शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जनावरांचा बाजार बंद झाल्याने मोठी उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 23:36 IST

उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या चाळीसगावच्या गुरांच्या बाजाराला कोरोनामुळे टाळे लागले आहे.

ठळक मुद्देचाळीसगाव बाजार समिती : प्रत्येक बाजारात होतात ५० लाखांचे व्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या चाळीसगावच्या गुरांच्या बाजाराला कोरोनामुळे टाळे लागले असून, गत महिन्यापासून यामुळे होणारी मोठी उलाढाल ठप्प झाली आहे. २७ फेब्रुवारी रोजी गुरांच्या बाजाराची टाळेबंदी झाली आहे. गुरांच्या खरेदी - विक्री बंदचा फटका शेतकऱ्यांसह ऊसतोड मजुरांना बसतो आहे. बाजार समितीच्या उत्पन्नाला देखील कात्री लागली आहे.

धुळे, मालेगाव, कन्नड, सिल्लोड, पाचोरा व भडगाव, आदी तालुक्यांतूनही चाळीसगावच्या गुरांच्या बाजारात जनावरे विक्रीसाठी येतात. बाजारात पशुपालक मोठ्या संख्येने पशुधन आणत असल्याने व्यवहारातून उलाढालही मोठी होते. एका बाजारात ४० ते ५० लाखांचे खरेदी - विक्रीचे व्यवहार होतात. मात्र, २७ फेब्रुवारीपासून कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बाजार बंद केला गेला आहे. गेले पाच बाजार यामुळे भरले नाही. 

साधारणतः अडीच कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. बाजार समितीला या व्यवहारातून एक टक्का कमिशन मिळते. यामुळे बाजार समितीलाही अडीच लाखांचा फटका बसला आहे. गुरांचा बाजार सुरू करण्याची शेतकऱ्यांसह पशुपालक, व्यापाऱ्यांची मागणी आहे. तथापि, कोरोनाचा उद्रेक पाहता बाजार लवकर सुरू होण्याची शक्यता मावळली आहे.  

ऊसतोड मजुरांचे गणित बिघडणार

चाळीसगाव तालुक्यातून ५० ते ५५ हजार ऊसतोड मजूर तोडणीसाठी राज्यभर जातात. फेब्रुवारी महिन्यात ते गावी परत येण्यास सुरुवात होते. याच काळात गुरे खरेदीला वेग येतो. यावर्षी हे गणित कोलमडणार आहे. ऊसतोड मजुरांना बैलजोडी खरेदीसह विक्रीसाठीही बाजार सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरवर्षी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे या चार महिन्यांत गुरांच्या बाजारात तेजीचे पर्व असते. यावर्षी कोरोनाने ते ठप्प झाले आहे.

शेतकऱ्यांचीही कसोटी

मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात रब्बीचे उत्पन्न बाजारात आणून शेतकरी खरिपाच्या तयारीचा बिगुल वाजवितात. शेती-शिवारं पुन्हा गजबजून जातात. शेती कसण्यासाठी पिकांची शेतकऱ्यांना चांगली जोड असते. खरिपाच्या तयारीला गुरांची खरेदी करून सुरुवात होते. यावर्षी कोरोनाने ही साखळी तोडली आहे. शेतकऱ्यांचेही गुरे खरेदी - विक्रीचे गणित कोरोनामुळे बिघडले आहे. आहे त्या जनावरांना सोबत घेऊन शेतकऱ्यांना खरिपाच्या तयारीला आणि पुढे हंगामाला देखील सामोरे जावे लागणार आहे. 

गेल्यावर्षीही पाच महिने टाळेबंदी

गतवर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर २२ मार्च रोजी टाळेबंदीने गुरांचा बाजारही बंद झाला. पुढचे पाच महिने हे टाळे कायम होते. ऑगस्टमध्ये बाजार भरण्यास सुरुवात झाली. 

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावMarketबाजार