शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

खान्देश जल परिषद झाली, पुढे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:19 IST

लेखक - योगेंद्र जुनागडे, धुळे धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, नगर हा उत्तर महाराष्ट्राचा भूभाग या राज्याचा भाग आहे की ...

लेखक - योगेंद्र जुनागडे, धुळे

धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, नगर हा उत्तर महाराष्ट्राचा भूभाग या राज्याचा भाग आहे की नाही? या प्रश्नाचे उत्तर एकदा राज्यकर्त्यांनी दिले पाहिजे. त्यातल्या त्यात नाशिक व नगर जिल्हे मुंबई, पुण्यास जोडून असल्याने तेथे काही ना काही मिळते. पण धुळे, नंदुरबार, जळगावचे काय? उद्योग, शेती, सिंचन सर्वचबाबतीत हे जिल्हे मागे आहेत. मानव विकास निर्देशांकातही नंदुरबार, धुळे जिल्हे राज्यातील सर्व जिल्ह्यांत शेवटी आहेत. सिंचनाच्याबाबतीत तर पूर्णतः दुर्लक्षित आहेत. धुळे, नंदुरबारमधून तापी, नर्मदा वाहते. त्यावर उकाई, सरदार सरोवरसारखी महाकाय धरणे गुजरातच्या हद्दीवर बांधण्यात आली. या धरणांसाठी हजारो एकर सुपीक जमीन, धनदाट जंगले, चार डझन गावे महाराष्ट्राची बुडाली. महाराष्ट्राला आजअखेर लाभ काय मिळाला? तर याचे उत्तर आहे शून्य ! सरदार सरोवरामधील ठरलेली पूर्ण वीजही कधी मिळाली नाही. बॅकवॉटरमधून तरतूद केलेले किरकोळ पाणीही नंदुरबार, धुळे जिल्ह्यास अद्याप मिळाले नाही. खरे म्हणजे हे बॅकवॉटर सातपुड्यात बोगदा खणून महाराष्ट्रात पोहोचवायचा खर्चही तेव्हा नर्मदेवरील धरणाच्याच कामाचा भाग म्हणून त्यात सामील करावयास हवा होता. धरण व कालव्यांच्या कामासोबतच त्या-त्यावेळीच हे बोगद्याचे काम करायला हवे होते. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान या चार राज्यांचा जो नर्मदा करार झाला, त्यात या कामाचा समावेश व्हायला हवा होता. तेव्हा ते शक्यही होते. आता त्यासाठी एवढी मोठी तरतूद अवघड बनली आहे. या बोगदा प्रश्नावर नंदुरबारच्या खासदार डॉ. हीना गावीत यांनी संसदेच्या या अधिवेशनात आवाज उठविला.

सरदार सरोवर विस्थापनाप्रमाणेच त्याकाळी उकाई धरण विस्थापन आंदोलन झाले. पण पदरी फारसे काही पडले नाही. धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांचा सिंचनाचा बॅकलॉग मोठा आहे. वरील मोठी धरणे, तापीतून वाहून जाणारे भरपूर पाणी, नार पार नद्यांचे पाणी वळविणे व नदीजोड करणे या मार्गाने या भागासाठी पुरेशा पाण्याची उपलब्धता होऊ शकते. पण ते पाणी शेती व उद्योगांपर्यंत पोहोचविण्याची शासनाची नसलेली मानसिक तयारी व जिद्दीचा अभाव शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी स्तरावरही दिसून येतो. त्यामुळे वर्षानुवर्षे हा विषय तसाच रखडला आहे. या पार्श्वभूमीवर आता समाजातून काही मंडळी पुढे सरसावली आहेत. या विषयास त्यांनी चालना दिली आहे. त्यांना बळ दिले पाहिजे. विविध संघटना कार्यकर्त्यांच्या सहभागाने गठित झालेल्या उत्तर महाराष्ट्र जल परिषदेच्या कार्यक्रमात हा विषय खूप खोलवर चर्चिला गेला. त्यातून एक व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्णय झाला. अमळनेरजवळचे तापीवरील पाडळसरे धरण, नार पारचे ७० टक्के पाणी उत्तर महाराष्ट्रास मिळाले पाहिजे, आदी मागण्या घेऊन जल परिषद आता आंदोलन छेडणार आहे.

परिषदने आतापर्यंत ४८ आमदार, ८ खासदारांना, मुख्यमंत्री व शरद पवार यांना निवेदने दिली. नितीन गडकरींकडूनही त्यांना अपेक्षा आहेत. निवेदनांची गांभीर्याने दखल घेतलेली नाही, म्हणून आता परिषदेकडून नंदुरबार ते सुरगाणा जलयात्रा काढली जाणार आहे. त्यानंतर विभागीय कार्यालयावर मोर्चा काढावयाचे समितीचे नियोजन आहे. जल परिषदेचे याबाबतचे नियोजन उत्तम आहे. आता त्यांचे हात आणखी अधिक मजबूत करण्यासाठी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील जनतेने पुढे येणे आवश्यक आहे.