शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
6
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
7
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
9
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
10
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
11
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
12
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
13
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
14
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
15
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
16
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
17
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
18
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
19
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
20
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम

लाखोंचे पॅकेज सोडून सेंद्र्रीय शेतीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 13:04 IST

सचिन देव जळगाव : आजच्या आधुनिक काळात एकीकडे नवयुवक शेतीपासून दूर जात असतांना, तालुक्यातील आव्हाणे येथील हर्षल चौधरी या ...

सचिन देवजळगाव : आजच्या आधुनिक काळात एकीकडे नवयुवक शेतीपासून दूर जात असतांना, तालुक्यातील आव्हाणे येथील हर्षल चौधरी या युवकाने ‘विधी’ क्षेत्रातील लाखोंचे पॅकेज नाकारत सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले आहे. पुणे येथील नामांकित विधी महाविद्यालय आयएलएस (इंडियन लॉ सोसायटी)मधून विधी चे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी न करता गेल्या पाच वर्षांपासून सुभाष पाळेकर यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन झिरो बजेट नैसर्गिक शेती करीत आहे.हर्षल चौधरी हे जळगाव तालुक्यातील आव्हाणे या गावात वास्तव्यास आहेत. या गावातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या पिढीजात जमिनी विक्री काढल्या आहेत. अशा परिस्थितीत हर्षल यांनी पिढीजात जमिनीकडे लक्ष देत आधुनिक शेतीचा मार्ग अवलंबला आहे. विशेष म्हणजे आधुनिक शेती करतांना तिला पारंपारिकतेची जोड देऊनी रासायनिक खतांचा वापर पुर्णपणे टाळला आहे. बाराही महिने कुठलेही उत्पादन असो, त्यासाठी रासायनिक खतांचा वापर न करता, फक्त सेंद्रिय खताचांच वापर करित आहेत. त्यामुळे त्यांच्या कृषीविषयक उत्पादनांना मोठी मागणी आहे. रासायनिक खतांच्या काळात सेंद्रिय खतांचा वापर करून शेती करणाºया हर्षल चौधरीच्या या धाडसाचे कौतुक होत आहे.सेंद्रीय खतामुळे उत्पादनात दुप्पटीने फरकएकीकडे नवयुवक शेतीपासून दूर जात असताना दुसरीकडे हर्षलने धाडसी पाऊल टाकत शेतीकडे मोर्चा वळवला. काळ्या मातीची सेवा करूनही पोट भरता येते, आर्थिक नफा मिळवता येतो, हे हर्षलने दाखवून दिले आहे. शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी करण्याचे ठरवून हर्षलने कृषीचा पर्याय निवडला आहे.उत्पादन वाढविण्यासाठी अनेक शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर करतात. यामुळे जमिनीचा पोतही जातो आणि येणारी पिके ही आरोग्यासाठी घातक असतात. विशेष म्हणजे बहुतांश रासायनिक खतांद्वारे शेती करत असल्यामुळे, चौधरी यांनी लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून,आपल्या शेतात सेंद्रिय खतांचा वापर करुन शेतीला सुरुवात केली. पिकासांठी सुरुवातीपासून सेंद्रिय खते वापरल्यामुळे, चौधरी शेती उत्पादनात दुप्पटीने फरक पडला आहे. जेवढ्या नोकरीच्या ठिकाणी वार्षिक उत्पन्न होते. त्याहून दुप्पट उत्पन्न ते १२ एकराच्या शेतात स्वत : राबुन घेत आहेत.नवयुवकांचा शिक्षणानंतर नोकरीसाठी घराबाहेर पडून, मुंबई-पुणे या ठिकाणी स्थायिक होण्याचा विचार असतो. हर्षल हे गावासह परिसरातील युवकांना नोकरीच्या मागे न लागता, कशा प्रकारे उत्तम शेती करता येऊ शकते आणि नोकरी प्रमाणे लाखोंचे उत्पादन घेता येऊ शकते. या संदर्भात युवकांना मार्गदर्शन करत आहेत. विशेष म्हणजे परिसरातील अनेक युवक चांगल्या नोकरींची संधी सोडून, शेती करतांना दिसून येत आहेत.हर्षल चौधरी हे एक प्रकारे परिसरातील युवकांना आदर्श रोल मॉडेल ठरले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.रासायनिक शेतीमुळे जमिनीचा मोठ्या प्रमाणावर ºहास होत होता. हा ºहास रोखण्यासाठी मी नोकरी सोडून,घरच्या शेतात सेंद्रिय खतांचा वापर करुन शेती करायला सुुरुवात केली आहे. यामुळे उत्पन्नदेखील चांगले येत आहे. विशेष म्हणजे रासायनिक शेतीमुळे पर्यावरणावर होणारा दुष्परिणामही कमी होत आहे. .-हर्षल चौधरी, शेतकरी, आव्हाणे ता. जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव