शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

किसान एक्सप्रेस शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 17:16 IST

शेतकºयांच्या मालाला कमी वेळेत योग्य भाव मिळावा याकरिता रेल्वे प्रशासनाने ७ आॅगस्टपासून किसान एक्सप्रेस दर शुक्रवारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देप्रतिसाद वाढल्यास फेऱ्यांमध्ये होणार वाढअगदी एक किलोपासून तर अमर्याद मालाची होते बुकिंग

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : शेतकºयांच्या मालाला कमी वेळेत योग्य भाव मिळावा तसेच कोरोना काळात माल सहजरीत्या बाजारपेठेत पोहोचावे याकरिता रेल्वे प्रशासनाने ७ आॅगस्टपासून किसान एक्सप्रेस दर शुक्रवारी सुरू केली आहे. शेतकºयांसाठी हे आशेचे किरण असून मोठ्या प्रमाणात शेतकºयांकडून प्रतिसाद मिळाल्यास किसान एक्सप्रेसच्या फेºयांमध्येसुद्धा वाढ होणार आहे.कोरोनाचा परिणाम सर्व व्यवसायावर झाला आहे. शेतकºयांना आपल्या मालाचा योग्य भाव मिळावा, वेळेवर माल पोहोचावा याकरिता रेल्वे प्रशासनाने खास शेतकºयांसाठी किसान एक्सप्रेसची सुरुवात केली आहे. ७ आॅगस्टपासून दर शुक्रवारी किसान एक्सप्रेस गाडी क्रमांक ००१०७ डाऊन देवळाली-दानापूर येथून सुटते. अवघ्या तीन फेºयांमध्ये शेतकºयांकडून लाखो टन माल कमी भाड्यात पोहोच करत शेतकºयांसाठी मोठे वरदानच ठरत आहे.अगदी एक किलोपासून तर अमर्याद मालाची होते बुकिंगकोरोना काळामध्ये दिवसागणिक डिझेलचे भाव वाढल्यामुळे साहजिकच सर्व दळणवळणाचे भाव वाढले. शेतकºयांसाठी माल इतर राज्यांमध्ये पोहोचणे हे न परवडणारे होते त्यातल्या त्यात इतर राज्यांमध्ये माल पाठवायचा झाल्यास त्यासाठी कमीत कमी ४-५ टन माल असणे आवश्यक असते मात्र रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या किसान एक्सप्रेसमध्ये शेतकरी आपला माल अगदी एक किलोपासून तर अमर्याद बुक करू शकतो.एका टनाला भुसावळ ते देवळाली ३४५० प्रमाणे दर आकारले जातात तर प्रति किलोला साडेतीन रुपये दर आकारला जातो.३० तासात पोहोचतो मालभुसावळ विभागातून देवळाली, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, बºहाणपूर, खंडवा या सात स्थानकावर गाडीला थांबे देण्यात आले आहेत. जळगाव येथे रात्री ९:५५ वाजता गाडी येते तर भुसावळ स्थानकावर गाडीची वेळ रात्री १०:४५ ची वेळ आहे. गाडी स्थानकावर साधारण २० मिनिटे थांबते. माल बुक केल्यानंतर अवघ्या ३० तासांमध्ये माल हा दानापूर येथे हमखास पोहोचतो. अचूक वेळ ही या गाडीची विशेषत: आहे.वेळ, पैसा, प्रदूषणाची होते बचतट्रान्सपोर्टेशनने माल बुक केल्यानंतर माल पोहोचायला साधारण चार ते पाच दिवस लागतात. एका ट्रकमध्ये माल लोड करण्याची ठरावीक क्षमता असते. मात्र किसान एक्सप्रेस मध्ये अमर्याद माल आपण बुक करू शकतात, याशिवाय ट्रान्सपोर्टद्वारा माल बुक केल्याने जास्त पैसे मोजावे लागतात. शिवाय ५० ट्रकचे काम एकाच गाडीद्वारे होते. यामुळे प्रदूषणसुद्धा होत नाही.शेतकºयांच्या मागणीनुसार किसान एक्सप्रेस मुजफ्फरपूरपर्यंतदेवळाली ते दानापूर जाणारी किसान एक्सप्रेस शेतकºयांच्या मागणीनुसार दानापूरच्या पुढे ७० किलोमीटर मुजफ्फरपूरपर्यंत वाढविण्यात आली आहे.गाडीचे वाढवले डबेपहिल्या फेरीमध्ये फक्त गाडीला १० डबे जोडण्यात आले होते. यानंतर सोलापूर, पुण्याच्या शेतकºयांच्या मागणीनुसार सोलापूर येथून पाच तर पुणे येथून दोन डबे गाडीला जोडण्यात आल्याने १७ डब्यांची किसान एक्सप्रेस मुजफ्फरपूरपर्र्यंत धावत आहे.दरम्यान, पहिल्या फेरीमध्ये ९१ टन, दुसºया फेरीत १०० टन व तिसºया फेरीत सुमारे १५६ टनापेक्षा जास्त माल किसान एक्सप्रेसद्वारा शेतकºयांनी बुक करून दर फेरी गणिक किसान एक्सप्रेसला शेतकºयांकडून प्रतिसाद मिळत आहे.शेतकºयांनी किसान एक्सप्रेसचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. कमी वेळेमध्ये, कमी दरात माल बुकिंग होते. आपल्या मालाला नियोजित वेळेस बाजारपेठेत उपलब्ध करू शकतो. शेतकºयाकडून प्रतिसाद मिळाल्यास गाडीच्या फेºयांमध्ये वाढ करण्यात येईल.- युवराज पाटील, सीनियर डीसीएम, मध्य रेल्वे, भुसावळ विभाग.