दिली. तिथली मग घाटोळी, वºहाडी, आपल्याकडील अहिराणी, महानुभाव पंथीयांची बोली, चांगदेव आणि मुक्ताईची बोली यातून मग लेवा गण बोली जन्माला आली. लेवा बोलीसोबतच अहिराणीही आली. तिची लकेर आणि लय ही लेवा गणबोली सारखीच आहे.प्र्रश्न - लेवा गण बोली पुस्तकाची निर्मिती कशी झाली.डॉ. पाटील- राज्याच्या गॅझेटीयर विभागात कार्यरत असल्याने अनेक ठिकाणी भेटी देण्याचा योग आला. १९७७ मध्ये प्रेक्षणीय स्थळांची माहिती एकत्र करण्याचे काम गॅझेटीयर विभागाला दिले. नंतर ही योजनाच बंद पडली. पण किल्ल्यांची माहिती एकत्र करीत गेलो. गॅझेटीयरमुळे बहुतेक जाती-जमातींवर लिखाण भरपूर केले. यातून लेवा पाटील समाजाचा आणि बोलीचा अभ्यास व्हावा, अशी कल्पना सूचली त्यातून या पुस्तकाची निर्मिती झाली.याशिवाय लेवा गण बोली या पुस्तकाला सन २००६ मध्ये राज्य शासनाचा उत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कार मिळाला होता. यात बोलीचा पूर्ण इतिहास हा व्याकरणासह देण्यात आला आहे. आता खान्देशातील हेमाडपंथी मंदिरांवर पुस्तक लिहिले आहे.अनेक पुस्तके प्रकाशितजळगावात रविवार २४ रोजी लेवा गण बोली साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे निमंत्रक असलेले डॉ. पाटील शनिवारी जळगावात आले. यानंतर त्यांनी जिल्हापेठेतील रहिवासी व निवृत्त प्रा ए.यू,पाटील यांच्या निवासस्थानी ‘लोकमत’ शी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्वागताध्यक्ष अरविंद नारखेडे आणि तुषार वाघुळदे उपस्थित होते. डॉ. पाटील हे पिळोदा ता. यावल येथील रहिवासी आहेत.डॉ. पाटील यांनी महाराष्ट्रातील किल्ल्यांवर आधारित ‘किल्ले महाराष्टÑ’ या पुस्तकांचा खंड लिहिला आहे. पाच खंडांच्या या पुस्तकात २४०० पाने आहेत. लवकरच हे खंड प्रकाशित करण्यात येणार आहे. याशिवाय या खंडांचा एक भाग कोकण विभागातील किल्ल्यांवर आधारित पुस्तक १९१६ मध्येच प्रकाशित झाले होते.याशिवाय आणखी काही पुस्तकांवर त्यांचे लिखाण सुरु आहे.