शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
3
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
4
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
5
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
6
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
7
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
8
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
9
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
10
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
11
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
12
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
13
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
14
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
15
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
16
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
17
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
18
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
19
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
20
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस

सामान्य जनता आणि मातीशी घट्ट नातं जपताहेत किशोर पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 3:39 PM

कष्ट,जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्याच बळावर सायकलीवर भाजी विकणारा भाजी विक्रेता ते एक यशस्वी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार किशोर पाटील यांनी केलेला प्रवास खरोखर विस्मयकारक आहे!

ठळक मुद्देभाजी विक्रेता ते एक यशस्वी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार किशोर पाटील यांचा विस्मयकारक प्रवासशेतकरी व जनतेसाठी स्वत:च्याच शासनाविरोधात अनेकदा आंदोलने

पाचोरा ( महेश कौंडिण्य)शांत, संयमी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी तितकंच आक्रमक होणारं व्यक्तिमत्व अर्थात आमदार किशोर पाटील! कष्ट,जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्याच बळावर सायकलीवर भाजी विकणारा भाजी विक्रेता ते एक यशस्वी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार किशोर पाटील यांनी केलेला प्रवास खरोखर विस्मयकारक आहे!किशोर पाटील यांचे काका व माजी आमदार आर.ओ. पाटील यांनी उद्योग क्षेत्रातून राजकारणात यशस्वी प्रवेश केला. बाळासाहेब ठाकरे यांची अफाट सभा पाचोरा शहराने अनुभवली तीसुद्धा आर. ओ .पाटील यांच्या प्रचारासाठी. आणि तिथूनच आर.ओ. पाटील यांच्या या यशासोबतच त्यांचा वसा जोपासणारा एक सक्षम युवक घडायला सुरुवात झाली होती.किशोर पाटील यांनी पोलिस कॉन्स्टेबलपदाचा राजीनामा देवून राजकारणात प्रवेश केला. २००१ मध्ये ते पाचोरा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. शिवसेनेने त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा दिली. माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणारे किशोर आप्पा सामान्यातल्या सामान्य म्हणूनच वावरत असतात.एकीकडे आर. ओ. पाटील यांच्या कामातील व्यग्रता, शांतपणा,सखोल नियोजन, शिस्तबद्ध दैनंदिनी, त्यातील कमालीचे सातत्य, विरोधकांनी कितीही आरोप-प्रत्यारोप केले तरी ते पेलण्याची धीरोदात्त वृत्ती, मुत्सद्दीपणा आणि दूरदृष्टी यासारख्या गुणांचा अनुभव किशोर पाटील यांच्या बोलणे आणि वागण्यातून येत असतो.जनतेशी थेट संपर्क ही त्यांची सगळ्यात मोठी जमेची बाजू ठरली. जेव्हा आर.ओ.पाटील यांनी आमदार म्हणून निवडणूक लढवायची नाही असं ठरवलं तेव्हा त्यांना किशोर अप्पांसारखं कुशल आणि यशस्वी नेतृत्व खुणावत होतं! सन २०१४ मध्ये किशोर आप्पा आमदार म्हणून निवडून आले.आर .ओ. पाटील यांच्याकडून मिळालेला वसा जोपासत त्यांनी सामान्य जनतेशी आणि मातीशी असलेलं आपलं नातं कधीच तोडलं नाही. त्यांनी प्रत्येक संधीचं सोनं केलं. नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार असोत की मग जिल्हा बँकेचे संचालक,उपाध्यक्ष किंवा जिल्हा दूध संघाचे संचालक असोत, आपल्या प्रत्येक भूमिकेत त्यांनी सामान्य जनतेचाच विचार बाळगला. शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हितासाठी किशोर पाटील यांनी स्वत:च्याच शासनाविरोधात कधी रास्ता रोको केला तर कधी भडगाव येथील १३२ केव्ही सबस्टेशनसाठी शासनाविरोधात अधिवेशनाच्या काळात उपोषण सुरू केले. आर.ओ.पाटील यांच्याकडून घेतलेला वसा किशोर आप्पा यांनी समर्थपणे पेललेला आहे. 

टॅग्स :Politicsराजकारण