शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

भुसावळात ‘नवोदय’ला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 15:47 IST

साकेगाव महामार्गावर जवाहर नवोदय विद्यालयात पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला गळती लागली आहे.

ठळक मुद्देलाखो लीटर पाण्याची नासाडीडबके साचल्याने आरोग्याला धोकाप्रशासनाचे दुर्लक्ष

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : शहराजवळील साकेगाव महामार्गावर जवाहर नवोदय विद्यालयात पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला गळती लागली असून, दररोज लाखो लीटर पाणी वाया जात असून, साचलेल्या डबकीत डासांचा प्रादुर्भाव होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.जल है तो कल है, पाणी जपून वापरा, पाणी आडवा पाणी जिरवा, पाण्याचा वापर काटकसरीने करण्यासाठी शासन पाणी वाचवण्यासाठी कोट्यवधी खर्च करत असते मात्र यात शासनाच्या नियमांना शासकीय अधिकाऱ्यांमार्फत खो दिलेला दिसून येत आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना आधीही काम करत असताना या जलवाहिनीला गळती लागली होती. भर उन्हाळ्यामध्ये लाखो लीटर पाण्याची नासाडी होत होती. महामार्ग प्राधिकरणाने मक्तेदारामार्फत लगेच जलवाहिनी दुरुस्ती करून घेतली होती व त्या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्यात आली होती. यानंतर हे कार्य आता महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळांतर्गत येत आहे. याविषयी संबंधित जलशुद्धीकरण केंद्र साकेगावचे उप अभियंता पी.पी. पाटील यांना वारंवार सूचना करून व भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करूनसुद्धा प्रतिसाद मिळाला नाही.लाखो लीटर पाण्याची नासाडीजवाहर नवोदय विद्यालयात पाणीपुरवठा करण्यात जलवाहिनीला याठिकाणी व्हॉल्व्ह बसविण्यात आला आहे. नेमके यास गळती लागली असून २४ तास पाणीपुरवठा सुरू असतो व यातून दररोज लाखो लीटर शुद्ध पाण्याची नासाडी होत असते.साचलेल्या डबक्यामुळे आरोग्य धोक्यातगळतीमुळे मोठे डबके तयार झाले आहे. हेच पाणी रस्त्यावर येते. यामुळे नागरिकांना ये-जा करणे जिकिरीचे होऊन बसले आहे. साचलेल्या डबक्यांमुळे डासांची उत्पत्ती होत आहे. यामुळे साथीच्या आजाराच्यां रुग्ण संख्येने वाढ होत आहे.लहान मुले व गुरे फसतात डबक्यातसाचलेल्या पाण्यामुळे मोठे डबके तयार झाले आहे. या ठिकाणी लहान मुलांना तसेच गुराढोरांना अंदाज येत नाही. यामुळे अनेक वेळा या ठिकाणी लहान मुलं व गुर अडकले असल्याचेही निदर्शनास आले आहे.त्वरित दुरुस्ती करावीसाकेगावजवळील महामार्गावर वाय पॉईंट जवळ येता-जाता लाखो लोकांच्या निदर्शनास येणाºया पाण्याचा अपव्यय पाहून भुसावळ शहरामध्ये आठ दहा दिवसात पाणी पिण्यास मिळत नाही. मात्र याठिकाणी पाणी मुबलक असतानासुद्धा फक्त तांत्रिक कारण सांगून लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. घोटभर पाण्यासाठी वणवण फिरणाºया नागरिकांना मात्र हे दृश्य बघून अंगावर शहारे येतात. त्वरित पाण्याची गळती दुरुस्त करावी व पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी अपेक्षा जनसामान्यात व्यक्त करण्यात येत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीकपातBhusawalभुसावळ