शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

लिंबू अडीच पटीने वधारले, किराणा साहित्य मात्र स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पावसाचा जोर वाढल्याने हिरव्या पालेभाज्यांसह लिंबूच्या भावात मोठी भाववाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ३० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पावसाचा जोर वाढल्याने हिरव्या पालेभाज्यांसह लिंबूच्या भावात मोठी भाववाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ३० रुपये प्रति किलो असलेले लिंबूचे भाव थेट ८० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. यासोबतच आल्याचेही भाव ४० रुपयांवरून ५० ते ६० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. दुसरीकडे साखर वगळता इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहे.

यंदा पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतरही अनेक दिवस पालेभाज्यांचे भाव कमी होते. मात्र, मध्यंतरी पाऊस झाल्यानंतर भाववाढ झाली होती. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने आवक चांगलीच वाढली व पालेभाज्यांचे भाव कमी झाले होते. मात्र, आता पुन्हा पावसाला सुरुवात होऊन सर्वांना दिलासा मिळाला खरा, मात्र भाजीपाल्यातील भाववाढीने सर्वांची चिंता वाढविली आहे.

पावसामुळे एरव्ही पालेभाज्यांचे भाव अधिक वाढतात. मात्र, यावेळी तर भर पावसाळ्यात लिंबूचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ३० रुपये प्रति किलो असलेले लिंबू थेट ८० रुपये प्रति किलो झाल्याने ग्राहकांना चांगलीच झळ बसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लिंबूला मागणी कायम असल्याने भाववाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

खाद्यतेलाचा दिलासा

गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या भावात सातत्याने वाढ होत जाऊन तेलाने उचांकी गाठली होती. मात्र, सध्या खाद्यतेलाचे भाव स्थिर आहे. यामध्ये सोयाबीन तेल १५५, शेंगदाणा तेल- १७५, सूर्यफूल तेल १६०, पामतेल १३० रुपये प्रति किलो, तर तीळ तेल २०० रुपये प्रति किलोवर कायम आहे. किराणा साहित्यात साखरेत एक ते दोन रुपयांची वाढ होऊन ती ३७ ते ३८ रुपये प्रति किलोंवर असून, इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहे.

आले वधारले

पावसाळ्यामुळे चहामध्येदेखील आल्याचा मोठा वापर होऊन मागणी वाढते. त्यामुळे खाद्यपदार्थांसह चहासाठीही मागणी वाढल्याने आल्याचे भाव वधारले आहेत. ४० रुपयांवरून ते ५० ते ६० रुपये प्रति किलो झाले आहे. यासोबतच कोथिंबीरचे भावदेखील पुन्हा ६० रुपयांवरून ८० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे, तर फूलकोबीचे भाव २० रुपयांवरून ४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.

हिरवी मिरची स्वस्त

पालेभाज्यांचे भाव वाढत असताना हिरवी मिरची, लाल टोमॅटो, भेंडी मात्र स्वस्त झाली आहे. यामध्ये हिरवी मिरची १५ ते २० रुपये प्रति किलोवर, तर टोमॅटो २० रुपये, भेंडी २० रुपये प्रति किलोवर आली आहे.

सध्या सर्वच किराणा साहित्यासह खाद्यतेलाचे भाव स्थिर असल्याने दिलासा आहे. भाजीपाल्यात काहीसी तेजी येत असल्याने भार वाढत आहे.

- विष्णू पवार, ग्राहक

किराणा साहित्यामध्ये साखर वगळता इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहेत. विशेष म्हणजे खाद्यतेलही नियंत्रणात असून, फारशी ग्राहकी नाही.

- रमेश वाणी, व्यापारी

पावसामुळे पालेभाज्यांसह लिंबू, आल्याचेही भाव वाढले आहेत. मात्र, टोमॅटो, हिरवी मिरची, भेंडी यांचे भाव कमी झाले आहे. इतर भाज्यांचे भाव स्थिर आहेत.

- सूरज चौधरी, भाजीपाला विक्रेते