शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

श्वाश्वत सिंचनावरीलच खरीप तरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 23:32 IST

उत्पादन जेमतेम, पण इस्राईल देशालाही मागे टाकणारे शेतकºयांचे व्यवस्थापन

ठळक मुद्देकपाशीचे क्षेत्र सर्वाधिकपावसाच्या टक्केवारीचे गौडबंगाल...!फक्त पावसावर उत्पादनाचे धाडससिंचन क्षेत्र नगण्य

खेडगाव, ता. भडगाव - यावर्षी पावसाळ्यातील चार महिन्यात मोजून चार तारखांना फक्त २०-३० मि.मी. पाऊस पडूनही काही शेतकºयांचा हंगाम आला़ मात्र अधिक दिवसाचा पावसाचा खंड उत्पादनासाठी मारक ठरला़ यात ठिबक संच, जलयुक्त शिवारांतर्गत नालाबांध व गिरणा नदी काठ अशा सिंचन सुविधा असलेल्या क्षेत्रातील खरीप तरला आहे.तालुक्यात २६००० हेक्टरवर कपाशीची लागवड आहे. त्या खालोखाल मका ३००० हेक्टरवर, ज्वारी-बाजरी १५०० हेक्टरवर, कडधान्य १२०० हेक्टरवर, तर बागायतीत केळी-ऊस, फळबागायत २००० हेक्टरवर जवळजवळ आहे. यात सर्वाधिक क्षेत्र कपाशीचे आहे़ हंगामात हलक्या जमिनीवरील पीक हलके पडले. तर भारी जमिनीवरील ज्वारी-बाजरी व मक्याचे उत्पादन ४०-५० टक्के इतके घटले.पावसाळ्यात मृग नक्षत्रात सुरुवातीला, त्यानंतर १४-१८ जुलै, २४-२६ जुलै, १९-२० आॅगस्ट व २०-२१ सप्टेंबरदरम्यान चारच तारखांना दोन आकडी पाऊस झाला. शेतीदृष्ट्या २० ते ३० मि.मी. पुढचा पाऊसच लाभदायक असतो, मग या चार तारखांचा पाऊस मोजल्यास तो मंडळपरत्वे १२० ते १५० मि.मी.च भरतो. शासकीय मोजमापानुसार ३०० ते ३५० मि.मी. पाऊस तालुक्यात झाला. कधी ४ मि.मी तर कधी ८-९ मि.मी. हा फक्त अंगावरील कपडे ओले करणारा पाऊस शेतीसाठी कुचकामी ठरतो. तो ग्राह्य धरावा का? हा प्रश्नच आहे़ मग पावसाच्या टक्केवारीनुसार इस्राईल देशालाही मागे टाकत विनाठिबक संचाशिवाय शेतकºयांनी खरीप बहरवला. फक्त रसशोषक किडींचा प्रादुर्भाव व पावसाच्या मोठ्या खंडामुळे कपाशीचा हंगाम काहीसा हातून निसटला. कपाशीचे पीक प्रमुख असल्याने, यावरच शेतकºयांची आर्थिक मदार आहे. त्यामानाने या पिकासाठी सिंचन सुविधा येथे मात्र नाही, तरीदेखील पावसाचे जून, जुलै, आॅगस्ट महिन्यात दोन मोठे खंड पडूनही शेतकºयांनी आंतरमशागत, रासायनिक खतांच्या योग्य मात्रा, संजीवकाच्या फवारण्या यातून पीक शेतात बहरवले. प्रतिकूल हवामानात रसशोषक किडींचा व अळींचा उपद्रव वाढला़ त्यातच श्वाश्वत (ठोस) सिंचनाची सोय नसल्याने शेतकºयांची थोडी पंचाईत झाली. अन्यथा इस्राईल देशालाही लाजवेल असे व्यवस्थापन शेतकºयांनी ठेवले. जुवार्डी, आडळसे या अवर्षण प्रवण भागात तर कपाशीत ठिबक संच असूनही विहिरीत पाणी नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत़ खरिपातील कपाशी या पिकासाठी फक्त १०-२० टक्के क्षेत्रात या वेळेस सिंचन सुविधा उपलब्ध होती. इतरत्र विहिरींना पाणी नसल्याने गिरणा नदीकाठ, नालाबांध, ठिबक संच बसविलेल्या क्षेत्रातील खरीप तरला.सुरुवातीला खरीप हंगाम दृष्ट लागण्यासारखा होता. मात्र पीकवाढीच्या अवस्थेत पावसात खंड पडला, पीक हिरवे राहिले पण कपाशीची फुलपाती गळून उत्पादन घटले व आता कपाशी लाल पडू लागल्याने फरदडची सोय उरली नाही.-प्रदीप महाजन, कोळगाव ता. भडगाव.सिंचनाची सोय असलेल्या जमिनीवर खरीप हंगाम चांगला आला़ तर इतरत्र जेमतेमच आहे.-ताराचंद चव्हाण, नालबंदी, ता. भडगाव.