शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

लाखोंचे पॅकेज सोडून सेंद्र्रीय शेतीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 13:04 IST

सचिन देव जळगाव : आजच्या आधुनिक काळात एकीकडे नवयुवक शेतीपासून दूर जात असतांना, तालुक्यातील आव्हाणे येथील हर्षल चौधरी या ...

सचिन देवजळगाव : आजच्या आधुनिक काळात एकीकडे नवयुवक शेतीपासून दूर जात असतांना, तालुक्यातील आव्हाणे येथील हर्षल चौधरी या युवकाने ‘विधी’ क्षेत्रातील लाखोंचे पॅकेज नाकारत सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले आहे. पुणे येथील नामांकित विधी महाविद्यालय आयएलएस (इंडियन लॉ सोसायटी)मधून विधी चे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी न करता गेल्या पाच वर्षांपासून सुभाष पाळेकर यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन झिरो बजेट नैसर्गिक शेती करीत आहे.हर्षल चौधरी हे जळगाव तालुक्यातील आव्हाणे या गावात वास्तव्यास आहेत. या गावातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या पिढीजात जमिनी विक्री काढल्या आहेत. अशा परिस्थितीत हर्षल यांनी पिढीजात जमिनीकडे लक्ष देत आधुनिक शेतीचा मार्ग अवलंबला आहे. विशेष म्हणजे आधुनिक शेती करतांना तिला पारंपारिकतेची जोड देऊनी रासायनिक खतांचा वापर पुर्णपणे टाळला आहे. बाराही महिने कुठलेही उत्पादन असो, त्यासाठी रासायनिक खतांचा वापर न करता, फक्त सेंद्रिय खताचांच वापर करित आहेत. त्यामुळे त्यांच्या कृषीविषयक उत्पादनांना मोठी मागणी आहे. रासायनिक खतांच्या काळात सेंद्रिय खतांचा वापर करून शेती करणाºया हर्षल चौधरीच्या या धाडसाचे कौतुक होत आहे.सेंद्रीय खतामुळे उत्पादनात दुप्पटीने फरकएकीकडे नवयुवक शेतीपासून दूर जात असताना दुसरीकडे हर्षलने धाडसी पाऊल टाकत शेतीकडे मोर्चा वळवला. काळ्या मातीची सेवा करूनही पोट भरता येते, आर्थिक नफा मिळवता येतो, हे हर्षलने दाखवून दिले आहे. शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी करण्याचे ठरवून हर्षलने कृषीचा पर्याय निवडला आहे.उत्पादन वाढविण्यासाठी अनेक शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर करतात. यामुळे जमिनीचा पोतही जातो आणि येणारी पिके ही आरोग्यासाठी घातक असतात. विशेष म्हणजे बहुतांश रासायनिक खतांद्वारे शेती करत असल्यामुळे, चौधरी यांनी लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून,आपल्या शेतात सेंद्रिय खतांचा वापर करुन शेतीला सुरुवात केली. पिकासांठी सुरुवातीपासून सेंद्रिय खते वापरल्यामुळे, चौधरी शेती उत्पादनात दुप्पटीने फरक पडला आहे. जेवढ्या नोकरीच्या ठिकाणी वार्षिक उत्पन्न होते. त्याहून दुप्पट उत्पन्न ते १२ एकराच्या शेतात स्वत : राबुन घेत आहेत.नवयुवकांचा शिक्षणानंतर नोकरीसाठी घराबाहेर पडून, मुंबई-पुणे या ठिकाणी स्थायिक होण्याचा विचार असतो. हर्षल हे गावासह परिसरातील युवकांना नोकरीच्या मागे न लागता, कशा प्रकारे उत्तम शेती करता येऊ शकते आणि नोकरी प्रमाणे लाखोंचे उत्पादन घेता येऊ शकते. या संदर्भात युवकांना मार्गदर्शन करत आहेत. विशेष म्हणजे परिसरातील अनेक युवक चांगल्या नोकरींची संधी सोडून, शेती करतांना दिसून येत आहेत.हर्षल चौधरी हे एक प्रकारे परिसरातील युवकांना आदर्श रोल मॉडेल ठरले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.रासायनिक शेतीमुळे जमिनीचा मोठ्या प्रमाणावर ºहास होत होता. हा ºहास रोखण्यासाठी मी नोकरी सोडून,घरच्या शेतात सेंद्रिय खतांचा वापर करुन शेती करायला सुुरुवात केली आहे. यामुळे उत्पन्नदेखील चांगले येत आहे. विशेष म्हणजे रासायनिक शेतीमुळे पर्यावरणावर होणारा दुष्परिणामही कमी होत आहे. .-हर्षल चौधरी, शेतकरी, आव्हाणे ता. जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव