शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

लडाख आॅन व्हील्स : अमळनेरच्या अधिकाऱ्याची पत्नीसह बुलेटवर लडाखस्वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 12:37 IST

बुलेटवरच भूतानची वारी

चुडामण बोरसेजळगाव : कला आणि छंदातून माणसाचे व्यक्तीमत्व घडत असते. पर्यटनासारखा वेगळा छंद जोपासत अमळनेर येथील अजित मुठे आणि नेहा मुठे या दाम्पत्याने थेट बुलेटवर लडाखवर स्वारी केली.मे २०१८ मध्ये लडाखचा हा रोमांचकारी अनुभव घेत हे दाम्पत्य परतले आहे.मुठे हे अहमदनगर येथे स्पेशल आॅडीटर म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्यांचे वास्तव्य नाशिक येथे आहे. यापूर्वी गेल्या वर्षी त्यांनी बुलेटवरच भूतानची वारी केली होती.अजित यांना लहानपणापासूनच पर्यटनाचा छंद आहे. दरवर्षी ते नवीन ठिकाणी सपत्नीक भटकंती करीत असतात... विशेष म्हणजे ही भटकंती बुलेटवर असते.मे २०१८ मध्य नाशिक ते श्रीनगर हा रेल्वेने प्रवास. नंतर श्रीनगर येथूून या जोडप्याने बुलेट भाड्याने घेतली. याच बुलेटवरुन जवळपास १६०० किलोमीटरचा खडतर प्रवास केला. यात मग श्रीनगरसह कारगील, लेह असे अनेक अनेक टप्पे पार करीत बुलेटस्वारी पूर्ण केली.या बुलेटस्वारीत सर्वात खडतर प्रवास झाला तो ‘झोजीला पास’ चा. काश्मीरच्या लडाख सेक्टरला जोडणारा हा सर्वात धोकादायक व अखंड बर्फ असलेला रस्ता. या झोजीला पासबाबत असे म्हटले जाते की, ‘झोजिला मे नही गिरे, तो क्या गिरे’अशा या वेड्यावाकड्या वळणाच्या अत्यंत खडतर रस्त्यावर बुलेट चालविताना देव आठविल्याशिवाय राहत नाही. हा पासही या जोडप्याने सहज पार केला.अजित यांच्या गु्रपमध्ये ४६ जण होते. त्याच आठ जोडपी होती. जी बुलेटवर होती, त्यात केरळहून पाच, गुजरातहून दोन व महाराष्ट्रातून अजित आणि त्यांच्या पत्नी. बाकी सर्व यंग बॉईज कर्नाटका, राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश येथून आलेले होते.सन १९९९ च्या युद्धाने आपल्याला कारगिल माहित झाले. मात्र प्रत्यक्षात वर्षानुवर्षे आपले जवान शत्रूशी निसर्गाशी, प्रतिकुल परिस्थितीत तोंड देऊन दिवसरात्र जाता पहारा देत असतात.कारगिल, बटालीक व द्रास असे सेक्टर आहे. यातील कारगिल सेक्टरमध्ये टायगर हिल, द्रास सेक्टरमध्ये टोलोलिंग ही शिखरे आहेत. या ठिकाणी कॅप्टन विक्रम बात्रा, कॅप्टन मनोज पांडे, रायफलमन संजयकुमा२२र, योगिदरसिंग यादव यांनी पराक्रमाची शर्थ केली होती. या ठिकाणी कॅप्टन मनोज पांडे स्मारक आहे.यासर्व विरांना ‘मानाचा मुजरा’ अर्पण करून कारगिल येथे मुक्काम झाला. आणि ११ दिवसांचा लडाख प्रवास सुखकर तेवढाच रोमांचकारी आणि आठवणीत राहिल, असा झाला.अजित हे २०१२ मध्ये काश्मीर गेलो होते. त्यावेळ जागोजागी व ५०, १०० मीटर्स अंतरावर जवान बंदोबस्तासाठी उभे होते. त्यावेळची काश्मीरची परिस्थिती धगधगती होती. आता २०१८ साली फारच कमी बंदोबस्त दिसला. लाल चौकातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते आणि तेथे फक्त १०-१५ पोलीस होते. हे बदलेले चित्र सुखदायक असल्याचा अनुभव ते सांगतात.

टॅग्स :Jalgaonजळगाव