शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

खारघर दुर्घटना: विधीमंडळाचे अधिवेशन बोलवा, निवृत्ती न्यायाधीशांमार्फत चौकशी करा: आमदार शिरीष चौधरी

By सुनील पाटील | Updated: April 24, 2023 17:51 IST

सरकारने अप्पासाहेब धर्माधिकारी यांना २५ लाखाचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यासाठी १३ कोटी रुपये खर्च केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : खारघर दुर्घटनेला सरकार जबाबदार असून याची तीन निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यास राज्य विधीमंडळाचे दोन दिवसीय अधिवेशन बोलवावे, अशी मागणी करतानाच या घटनेत मृताचा आकडा १४ दाखविण्यात आलेला असला तरी प्रत्यक्षात ही संख्या त्यापेक्षा जास्त असल्याचा दावा प्रदेश कॉग्रेसचे उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष चौधरी यांनी सोमवारी कॉग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला.

सरकारने अप्पासाहेब धर्माधिकारी यांना २५ लाखाचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यासाठी १३ कोटी रुपये खर्च केले. राज्यभरातून श्री सदस्यांना भर उन्हात थांबवून त्यांची राहण्याची व खाण्यापिण्याचीही सोय केली नाही. आमच्यामागे महाराष्ट्राची किती मोठी ताकद आहे, हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दाखविण्याचा हा प्रयत्न मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केला. शहा भाषण करीत असताना तेथे रुग्णवाहिका येत होत्या व जखमींना नेत होते, मात्र स्वत: एसीत बसणाऱ्या व्यासपीठावरील कोणीच त्याकडे पाहिले नाही. उष्माघातासह चेंगराचेंगरी झाल्याने त्यातही काहींचा मृत्यू झाल्याचा दावा आमदार चौधरी यांनी केला. अशा घटनांमध्ये तात्काळ सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले जातात, मग येथे आयोजकांवर का गुन्हे दाखल केले नाहीत. सरकारच आयोजक असल्याने कदाचित हा कायदा त्यांच्यासाठी लागू नसावा असा टोलाही त्यांनी लगावला. मृत्याच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत देण्याचे जाहिर करणे म्हणजे जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, शहराध्यक्ष श्याम तायडे आदी उपस्थित होते.

राजकीय भांडवल कसे होऊ शकते

या घटनेचे राजकीय भांडवल करु नये असे आवाहन आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले आहे. मात्र झालेली दुर्घटना कशी नाकारता येईल. भांडवल कसे होऊ शकते असा सवाल आमदार शिरीष चौधरी यांनी केला. माझा वापर करण्यात आला, सत्ताधाऱ्यांना मते देऊ नका अशा पोस्ट धर्माधिकारी यांच्या नावाने व्हायरल होत आहेत, मात्र ही पोस्ट नक्कीच त्यांची नाही, त्यांच्या नावाने दुसरेच कोणी हा प्रकार करीत असल्याचेही चौधरी म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Jalgaonजळगाव