शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
2
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
3
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
4
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
5
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
6
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
7
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
8
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
9
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
10
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
11
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
12
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
13
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
15
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
16
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
17
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
18
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
19
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
20
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन

शेवटच्या अर्ध्या तासात माघारीसाठी अपक्ष उमेदवारांची मनपात धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 12:34 IST

उशिरा आलेल्यांची माघार नाकारली

ठळक मुद्देमनपाच्या प्रवेशद्वारावरच उमेदवारांना अडविलेअपक्ष उमेदवारांची रात्रीपासून मनधरणी

जळगाव : मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून आश्वासने व आमिष मिळाल्यानंतर अखेरच्या अर्धा तासात अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत काही मोजक्या उमेदवारांनी माघार घेतली मात्र, दुपारी २ ते ३ या एका तासात अनेक उमेदवारांनी माघार घेतली. तर काही उमेदवार मुदत संपल्यानंतर मनपात पोहचल्याने ते माघार घेवू शकले नाही.अपक्ष उमेदवारांची रात्रीपासून मनधरणीसोमवारपर्यंत २४ उमेदवारांनी माघार घेतली होती. मात्र, १७६ हून अधिक अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे अनेक उमेदवारांचे गणित यामुळे बिघडण्याची शक्यता होती.सोमवारी रात्री काहीअपक्ष उमेदवारांच्या घरी जावून राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनवण्या केल्या. हे प्रकार मंगळवारी सकाळपर्यंत सुरु होते. त्यामुळे शेवटच्या अर्धातासात अनेक उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली.‘डमी’ उमेदवारांनी सकाळीच घेतली माघारउमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननी दरम्यान अर्जामध्ये त्रुटी राहिल्यास उमेदवारांचे अर्ज बाद ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेक उमेदवारांनी खबरदारी म्हणून आपल्याच कुटुंबातील उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते. छाननीमध्ये ‘सबकुछ ओके’ झाल्यामुळे ‘डमी’ उमेदवारांनी मंगळवारी माघार घेतली.एक तास शिल्लक असतानाही पाहिली फोनची वाटमाघारीसाठी आपल्या विनवण्या केल्या जातील या अपेक्षेने काही काही उमेदवार मनपाच्या आवारात सकाळपासून उपस्थित होते. मात्र, कोणत्याही पक्षाकडून किंवा उमेदवारांकडून फोन किंवा कोणतेही आश्वासन न मिळाल्यामुळे शेवटच्या तासात अर्ज मागे घेतले.तर काहींनी आपली उमेदवारी कायम ठेवली.मुदत संपल्यानंतरही आले उमेदवार, मात्र प्रवेश नाकारलामंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ होती. मात्र, अनेक उमेदवार हे दुपारी ३ वाजेनंतर मनपात दाखल झाले.यामध्ये प्रभाग ३ क च्या अपक्ष उमेदवार रुपाली वाघ, संग्राम सूर्यवंशी यांच्यासह अनेक उमेदवारांचा समावेश होता.दुपारी ३ वाजता निवडणूक कक्षाचे प्रवेशव्दार बंद करण्यात आले. त्यानंतर आलेल्या कोणत्याही उमेदवाराला प्रवेश देण्यात आला नाही.त्यामुळे त्यांना माघार घेता आली नाही.वेळ कमी राहिला, लवकर घेऊन यामाघारीची वेळ जसजसी जवळ येत होती तसतशी एका पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्ते, पदाधिकाºयांची लगबग वाढताना दिसून आली. नेते आपल्या कार्यकर्त्यांना अमूक या उमेदवारास माघारीसाठी लवकर घेऊन या, अशा सूचना देत होते. प्रत्यक्ष मतदानावेळी काय होईल ते होईल, मात्र आज माघारीच्या अखेरच्या दिवशी आपल्या उमेदवाराविरोधात असलेले जास्तीत जास्त उमेदवार कमी कसे करता येतील, त्या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू होते. काही ठिकाणी ‘साम, दाम, दंड’या मंत्राचे पालन होत असल्याचे चित्र होते. मनधरणी झाल्यानंतर त्याला माघारीस नेण्यासाठी चारचाकी वाहनांचीदेखील तयारी करून ठेवलेली होती. हे सर्व करीत असताना हातातील घड्याळातील वेळेकडे लक्ष होते.माघार घेणाºयांसाठी प्रवेशव्दारापर्यंत चारचाकीची व्यवस्थाप्रमुख पक्षांमधील काही नाराज पदाधिकाºयांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांनी माघार घ्यावी यासाठी महत्वाच्या पदाधिकाºयांनी पुढाकार घेतलेला दिसून आला. अपक्ष उमेदवारांचे मन वळविण्यात यश मिळाल्यानंतर संबधित उमेदवाराला मनपाच्या प्रवेशव्दारापर्यंत सोडण्यासाठी चारचाकीची व्यवस्था करून देण्यात आली होती.काही अपक्षांना माघार न घेण्यासाठीही विनवण्याएकीकडे काही अपक्ष उमेदवारांना माघार घेण्यासाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह प्रमुख पदाधिकाºयांकडून मनधरणी सुरु असताना, काही अपक्ष उमेदवारांना निवडणूक लढवावी यासाठी मनधरणी सुरु असल्याचेही मनपाच्या परिसरात दिसून आले. अपक्ष उमेदवार रिंगणात राहिल्यास विरोधातील उमेदवाराचे नुकसान होण्याची शक्यता असल्यानेही अनेकांनी अपक्ष उमेदवार रिंगणात रहावेत यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले.

 

 

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव