शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात ‘नवोदय’ला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 15:47 IST

साकेगाव महामार्गावर जवाहर नवोदय विद्यालयात पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला गळती लागली आहे.

ठळक मुद्देलाखो लीटर पाण्याची नासाडीडबके साचल्याने आरोग्याला धोकाप्रशासनाचे दुर्लक्ष

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : शहराजवळील साकेगाव महामार्गावर जवाहर नवोदय विद्यालयात पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला गळती लागली असून, दररोज लाखो लीटर पाणी वाया जात असून, साचलेल्या डबकीत डासांचा प्रादुर्भाव होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.जल है तो कल है, पाणी जपून वापरा, पाणी आडवा पाणी जिरवा, पाण्याचा वापर काटकसरीने करण्यासाठी शासन पाणी वाचवण्यासाठी कोट्यवधी खर्च करत असते मात्र यात शासनाच्या नियमांना शासकीय अधिकाऱ्यांमार्फत खो दिलेला दिसून येत आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना आधीही काम करत असताना या जलवाहिनीला गळती लागली होती. भर उन्हाळ्यामध्ये लाखो लीटर पाण्याची नासाडी होत होती. महामार्ग प्राधिकरणाने मक्तेदारामार्फत लगेच जलवाहिनी दुरुस्ती करून घेतली होती व त्या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्यात आली होती. यानंतर हे कार्य आता महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळांतर्गत येत आहे. याविषयी संबंधित जलशुद्धीकरण केंद्र साकेगावचे उप अभियंता पी.पी. पाटील यांना वारंवार सूचना करून व भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करूनसुद्धा प्रतिसाद मिळाला नाही.लाखो लीटर पाण्याची नासाडीजवाहर नवोदय विद्यालयात पाणीपुरवठा करण्यात जलवाहिनीला याठिकाणी व्हॉल्व्ह बसविण्यात आला आहे. नेमके यास गळती लागली असून २४ तास पाणीपुरवठा सुरू असतो व यातून दररोज लाखो लीटर शुद्ध पाण्याची नासाडी होत असते.साचलेल्या डबक्यामुळे आरोग्य धोक्यातगळतीमुळे मोठे डबके तयार झाले आहे. हेच पाणी रस्त्यावर येते. यामुळे नागरिकांना ये-जा करणे जिकिरीचे होऊन बसले आहे. साचलेल्या डबक्यांमुळे डासांची उत्पत्ती होत आहे. यामुळे साथीच्या आजाराच्यां रुग्ण संख्येने वाढ होत आहे.लहान मुले व गुरे फसतात डबक्यातसाचलेल्या पाण्यामुळे मोठे डबके तयार झाले आहे. या ठिकाणी लहान मुलांना तसेच गुराढोरांना अंदाज येत नाही. यामुळे अनेक वेळा या ठिकाणी लहान मुलं व गुर अडकले असल्याचेही निदर्शनास आले आहे.त्वरित दुरुस्ती करावीसाकेगावजवळील महामार्गावर वाय पॉईंट जवळ येता-जाता लाखो लोकांच्या निदर्शनास येणाºया पाण्याचा अपव्यय पाहून भुसावळ शहरामध्ये आठ दहा दिवसात पाणी पिण्यास मिळत नाही. मात्र याठिकाणी पाणी मुबलक असतानासुद्धा फक्त तांत्रिक कारण सांगून लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. घोटभर पाण्यासाठी वणवण फिरणाºया नागरिकांना मात्र हे दृश्य बघून अंगावर शहारे येतात. त्वरित पाण्याची गळती दुरुस्त करावी व पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी अपेक्षा जनसामान्यात व्यक्त करण्यात येत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीकपातBhusawalभुसावळ