शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

किसान एक्सप्रेस शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 17:16 IST

शेतकºयांच्या मालाला कमी वेळेत योग्य भाव मिळावा याकरिता रेल्वे प्रशासनाने ७ आॅगस्टपासून किसान एक्सप्रेस दर शुक्रवारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देप्रतिसाद वाढल्यास फेऱ्यांमध्ये होणार वाढअगदी एक किलोपासून तर अमर्याद मालाची होते बुकिंग

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : शेतकºयांच्या मालाला कमी वेळेत योग्य भाव मिळावा तसेच कोरोना काळात माल सहजरीत्या बाजारपेठेत पोहोचावे याकरिता रेल्वे प्रशासनाने ७ आॅगस्टपासून किसान एक्सप्रेस दर शुक्रवारी सुरू केली आहे. शेतकºयांसाठी हे आशेचे किरण असून मोठ्या प्रमाणात शेतकºयांकडून प्रतिसाद मिळाल्यास किसान एक्सप्रेसच्या फेºयांमध्येसुद्धा वाढ होणार आहे.कोरोनाचा परिणाम सर्व व्यवसायावर झाला आहे. शेतकºयांना आपल्या मालाचा योग्य भाव मिळावा, वेळेवर माल पोहोचावा याकरिता रेल्वे प्रशासनाने खास शेतकºयांसाठी किसान एक्सप्रेसची सुरुवात केली आहे. ७ आॅगस्टपासून दर शुक्रवारी किसान एक्सप्रेस गाडी क्रमांक ००१०७ डाऊन देवळाली-दानापूर येथून सुटते. अवघ्या तीन फेºयांमध्ये शेतकºयांकडून लाखो टन माल कमी भाड्यात पोहोच करत शेतकºयांसाठी मोठे वरदानच ठरत आहे.अगदी एक किलोपासून तर अमर्याद मालाची होते बुकिंगकोरोना काळामध्ये दिवसागणिक डिझेलचे भाव वाढल्यामुळे साहजिकच सर्व दळणवळणाचे भाव वाढले. शेतकºयांसाठी माल इतर राज्यांमध्ये पोहोचणे हे न परवडणारे होते त्यातल्या त्यात इतर राज्यांमध्ये माल पाठवायचा झाल्यास त्यासाठी कमीत कमी ४-५ टन माल असणे आवश्यक असते मात्र रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या किसान एक्सप्रेसमध्ये शेतकरी आपला माल अगदी एक किलोपासून तर अमर्याद बुक करू शकतो.एका टनाला भुसावळ ते देवळाली ३४५० प्रमाणे दर आकारले जातात तर प्रति किलोला साडेतीन रुपये दर आकारला जातो.३० तासात पोहोचतो मालभुसावळ विभागातून देवळाली, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, बºहाणपूर, खंडवा या सात स्थानकावर गाडीला थांबे देण्यात आले आहेत. जळगाव येथे रात्री ९:५५ वाजता गाडी येते तर भुसावळ स्थानकावर गाडीची वेळ रात्री १०:४५ ची वेळ आहे. गाडी स्थानकावर साधारण २० मिनिटे थांबते. माल बुक केल्यानंतर अवघ्या ३० तासांमध्ये माल हा दानापूर येथे हमखास पोहोचतो. अचूक वेळ ही या गाडीची विशेषत: आहे.वेळ, पैसा, प्रदूषणाची होते बचतट्रान्सपोर्टेशनने माल बुक केल्यानंतर माल पोहोचायला साधारण चार ते पाच दिवस लागतात. एका ट्रकमध्ये माल लोड करण्याची ठरावीक क्षमता असते. मात्र किसान एक्सप्रेस मध्ये अमर्याद माल आपण बुक करू शकतात, याशिवाय ट्रान्सपोर्टद्वारा माल बुक केल्याने जास्त पैसे मोजावे लागतात. शिवाय ५० ट्रकचे काम एकाच गाडीद्वारे होते. यामुळे प्रदूषणसुद्धा होत नाही.शेतकºयांच्या मागणीनुसार किसान एक्सप्रेस मुजफ्फरपूरपर्यंतदेवळाली ते दानापूर जाणारी किसान एक्सप्रेस शेतकºयांच्या मागणीनुसार दानापूरच्या पुढे ७० किलोमीटर मुजफ्फरपूरपर्यंत वाढविण्यात आली आहे.गाडीचे वाढवले डबेपहिल्या फेरीमध्ये फक्त गाडीला १० डबे जोडण्यात आले होते. यानंतर सोलापूर, पुण्याच्या शेतकºयांच्या मागणीनुसार सोलापूर येथून पाच तर पुणे येथून दोन डबे गाडीला जोडण्यात आल्याने १७ डब्यांची किसान एक्सप्रेस मुजफ्फरपूरपर्र्यंत धावत आहे.दरम्यान, पहिल्या फेरीमध्ये ९१ टन, दुसºया फेरीत १०० टन व तिसºया फेरीत सुमारे १५६ टनापेक्षा जास्त माल किसान एक्सप्रेसद्वारा शेतकºयांनी बुक करून दर फेरी गणिक किसान एक्सप्रेसला शेतकºयांकडून प्रतिसाद मिळत आहे.शेतकºयांनी किसान एक्सप्रेसचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. कमी वेळेमध्ये, कमी दरात माल बुकिंग होते. आपल्या मालाला नियोजित वेळेस बाजारपेठेत उपलब्ध करू शकतो. शेतकºयाकडून प्रतिसाद मिळाल्यास गाडीच्या फेºयांमध्ये वाढ करण्यात येईल.- युवराज पाटील, सीनियर डीसीएम, मध्य रेल्वे, भुसावळ विभाग.