शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

लेवा बोली व अहिराणी ह्या भाषा भगिनीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 11:51 IST

डॉ. नी.रा.पाटील : दोहोत लय व माधुर्य

चुडामण बोरसे ।अहिराणी भाषेतील लकेर आणि लय ही लेवा गण बोलीतही आहे. रसाळपणा आणि माधुर्य जेवढे गण बोलीत आहे तेवढेच अहिराणी भाषेतही आहे, त्यामुळे अहिराणी आणि लेवा गण बोली ह्या भाषा भगिनीच आहेत, असे प्रतिपादन इतिहासाचे अभ्यासक आणि राज्याच्या गॅझेटीयर विभागाचे निवृत्त अधिकारी डॉ. नी.रा. पाटील यांनी यांनी केले.प्र्रश्न - लेवा गण बोली कशी जन्माला आली?डॉ. पाटील- १५ व्या शतकात पावागडवर मुगल राजाने स्वारी केली. त्यावेळी पाटाई रावळ हा राजा होता. यात रावळ राजाचा पराभव झाला. यानंतर यातील बरीच मंडळी वºहाडाकडे आली.खान्देशात त्यावेळी फारुकी राजवट होती. या राजाने मग लेवा समाजातील लोकांना जमीन कसण्यासाठी दिली शिवाय त्यांना देशमुखी आणि महाजनकी दिली. तिथली मग घाटोळी, वºहाडी, आपल्याकडील अहिराणी, महानुभाव पंथीयांची बोली, चांगदेव आणि मुक्ताईची बोली यातून मग लेवा गण बोली जन्माला आली. लेवा बोलीसोबतच अहिराणीही आली. तिची लकेर आणि लय ही लेवा गणबोली सारखीच आहे.प्र्रश्न - लेवा गण बोली पुस्तकाची निर्मिती कशी झाली.डॉ. पाटील- राज्याच्या गॅझेटीयर विभागात कार्यरत असल्याने अनेक ठिकाणी भेटी देण्याचा योग आला. १९७७ मध्ये प्रेक्षणीय स्थळांची माहिती एकत्र करण्याचे काम गॅझेटीयर विभागाला दिले. नंतर ही योजनाच बंद पडली. पण किल्ल्यांची माहिती एकत्र करीत गेलो. गॅझेटीयरमुळे बहुतेक जाती-जमातींवर लिखाण भरपूर केले. यातून लेवा पाटील समाजाचा आणि बोलीचा अभ्यास व्हावा, अशी कल्पना सूचली त्यातून या पुस्तकाची निर्मिती झाली.याशिवाय लेवा गण बोली या पुस्तकाला सन २००६ मध्ये राज्य शासनाचा उत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कार मिळाला होता. यात बोलीचा पूर्ण इतिहास हा व्याकरणासह देण्यात आला आहे. आता खान्देशातील हेमाडपंथी मंदिरांवर पुस्तक लिहिले आहे.अनेक पुस्तके प्रकाशितजळगावात रविवार २४ रोजी लेवा गण बोली साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे निमंत्रक असलेले डॉ. पाटील शनिवारी जळगावात आले. यानंतर त्यांनी जिल्हापेठेतील रहिवासी व निवृत्त प्रा ए.यू,पाटील यांच्या निवासस्थानी ‘लोकमत’ शी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्वागताध्यक्ष अरविंद नारखेडे आणि तुषार वाघुळदे उपस्थित होते. डॉ. पाटील हे पिळोदा ता. यावल येथील रहिवासी आहेत.डॉ. पाटील यांनी महाराष्ट्रातील किल्ल्यांवर आधारित ‘किल्ले महाराष्टÑ’ या पुस्तकांचा खंड लिहिला आहे. पाच खंडांच्या या पुस्तकात २४०० पाने आहेत. लवकरच हे खंड प्रकाशित करण्यात येणार आहे. याशिवाय या खंडांचा एक भाग कोकण विभागातील किल्ल्यांवर आधारित पुस्तक १९१६ मध्येच प्रकाशित झाले होते.याशिवाय आणखी काही पुस्तकांवर त्यांचे लिखाण सुरु आहे.