शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

मतदार संघाबाहेर गेलेले नेते, कार्यकर्त्यांना परतावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 11:35 IST

प्रशासनाकडून होणार हॉटेल्स, लॉज, पक्ष कार्यालयांची तपासणी, कार्यकर्त्याची धावपळ

जळगाव : मतदारसंघाबाहेर प्रचारासाठी फिरत असलेल्या नेते, कार्यकर्त्यांना आता आपल्या मूळ ठिकाणी परतावे लागणार आहे. कारण निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शनिवारी सायंकाळी ६ वाजता प्रचाराची मुदत संपल्यानंतर त्या मतदार संघाचा मतदार नसलेल्या राजकीय नेते, कार्यकर्त्यांना त्या मतदार संघात थांबण्यास मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडूनही याबाबत पथकांची नियुक्ती करून पक्ष कार्यालये, हॉटेल्स, लॉजची तपासणी करून खात्री करून घेतली जाणार आहे.विधानसभा निवडणुकीची घोषणा २१ सप्टेंबर रोजी झाली. त्यामुळे त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिताही लागू झाली. तर २७ सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होऊन उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला. ७ आॅक्टोबर रोजी माघारीनंतर निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला. प्रचारासाठी जेमतेम १२ दिवसांचा कालावधीच उमेदवारांना मिळाला. त्यामुळे नेते मंडळी, तसेच राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विविध मतदारसंघांमध्ये जाऊन प्रचार करण्याची व प्रचाराची व्यूहरचना आखण्याची धावपळ करावी लागली.तक्रार आल्यास घेतली जाणार दखलशनिवार, १९ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रचाराची मुदत संपली. ही मुदत संपल्यानंतर प्रचारासाठी आलेल्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेते, कार्यकर्त्यांना ते मतदार नसलेल्या मतदार संघात थांबता येणार नाही, असे निवडणूक आयोगाचे निर्देश असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यादृष्टीने विशेष पथकांची नियुक्ती केली असून त्यांच्याकडून लक्ष ठेवले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच मतदारसंघाबाहेरील कुणी नेता, कार्यकर्ता थांबलेला असल्याची तक्रार आली तर त्याची दखल घेतली जाणार असल्याची माहितीही निवडणूक उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव