शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
4
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
5
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
6
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
7
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
8
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
9
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
10
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
11
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
12
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
13
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
14
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
15
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
16
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
17
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
18
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
19
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
20
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मतदार संघाबाहेर गेलेले नेते, कार्यकर्त्यांना परतावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 11:35 IST

प्रशासनाकडून होणार हॉटेल्स, लॉज, पक्ष कार्यालयांची तपासणी, कार्यकर्त्याची धावपळ

जळगाव : मतदारसंघाबाहेर प्रचारासाठी फिरत असलेल्या नेते, कार्यकर्त्यांना आता आपल्या मूळ ठिकाणी परतावे लागणार आहे. कारण निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शनिवारी सायंकाळी ६ वाजता प्रचाराची मुदत संपल्यानंतर त्या मतदार संघाचा मतदार नसलेल्या राजकीय नेते, कार्यकर्त्यांना त्या मतदार संघात थांबण्यास मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडूनही याबाबत पथकांची नियुक्ती करून पक्ष कार्यालये, हॉटेल्स, लॉजची तपासणी करून खात्री करून घेतली जाणार आहे.विधानसभा निवडणुकीची घोषणा २१ सप्टेंबर रोजी झाली. त्यामुळे त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिताही लागू झाली. तर २७ सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होऊन उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला. ७ आॅक्टोबर रोजी माघारीनंतर निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला. प्रचारासाठी जेमतेम १२ दिवसांचा कालावधीच उमेदवारांना मिळाला. त्यामुळे नेते मंडळी, तसेच राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विविध मतदारसंघांमध्ये जाऊन प्रचार करण्याची व प्रचाराची व्यूहरचना आखण्याची धावपळ करावी लागली.तक्रार आल्यास घेतली जाणार दखलशनिवार, १९ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रचाराची मुदत संपली. ही मुदत संपल्यानंतर प्रचारासाठी आलेल्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेते, कार्यकर्त्यांना ते मतदार नसलेल्या मतदार संघात थांबता येणार नाही, असे निवडणूक आयोगाचे निर्देश असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यादृष्टीने विशेष पथकांची नियुक्ती केली असून त्यांच्याकडून लक्ष ठेवले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच मतदारसंघाबाहेरील कुणी नेता, कार्यकर्ता थांबलेला असल्याची तक्रार आली तर त्याची दखल घेतली जाणार असल्याची माहितीही निवडणूक उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव