शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

बाजारीकरणामुळे उत्तम नाटकांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 11:47 IST

विजयकुमार सैतवाल। जळगाव - मराठी नाट्यनिर्मितीसाठी सातत्य आवश्यक आहे. कारण कालचा काळ आज नसतो. मराठी रंगभूमीवरील मापदंड जेथे आहे, ...

विजयकुमार सैतवाल।जळगाव - मराठी नाट्यनिर्मितीसाठी सातत्य आवश्यक आहे. कारण कालचा काळ आज नसतो. मराठी रंगभूमीवरील मापदंड जेथे आहे, तेथेच आहे. आज सामाजिक आशय व धार्मिकता यांची सांगड नाही की राजकारणावर नाट्य लेखन होत नाही. केवळ बाजारीकरण वाढत असल्याने उत्तम नाट्य निर्मिती होत नाही व त्यातून उत्तम अभिनयही घडून येत नाही, अशी खंत लेखक व नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. नाट्यलेखन कार्यशाळेच्या निमित्त गज्वी हे जळगावात आले होते. त्या वेळी त्यांच्याशी ‘लोकमत’ने बातचित केली. या वेळी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात झालेले हा संवाद...प्रश्न- आजच्या तरुण पिढीमध्ये नाट्य गुण दिसून येतात का?उत्तर- उत्तम नाट्य निर्मितीसाठी आंगीक, आहार्य, वाचिक, सात्वीक या नाटकासाठीच्या चार गुणांसोबत तात्वीक गुणही आवश्यक आहे. मात्र तात्वीक भूमिका असलेले नाटक येत नाही आणि दुसरीकडे आजच्या तरुणांना झटपट प्रसिद्धी हवी आहे. अलौकिकतेसाठी कष्ट हवे असतात. मात्र तेच आज दिसत नाही.प्रश्न- आजच्या नाटकांमध्ये समकालील प्रश्न दिसून येतात का?उत्तर - नाही. १९७५मध्ये आणीबाणीचा विषय असो की, जयप्रकाश नारायण यांच्या नवनिर्मितीचा विषय किंवा बाबरी मशिद पाडली, मुंबई बॉम्बस्फोट, भारत-पाकिस्तान संबंध यावर कोणते नाटक आले? समकालीन प्रश्नांना घेऊन नाट्य निर्मिती होण्यासाठी त्या विषयाचा अभ्यास आवश्यक असतो.अभिरुची बदलावीपूर्वीपासून ज्या पद्धतीने नाट्य निर्मिती होते, तीच परंपरा आज कायम आहे. विरोधात जाऊन लेखन करायला कोणी तयार नाही. प्रेक्षकांनीही अभिरुची बदलून नवीन नाटक स्वीकारायला हवे. त्यातून नवीन रंगभूमी तयार होऊ शकेल.परिवर्तनशील लेखननाट्य क्षेत्रात जो कष्ट करतो, तोच टिकतो. हलके-फुलके लिहायला कष्ट लागत नाही. आज देशाबद्दल एवढ्या आत्मीयतेने बोलले जाते, मात्र ते लिखानात का येत नाही. त्याबद्दल कोठे नाटक दिसते. तरुण पिढी झटपट प्रसिद्धीच्या मागे लागते, मात्र ही झटपट प्रसिद्धी त्याच गतीने विस्मृतीत जाते. चिरकाल नाट्यनिर्मिती व आपला ठसा उमटविण्यासाठी परिवर्तनशील लेख असणे गरजेचे आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव