शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

किसान एक्सप्रेस शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 17:16 IST

शेतकºयांच्या मालाला कमी वेळेत योग्य भाव मिळावा याकरिता रेल्वे प्रशासनाने ७ आॅगस्टपासून किसान एक्सप्रेस दर शुक्रवारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देप्रतिसाद वाढल्यास फेऱ्यांमध्ये होणार वाढअगदी एक किलोपासून तर अमर्याद मालाची होते बुकिंग

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : शेतकºयांच्या मालाला कमी वेळेत योग्य भाव मिळावा तसेच कोरोना काळात माल सहजरीत्या बाजारपेठेत पोहोचावे याकरिता रेल्वे प्रशासनाने ७ आॅगस्टपासून किसान एक्सप्रेस दर शुक्रवारी सुरू केली आहे. शेतकºयांसाठी हे आशेचे किरण असून मोठ्या प्रमाणात शेतकºयांकडून प्रतिसाद मिळाल्यास किसान एक्सप्रेसच्या फेºयांमध्येसुद्धा वाढ होणार आहे.कोरोनाचा परिणाम सर्व व्यवसायावर झाला आहे. शेतकºयांना आपल्या मालाचा योग्य भाव मिळावा, वेळेवर माल पोहोचावा याकरिता रेल्वे प्रशासनाने खास शेतकºयांसाठी किसान एक्सप्रेसची सुरुवात केली आहे. ७ आॅगस्टपासून दर शुक्रवारी किसान एक्सप्रेस गाडी क्रमांक ००१०७ डाऊन देवळाली-दानापूर येथून सुटते. अवघ्या तीन फेºयांमध्ये शेतकºयांकडून लाखो टन माल कमी भाड्यात पोहोच करत शेतकºयांसाठी मोठे वरदानच ठरत आहे.अगदी एक किलोपासून तर अमर्याद मालाची होते बुकिंगकोरोना काळामध्ये दिवसागणिक डिझेलचे भाव वाढल्यामुळे साहजिकच सर्व दळणवळणाचे भाव वाढले. शेतकºयांसाठी माल इतर राज्यांमध्ये पोहोचणे हे न परवडणारे होते त्यातल्या त्यात इतर राज्यांमध्ये माल पाठवायचा झाल्यास त्यासाठी कमीत कमी ४-५ टन माल असणे आवश्यक असते मात्र रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या किसान एक्सप्रेसमध्ये शेतकरी आपला माल अगदी एक किलोपासून तर अमर्याद बुक करू शकतो.एका टनाला भुसावळ ते देवळाली ३४५० प्रमाणे दर आकारले जातात तर प्रति किलोला साडेतीन रुपये दर आकारला जातो.३० तासात पोहोचतो मालभुसावळ विभागातून देवळाली, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, बºहाणपूर, खंडवा या सात स्थानकावर गाडीला थांबे देण्यात आले आहेत. जळगाव येथे रात्री ९:५५ वाजता गाडी येते तर भुसावळ स्थानकावर गाडीची वेळ रात्री १०:४५ ची वेळ आहे. गाडी स्थानकावर साधारण २० मिनिटे थांबते. माल बुक केल्यानंतर अवघ्या ३० तासांमध्ये माल हा दानापूर येथे हमखास पोहोचतो. अचूक वेळ ही या गाडीची विशेषत: आहे.वेळ, पैसा, प्रदूषणाची होते बचतट्रान्सपोर्टेशनने माल बुक केल्यानंतर माल पोहोचायला साधारण चार ते पाच दिवस लागतात. एका ट्रकमध्ये माल लोड करण्याची ठरावीक क्षमता असते. मात्र किसान एक्सप्रेस मध्ये अमर्याद माल आपण बुक करू शकतात, याशिवाय ट्रान्सपोर्टद्वारा माल बुक केल्याने जास्त पैसे मोजावे लागतात. शिवाय ५० ट्रकचे काम एकाच गाडीद्वारे होते. यामुळे प्रदूषणसुद्धा होत नाही.शेतकºयांच्या मागणीनुसार किसान एक्सप्रेस मुजफ्फरपूरपर्यंतदेवळाली ते दानापूर जाणारी किसान एक्सप्रेस शेतकºयांच्या मागणीनुसार दानापूरच्या पुढे ७० किलोमीटर मुजफ्फरपूरपर्यंत वाढविण्यात आली आहे.गाडीचे वाढवले डबेपहिल्या फेरीमध्ये फक्त गाडीला १० डबे जोडण्यात आले होते. यानंतर सोलापूर, पुण्याच्या शेतकºयांच्या मागणीनुसार सोलापूर येथून पाच तर पुणे येथून दोन डबे गाडीला जोडण्यात आल्याने १७ डब्यांची किसान एक्सप्रेस मुजफ्फरपूरपर्र्यंत धावत आहे.दरम्यान, पहिल्या फेरीमध्ये ९१ टन, दुसºया फेरीत १०० टन व तिसºया फेरीत सुमारे १५६ टनापेक्षा जास्त माल किसान एक्सप्रेसद्वारा शेतकºयांनी बुक करून दर फेरी गणिक किसान एक्सप्रेसला शेतकºयांकडून प्रतिसाद मिळत आहे.शेतकºयांनी किसान एक्सप्रेसचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. कमी वेळेमध्ये, कमी दरात माल बुकिंग होते. आपल्या मालाला नियोजित वेळेस बाजारपेठेत उपलब्ध करू शकतो. शेतकºयाकडून प्रतिसाद मिळाल्यास गाडीच्या फेºयांमध्ये वाढ करण्यात येईल.- युवराज पाटील, सीनियर डीसीएम, मध्य रेल्वे, भुसावळ विभाग.