शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

उशिराच्या पावसाने खरिपाच्या नगदी पिकांचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:18 IST

रावेर : तालुक्यात निम्म्या पावसाळ्यातही ५० टक्के सरासरी पर्जन्यमान झाले नसताना ३ ते १२ सप्टेंबरदरम्यानच्या अवघ्या १० दिवसांत ...

रावेर : तालुक्यात निम्म्या पावसाळ्यातही ५० टक्के सरासरी पर्जन्यमान झाले नसताना ३ ते १२ सप्टेंबरदरम्यानच्या अवघ्या १० दिवसांत सरासरी ३१ टक्के झालेल्या पावसामुळे मात्र पूर्वहंगामी कापसाच्या कैऱ्या सडून तर खरिपाच्या कापसाच्या फुलपाती गळून उत्पादनात कमालीची घट येणार आहे. कपाशीच्या पिकावर लाल्या तथा ग्रेब्लॅकमिल्ड्यूसारख्या रोगाची लागण होऊन पूर्णत: पानझड होत असल्याने कापसाच्या हंगामाचा गाशा गुंडाळल्यासारखा आहे किंबहुना, मक्याच्या कणसांमध्येही लष्करी अळीने शिरकाव करीत विळखा घातल्याने मक्याच्या उत्पादनातही कमालीची घट येणार आहे.

विषम वातावरणामुळे केळीलाही फटका

ढगाळ वातावरण, पाऊस तर केव्हा कडक ऊन अशा विषम वातावरणात केळीवर करप्याने आक्रमण केले असून, तालुक्यातील शेतकरी पाऊस नसताना व पाऊस असतानाही तेवढेच हवालदिल झाले आहेत.

पावसाचा प्रदीर्घ काळ पडला खंड

यंदा जून महिन्यापासून ते ऑगस्ट या पावसाळ्याच्या निम्म्यापेक्षा जास्त कालावधीत पावसाने प्रदीर्घ काळ खंड दिल्याने तालुक्यातील सरासरी पर्जन्यमानाने अर्धशतकही गाठले नव्हते. परिणामतः खरिपाच्या हंगामावर ऐन वाढीच्या अवस्थेतच कमालीचा ताण बसल्याने खरिपाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याचे संकेत प्राप्त झाले होते, तर दुसरीकडे मंगरूळ व आभोडा धरण १०० टक्के भरूनही सुकी व भोकर नद्यांचे पात्र कोरडे असल्याची विदारक परिस्थिती होती.

नऊ दिवसांत पावसाची फटकेबाजी

दरम्यान, सप्टेंबर महिन्याच्या आरंभीच दि. २ सप्टेंबर रोजी झालेल्या दमदार पावसाने तालुक्याच्या सरासरी पर्जन्यमानाचे अर्धशतक पार करून ५३ टक्के सरासरी पावसाची आकडेवारी गाठली होती. किंबहुना ३ सप्टेंबरपासून ११ सप्टेंबर पावेतो नऊ दिवसांत उशिराने आलेल्या पावसाने पर्जन्यमानाचे शतक गाठण्यासाठी जणूकाही फटकेबाजी करीत अवघ्या नऊ दिवसांत सरासरी ३१ टक्के पर्जन्यमान गाठल्याने ५७५.७० मिमी अर्थात ८१.६६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

पावसाळ्यातील चारपैकी तीन महिन्यांत ५० टक्केही नोंद नसलेल्या पावसाने या महिन्यातील केवळ नऊ दिवसांत ३१ टक्के सरासरी हजेरी लावल्याने सरासरी ८१.६६ मिमी पर्जन्यमान झाले. असे असले तरी या उशिराने येणाऱ्या पावसाचा फायदा भूजल पातळी वाढण्यासाठी लाभदायी ठरणार असताना दुसरीकडे मात्र खरिपातील पूर्वहंगामी कापूस, जिरायत कापूस, उडीद, मूग व मका पिकाचे कमालीचे नुकसान झाले आहे, तर जिरायत कापसाच्या फुलपात्यांचा बहर झडून उत्पादनाची अपरिमित हानी होणार असल्याची चिंता भेडसावत आहे.

मका पिकाच्या वाढीवर पावसाच्या महिनाभराचा खंड पडून उत्पादनाची अपरिमित हानी झाली व त्यातच उशिराने आलेल्या पावसाने निसवलेल्या मक्याचे कणसांमध्ये मात्र लष्करी अळीने शिरकाव करीत मक्याचे उत्पादन फस्त केले आहे.

दरम्यान, तब्बल महिनाभराच्या प्रदीर्घ खंडात उन्हाचा वाढलेला तडाखा, तद्नंतर उशिराने आलेल्या पावसाचा तडाखा व अधूनमधून येणारे ढगाळ वातावरण अशा विषम हवामानामुळे करप्यानेही केळीवर विळखा घातला असल्याने केळी उत्पादनाला मोठा फटका बसला आहे.

रावेर तालुक्यातील कर्जोद शिवारात उशिराने आलेल्या पावसाने लाल्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन पानझड होऊन कापसाच्या कैऱ्या सडून होत असलेले नुकसान दिसत आहे. (छाया : किरण चौधरी)