शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांचा बाजार बंद झाल्याने मोठी उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 23:36 IST

उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या चाळीसगावच्या गुरांच्या बाजाराला कोरोनामुळे टाळे लागले आहे.

ठळक मुद्देचाळीसगाव बाजार समिती : प्रत्येक बाजारात होतात ५० लाखांचे व्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या चाळीसगावच्या गुरांच्या बाजाराला कोरोनामुळे टाळे लागले असून, गत महिन्यापासून यामुळे होणारी मोठी उलाढाल ठप्प झाली आहे. २७ फेब्रुवारी रोजी गुरांच्या बाजाराची टाळेबंदी झाली आहे. गुरांच्या खरेदी - विक्री बंदचा फटका शेतकऱ्यांसह ऊसतोड मजुरांना बसतो आहे. बाजार समितीच्या उत्पन्नाला देखील कात्री लागली आहे.

धुळे, मालेगाव, कन्नड, सिल्लोड, पाचोरा व भडगाव, आदी तालुक्यांतूनही चाळीसगावच्या गुरांच्या बाजारात जनावरे विक्रीसाठी येतात. बाजारात पशुपालक मोठ्या संख्येने पशुधन आणत असल्याने व्यवहारातून उलाढालही मोठी होते. एका बाजारात ४० ते ५० लाखांचे खरेदी - विक्रीचे व्यवहार होतात. मात्र, २७ फेब्रुवारीपासून कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बाजार बंद केला गेला आहे. गेले पाच बाजार यामुळे भरले नाही. 

साधारणतः अडीच कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. बाजार समितीला या व्यवहारातून एक टक्का कमिशन मिळते. यामुळे बाजार समितीलाही अडीच लाखांचा फटका बसला आहे. गुरांचा बाजार सुरू करण्याची शेतकऱ्यांसह पशुपालक, व्यापाऱ्यांची मागणी आहे. तथापि, कोरोनाचा उद्रेक पाहता बाजार लवकर सुरू होण्याची शक्यता मावळली आहे.  

ऊसतोड मजुरांचे गणित बिघडणार

चाळीसगाव तालुक्यातून ५० ते ५५ हजार ऊसतोड मजूर तोडणीसाठी राज्यभर जातात. फेब्रुवारी महिन्यात ते गावी परत येण्यास सुरुवात होते. याच काळात गुरे खरेदीला वेग येतो. यावर्षी हे गणित कोलमडणार आहे. ऊसतोड मजुरांना बैलजोडी खरेदीसह विक्रीसाठीही बाजार सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरवर्षी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे या चार महिन्यांत गुरांच्या बाजारात तेजीचे पर्व असते. यावर्षी कोरोनाने ते ठप्प झाले आहे.

शेतकऱ्यांचीही कसोटी

मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात रब्बीचे उत्पन्न बाजारात आणून शेतकरी खरिपाच्या तयारीचा बिगुल वाजवितात. शेती-शिवारं पुन्हा गजबजून जातात. शेती कसण्यासाठी पिकांची शेतकऱ्यांना चांगली जोड असते. खरिपाच्या तयारीला गुरांची खरेदी करून सुरुवात होते. यावर्षी कोरोनाने ही साखळी तोडली आहे. शेतकऱ्यांचेही गुरे खरेदी - विक्रीचे गणित कोरोनामुळे बिघडले आहे. आहे त्या जनावरांना सोबत घेऊन शेतकऱ्यांना खरिपाच्या तयारीला आणि पुढे हंगामाला देखील सामोरे जावे लागणार आहे. 

गेल्यावर्षीही पाच महिने टाळेबंदी

गतवर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर २२ मार्च रोजी टाळेबंदीने गुरांचा बाजारही बंद झाला. पुढचे पाच महिने हे टाळे कायम होते. ऑगस्टमध्ये बाजार भरण्यास सुरुवात झाली. 

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावMarketबाजार