शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

जनावरांचा बाजार बंद झाल्याने मोठी उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 23:36 IST

उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या चाळीसगावच्या गुरांच्या बाजाराला कोरोनामुळे टाळे लागले आहे.

ठळक मुद्देचाळीसगाव बाजार समिती : प्रत्येक बाजारात होतात ५० लाखांचे व्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या चाळीसगावच्या गुरांच्या बाजाराला कोरोनामुळे टाळे लागले असून, गत महिन्यापासून यामुळे होणारी मोठी उलाढाल ठप्प झाली आहे. २७ फेब्रुवारी रोजी गुरांच्या बाजाराची टाळेबंदी झाली आहे. गुरांच्या खरेदी - विक्री बंदचा फटका शेतकऱ्यांसह ऊसतोड मजुरांना बसतो आहे. बाजार समितीच्या उत्पन्नाला देखील कात्री लागली आहे.

धुळे, मालेगाव, कन्नड, सिल्लोड, पाचोरा व भडगाव, आदी तालुक्यांतूनही चाळीसगावच्या गुरांच्या बाजारात जनावरे विक्रीसाठी येतात. बाजारात पशुपालक मोठ्या संख्येने पशुधन आणत असल्याने व्यवहारातून उलाढालही मोठी होते. एका बाजारात ४० ते ५० लाखांचे खरेदी - विक्रीचे व्यवहार होतात. मात्र, २७ फेब्रुवारीपासून कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बाजार बंद केला गेला आहे. गेले पाच बाजार यामुळे भरले नाही. 

साधारणतः अडीच कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. बाजार समितीला या व्यवहारातून एक टक्का कमिशन मिळते. यामुळे बाजार समितीलाही अडीच लाखांचा फटका बसला आहे. गुरांचा बाजार सुरू करण्याची शेतकऱ्यांसह पशुपालक, व्यापाऱ्यांची मागणी आहे. तथापि, कोरोनाचा उद्रेक पाहता बाजार लवकर सुरू होण्याची शक्यता मावळली आहे.  

ऊसतोड मजुरांचे गणित बिघडणार

चाळीसगाव तालुक्यातून ५० ते ५५ हजार ऊसतोड मजूर तोडणीसाठी राज्यभर जातात. फेब्रुवारी महिन्यात ते गावी परत येण्यास सुरुवात होते. याच काळात गुरे खरेदीला वेग येतो. यावर्षी हे गणित कोलमडणार आहे. ऊसतोड मजुरांना बैलजोडी खरेदीसह विक्रीसाठीही बाजार सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरवर्षी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे या चार महिन्यांत गुरांच्या बाजारात तेजीचे पर्व असते. यावर्षी कोरोनाने ते ठप्प झाले आहे.

शेतकऱ्यांचीही कसोटी

मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात रब्बीचे उत्पन्न बाजारात आणून शेतकरी खरिपाच्या तयारीचा बिगुल वाजवितात. शेती-शिवारं पुन्हा गजबजून जातात. शेती कसण्यासाठी पिकांची शेतकऱ्यांना चांगली जोड असते. खरिपाच्या तयारीला गुरांची खरेदी करून सुरुवात होते. यावर्षी कोरोनाने ही साखळी तोडली आहे. शेतकऱ्यांचेही गुरे खरेदी - विक्रीचे गणित कोरोनामुळे बिघडले आहे. आहे त्या जनावरांना सोबत घेऊन शेतकऱ्यांना खरिपाच्या तयारीला आणि पुढे हंगामाला देखील सामोरे जावे लागणार आहे. 

गेल्यावर्षीही पाच महिने टाळेबंदी

गतवर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर २२ मार्च रोजी टाळेबंदीने गुरांचा बाजारही बंद झाला. पुढचे पाच महिने हे टाळे कायम होते. ऑगस्टमध्ये बाजार भरण्यास सुरुवात झाली. 

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावMarketबाजार