शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

श्वाश्वत सिंचनावरीलच खरीप तरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 23:32 IST

उत्पादन जेमतेम, पण इस्राईल देशालाही मागे टाकणारे शेतकºयांचे व्यवस्थापन

ठळक मुद्देकपाशीचे क्षेत्र सर्वाधिकपावसाच्या टक्केवारीचे गौडबंगाल...!फक्त पावसावर उत्पादनाचे धाडससिंचन क्षेत्र नगण्य

खेडगाव, ता. भडगाव - यावर्षी पावसाळ्यातील चार महिन्यात मोजून चार तारखांना फक्त २०-३० मि.मी. पाऊस पडूनही काही शेतकºयांचा हंगाम आला़ मात्र अधिक दिवसाचा पावसाचा खंड उत्पादनासाठी मारक ठरला़ यात ठिबक संच, जलयुक्त शिवारांतर्गत नालाबांध व गिरणा नदी काठ अशा सिंचन सुविधा असलेल्या क्षेत्रातील खरीप तरला आहे.तालुक्यात २६००० हेक्टरवर कपाशीची लागवड आहे. त्या खालोखाल मका ३००० हेक्टरवर, ज्वारी-बाजरी १५०० हेक्टरवर, कडधान्य १२०० हेक्टरवर, तर बागायतीत केळी-ऊस, फळबागायत २००० हेक्टरवर जवळजवळ आहे. यात सर्वाधिक क्षेत्र कपाशीचे आहे़ हंगामात हलक्या जमिनीवरील पीक हलके पडले. तर भारी जमिनीवरील ज्वारी-बाजरी व मक्याचे उत्पादन ४०-५० टक्के इतके घटले.पावसाळ्यात मृग नक्षत्रात सुरुवातीला, त्यानंतर १४-१८ जुलै, २४-२६ जुलै, १९-२० आॅगस्ट व २०-२१ सप्टेंबरदरम्यान चारच तारखांना दोन आकडी पाऊस झाला. शेतीदृष्ट्या २० ते ३० मि.मी. पुढचा पाऊसच लाभदायक असतो, मग या चार तारखांचा पाऊस मोजल्यास तो मंडळपरत्वे १२० ते १५० मि.मी.च भरतो. शासकीय मोजमापानुसार ३०० ते ३५० मि.मी. पाऊस तालुक्यात झाला. कधी ४ मि.मी तर कधी ८-९ मि.मी. हा फक्त अंगावरील कपडे ओले करणारा पाऊस शेतीसाठी कुचकामी ठरतो. तो ग्राह्य धरावा का? हा प्रश्नच आहे़ मग पावसाच्या टक्केवारीनुसार इस्राईल देशालाही मागे टाकत विनाठिबक संचाशिवाय शेतकºयांनी खरीप बहरवला. फक्त रसशोषक किडींचा प्रादुर्भाव व पावसाच्या मोठ्या खंडामुळे कपाशीचा हंगाम काहीसा हातून निसटला. कपाशीचे पीक प्रमुख असल्याने, यावरच शेतकºयांची आर्थिक मदार आहे. त्यामानाने या पिकासाठी सिंचन सुविधा येथे मात्र नाही, तरीदेखील पावसाचे जून, जुलै, आॅगस्ट महिन्यात दोन मोठे खंड पडूनही शेतकºयांनी आंतरमशागत, रासायनिक खतांच्या योग्य मात्रा, संजीवकाच्या फवारण्या यातून पीक शेतात बहरवले. प्रतिकूल हवामानात रसशोषक किडींचा व अळींचा उपद्रव वाढला़ त्यातच श्वाश्वत (ठोस) सिंचनाची सोय नसल्याने शेतकºयांची थोडी पंचाईत झाली. अन्यथा इस्राईल देशालाही लाजवेल असे व्यवस्थापन शेतकºयांनी ठेवले. जुवार्डी, आडळसे या अवर्षण प्रवण भागात तर कपाशीत ठिबक संच असूनही विहिरीत पाणी नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत़ खरिपातील कपाशी या पिकासाठी फक्त १०-२० टक्के क्षेत्रात या वेळेस सिंचन सुविधा उपलब्ध होती. इतरत्र विहिरींना पाणी नसल्याने गिरणा नदीकाठ, नालाबांध, ठिबक संच बसविलेल्या क्षेत्रातील खरीप तरला.सुरुवातीला खरीप हंगाम दृष्ट लागण्यासारखा होता. मात्र पीकवाढीच्या अवस्थेत पावसात खंड पडला, पीक हिरवे राहिले पण कपाशीची फुलपाती गळून उत्पादन घटले व आता कपाशी लाल पडू लागल्याने फरदडची सोय उरली नाही.-प्रदीप महाजन, कोळगाव ता. भडगाव.सिंचनाची सोय असलेल्या जमिनीवर खरीप हंगाम चांगला आला़ तर इतरत्र जेमतेमच आहे.-ताराचंद चव्हाण, नालबंदी, ता. भडगाव.