शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
3
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
4
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
5
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
6
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
7
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
8
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
9
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
10
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
11
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
12
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
14
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
15
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
16
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
17
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
18
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
19
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
20
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी

लिंबू अडीच पटीने वधारले, किराणा साहित्य मात्र स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पावसाचा जोर वाढल्याने हिरव्या पालेभाज्यांसह लिंबूच्या भावात मोठी भाववाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ३० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पावसाचा जोर वाढल्याने हिरव्या पालेभाज्यांसह लिंबूच्या भावात मोठी भाववाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ३० रुपये प्रति किलो असलेले लिंबूचे भाव थेट ८० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. यासोबतच आल्याचेही भाव ४० रुपयांवरून ५० ते ६० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. दुसरीकडे साखर वगळता इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहे.

यंदा पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतरही अनेक दिवस पालेभाज्यांचे भाव कमी होते. मात्र, मध्यंतरी पाऊस झाल्यानंतर भाववाढ झाली होती. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने आवक चांगलीच वाढली व पालेभाज्यांचे भाव कमी झाले होते. मात्र, आता पुन्हा पावसाला सुरुवात होऊन सर्वांना दिलासा मिळाला खरा, मात्र भाजीपाल्यातील भाववाढीने सर्वांची चिंता वाढविली आहे.

पावसामुळे एरव्ही पालेभाज्यांचे भाव अधिक वाढतात. मात्र, यावेळी तर भर पावसाळ्यात लिंबूचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ३० रुपये प्रति किलो असलेले लिंबू थेट ८० रुपये प्रति किलो झाल्याने ग्राहकांना चांगलीच झळ बसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लिंबूला मागणी कायम असल्याने भाववाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

खाद्यतेलाचा दिलासा

गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या भावात सातत्याने वाढ होत जाऊन तेलाने उचांकी गाठली होती. मात्र, सध्या खाद्यतेलाचे भाव स्थिर आहे. यामध्ये सोयाबीन तेल १५५, शेंगदाणा तेल- १७५, सूर्यफूल तेल १६०, पामतेल १३० रुपये प्रति किलो, तर तीळ तेल २०० रुपये प्रति किलोवर कायम आहे. किराणा साहित्यात साखरेत एक ते दोन रुपयांची वाढ होऊन ती ३७ ते ३८ रुपये प्रति किलोंवर असून, इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहे.

आले वधारले

पावसाळ्यामुळे चहामध्येदेखील आल्याचा मोठा वापर होऊन मागणी वाढते. त्यामुळे खाद्यपदार्थांसह चहासाठीही मागणी वाढल्याने आल्याचे भाव वधारले आहेत. ४० रुपयांवरून ते ५० ते ६० रुपये प्रति किलो झाले आहे. यासोबतच कोथिंबीरचे भावदेखील पुन्हा ६० रुपयांवरून ८० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे, तर फूलकोबीचे भाव २० रुपयांवरून ४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.

हिरवी मिरची स्वस्त

पालेभाज्यांचे भाव वाढत असताना हिरवी मिरची, लाल टोमॅटो, भेंडी मात्र स्वस्त झाली आहे. यामध्ये हिरवी मिरची १५ ते २० रुपये प्रति किलोवर, तर टोमॅटो २० रुपये, भेंडी २० रुपये प्रति किलोवर आली आहे.

सध्या सर्वच किराणा साहित्यासह खाद्यतेलाचे भाव स्थिर असल्याने दिलासा आहे. भाजीपाल्यात काहीसी तेजी येत असल्याने भार वाढत आहे.

- विष्णू पवार, ग्राहक

किराणा साहित्यामध्ये साखर वगळता इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहेत. विशेष म्हणजे खाद्यतेलही नियंत्रणात असून, फारशी ग्राहकी नाही.

- रमेश वाणी, व्यापारी

पावसामुळे पालेभाज्यांसह लिंबू, आल्याचेही भाव वाढले आहेत. मात्र, टोमॅटो, हिरवी मिरची, भेंडी यांचे भाव कमी झाले आहे. इतर भाज्यांचे भाव स्थिर आहेत.

- सूरज चौधरी, भाजीपाला विक्रेते