शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात ‘नवोदय’ला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 15:47 IST

साकेगाव महामार्गावर जवाहर नवोदय विद्यालयात पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला गळती लागली आहे.

ठळक मुद्देलाखो लीटर पाण्याची नासाडीडबके साचल्याने आरोग्याला धोकाप्रशासनाचे दुर्लक्ष

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : शहराजवळील साकेगाव महामार्गावर जवाहर नवोदय विद्यालयात पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला गळती लागली असून, दररोज लाखो लीटर पाणी वाया जात असून, साचलेल्या डबकीत डासांचा प्रादुर्भाव होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.जल है तो कल है, पाणी जपून वापरा, पाणी आडवा पाणी जिरवा, पाण्याचा वापर काटकसरीने करण्यासाठी शासन पाणी वाचवण्यासाठी कोट्यवधी खर्च करत असते मात्र यात शासनाच्या नियमांना शासकीय अधिकाऱ्यांमार्फत खो दिलेला दिसून येत आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना आधीही काम करत असताना या जलवाहिनीला गळती लागली होती. भर उन्हाळ्यामध्ये लाखो लीटर पाण्याची नासाडी होत होती. महामार्ग प्राधिकरणाने मक्तेदारामार्फत लगेच जलवाहिनी दुरुस्ती करून घेतली होती व त्या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्यात आली होती. यानंतर हे कार्य आता महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळांतर्गत येत आहे. याविषयी संबंधित जलशुद्धीकरण केंद्र साकेगावचे उप अभियंता पी.पी. पाटील यांना वारंवार सूचना करून व भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करूनसुद्धा प्रतिसाद मिळाला नाही.लाखो लीटर पाण्याची नासाडीजवाहर नवोदय विद्यालयात पाणीपुरवठा करण्यात जलवाहिनीला याठिकाणी व्हॉल्व्ह बसविण्यात आला आहे. नेमके यास गळती लागली असून २४ तास पाणीपुरवठा सुरू असतो व यातून दररोज लाखो लीटर शुद्ध पाण्याची नासाडी होत असते.साचलेल्या डबक्यामुळे आरोग्य धोक्यातगळतीमुळे मोठे डबके तयार झाले आहे. हेच पाणी रस्त्यावर येते. यामुळे नागरिकांना ये-जा करणे जिकिरीचे होऊन बसले आहे. साचलेल्या डबक्यांमुळे डासांची उत्पत्ती होत आहे. यामुळे साथीच्या आजाराच्यां रुग्ण संख्येने वाढ होत आहे.लहान मुले व गुरे फसतात डबक्यातसाचलेल्या पाण्यामुळे मोठे डबके तयार झाले आहे. या ठिकाणी लहान मुलांना तसेच गुराढोरांना अंदाज येत नाही. यामुळे अनेक वेळा या ठिकाणी लहान मुलं व गुर अडकले असल्याचेही निदर्शनास आले आहे.त्वरित दुरुस्ती करावीसाकेगावजवळील महामार्गावर वाय पॉईंट जवळ येता-जाता लाखो लोकांच्या निदर्शनास येणाºया पाण्याचा अपव्यय पाहून भुसावळ शहरामध्ये आठ दहा दिवसात पाणी पिण्यास मिळत नाही. मात्र याठिकाणी पाणी मुबलक असतानासुद्धा फक्त तांत्रिक कारण सांगून लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. घोटभर पाण्यासाठी वणवण फिरणाºया नागरिकांना मात्र हे दृश्य बघून अंगावर शहारे येतात. त्वरित पाण्याची गळती दुरुस्त करावी व पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी अपेक्षा जनसामान्यात व्यक्त करण्यात येत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीकपातBhusawalभुसावळ