शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

खळवाडीला आग, लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 19:51 IST

रत्नापिंप्री येथील घटना: मतदान यंत्रे आगीपासून वाचली

रत्नापिंप्री, ता. पारोळा : रत्नापिंप्री येथे सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक खळवाडीला आग लागली. गावात एकीकडे लग्नात गर्दी व दुसरीकडे गावात दुपारी उन्हामुळे स्मशान शांतता होती. अशावेळी अचानक ही प्रचंड आग लागली. यामुळे १९ शेतकऱ्यांचा चारा व शेतीचे साहित्य मोठ्या प्रमाणात खाक होवून लाखो रुपयांचे नुकसान झाले.या आगीत राजेंद्र पांडुरंग पाटील , भाऊसाहेब बाबूलाल पाटील , राजेेंंद्र देविदास पाटील, प्रभाकर देविदास पाटील, मुरलीधर दगा पाटील, गणेश दगडू पाटील, धुडकू गिरधर पाटील, बाळू बाजीराव वानखेडे, युवराज सैतान पाटील, दिनकर रघुनाथ पाटील, सुकलाल हसरत पाटील, अभिमान दौलत पाटील, विनायक कळू पाटील, सोनू मन्सारम पाटील, पंढरीनाथ महारु पाटील, लोटन दौलत पाटील, आबा नारायण पाटील, विजय हिरमन पाटील, प्रविण रामदास पाटील या सर्वं शेतकरी बांधवांचा चारा व शेड , शेतीपयोगी वस्तू आगीत खाक झाल्या. यामुळे सायंकाळी गुरांना टाकण्यास चारा नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली.मतदान यंत्रे वाचलीमंगळवारी होणाºया मतदानाच्या दृष्टीने आलेले कर्मचारी भगवान पाटील व मनोज ठाकरे हे लघुशंकेला जात असता त्याचे लक्षात आले की, खळवाडीला आग लागली आहे. त्यांनी गावात लगेच फोन करून कळविले तोपर्यनत त्यांनी जवळच असलेली गुरेढोरे सोडली त्यामध्ये भगवान पाटील यांचे हाताला दुखापत झाली. लगेचच मतदान केंद्राला आग लागलेली पहिली व खोली उघडून पूर्ण सामान काढुन दुसरीकडे हलविला. तोपर्यत बाहेर लावलेले कागद , बॅनर जळून खाक झाले. मनोज ठाकरे यांचे प्रसंगधवनने मतदान केंद्रतील नुकसान वाचले.आग विझविण्यासाठी पारोळा व अमळनेर अग्निशमनच्या गाड्या हजर झाल्या. अमळनेर तहसीलदार ज्योती देवरे, अमळनेर पीआय अनिल बडगुजर, पारोळा एपीआय जितद्र खैरनार यांनीही घटनास्थळी भेट दिली. अमळनेर अग्निशमन कर्मचारी नितीन खैरनार, भिका संदानशिव, फारुक शेख, दिनेश बिºहाडे, जफर खान, आनंदा झिम्बल, कमलेश पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. संध्याकाळपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.नुकसान भरपाई मिळावीऐन दुष्काळात शेतकऱ्यांनी मुक्या प्राण्यांसाठी चाºयाची व्यवस्था करून ठेवली होती. मात्र या आगीमुळे संपूर्ण चारा जळून खाक झाला, अशा परिस्थितीत पैसे देऊनही चारा उपलब्ध होणार नाही. शासनाने लक्ष देऊन त्यांना झालेल्या नुकसानीचा मोबदला द्यावा व चाºयाची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी होत आहे.