शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

शेवटच्या अर्ध्या तासात माघारीसाठी अपक्ष उमेदवारांची मनपात धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 12:34 IST

उशिरा आलेल्यांची माघार नाकारली

ठळक मुद्देमनपाच्या प्रवेशद्वारावरच उमेदवारांना अडविलेअपक्ष उमेदवारांची रात्रीपासून मनधरणी

जळगाव : मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून आश्वासने व आमिष मिळाल्यानंतर अखेरच्या अर्धा तासात अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत काही मोजक्या उमेदवारांनी माघार घेतली मात्र, दुपारी २ ते ३ या एका तासात अनेक उमेदवारांनी माघार घेतली. तर काही उमेदवार मुदत संपल्यानंतर मनपात पोहचल्याने ते माघार घेवू शकले नाही.अपक्ष उमेदवारांची रात्रीपासून मनधरणीसोमवारपर्यंत २४ उमेदवारांनी माघार घेतली होती. मात्र, १७६ हून अधिक अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे अनेक उमेदवारांचे गणित यामुळे बिघडण्याची शक्यता होती.सोमवारी रात्री काहीअपक्ष उमेदवारांच्या घरी जावून राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनवण्या केल्या. हे प्रकार मंगळवारी सकाळपर्यंत सुरु होते. त्यामुळे शेवटच्या अर्धातासात अनेक उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली.‘डमी’ उमेदवारांनी सकाळीच घेतली माघारउमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननी दरम्यान अर्जामध्ये त्रुटी राहिल्यास उमेदवारांचे अर्ज बाद ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेक उमेदवारांनी खबरदारी म्हणून आपल्याच कुटुंबातील उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते. छाननीमध्ये ‘सबकुछ ओके’ झाल्यामुळे ‘डमी’ उमेदवारांनी मंगळवारी माघार घेतली.एक तास शिल्लक असतानाही पाहिली फोनची वाटमाघारीसाठी आपल्या विनवण्या केल्या जातील या अपेक्षेने काही काही उमेदवार मनपाच्या आवारात सकाळपासून उपस्थित होते. मात्र, कोणत्याही पक्षाकडून किंवा उमेदवारांकडून फोन किंवा कोणतेही आश्वासन न मिळाल्यामुळे शेवटच्या तासात अर्ज मागे घेतले.तर काहींनी आपली उमेदवारी कायम ठेवली.मुदत संपल्यानंतरही आले उमेदवार, मात्र प्रवेश नाकारलामंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ होती. मात्र, अनेक उमेदवार हे दुपारी ३ वाजेनंतर मनपात दाखल झाले.यामध्ये प्रभाग ३ क च्या अपक्ष उमेदवार रुपाली वाघ, संग्राम सूर्यवंशी यांच्यासह अनेक उमेदवारांचा समावेश होता.दुपारी ३ वाजता निवडणूक कक्षाचे प्रवेशव्दार बंद करण्यात आले. त्यानंतर आलेल्या कोणत्याही उमेदवाराला प्रवेश देण्यात आला नाही.त्यामुळे त्यांना माघार घेता आली नाही.वेळ कमी राहिला, लवकर घेऊन यामाघारीची वेळ जसजसी जवळ येत होती तसतशी एका पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्ते, पदाधिकाºयांची लगबग वाढताना दिसून आली. नेते आपल्या कार्यकर्त्यांना अमूक या उमेदवारास माघारीसाठी लवकर घेऊन या, अशा सूचना देत होते. प्रत्यक्ष मतदानावेळी काय होईल ते होईल, मात्र आज माघारीच्या अखेरच्या दिवशी आपल्या उमेदवाराविरोधात असलेले जास्तीत जास्त उमेदवार कमी कसे करता येतील, त्या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू होते. काही ठिकाणी ‘साम, दाम, दंड’या मंत्राचे पालन होत असल्याचे चित्र होते. मनधरणी झाल्यानंतर त्याला माघारीस नेण्यासाठी चारचाकी वाहनांचीदेखील तयारी करून ठेवलेली होती. हे सर्व करीत असताना हातातील घड्याळातील वेळेकडे लक्ष होते.माघार घेणाºयांसाठी प्रवेशव्दारापर्यंत चारचाकीची व्यवस्थाप्रमुख पक्षांमधील काही नाराज पदाधिकाºयांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांनी माघार घ्यावी यासाठी महत्वाच्या पदाधिकाºयांनी पुढाकार घेतलेला दिसून आला. अपक्ष उमेदवारांचे मन वळविण्यात यश मिळाल्यानंतर संबधित उमेदवाराला मनपाच्या प्रवेशव्दारापर्यंत सोडण्यासाठी चारचाकीची व्यवस्था करून देण्यात आली होती.काही अपक्षांना माघार न घेण्यासाठीही विनवण्याएकीकडे काही अपक्ष उमेदवारांना माघार घेण्यासाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह प्रमुख पदाधिकाºयांकडून मनधरणी सुरु असताना, काही अपक्ष उमेदवारांना निवडणूक लढवावी यासाठी मनधरणी सुरु असल्याचेही मनपाच्या परिसरात दिसून आले. अपक्ष उमेदवार रिंगणात राहिल्यास विरोधातील उमेदवाराचे नुकसान होण्याची शक्यता असल्यानेही अनेकांनी अपक्ष उमेदवार रिंगणात रहावेत यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले.

 

 

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव