शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कस्तुरबांच्या जावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 12:03 IST

स्तुरबाला गांधीजींची नाना रूपे आठवलीत. वेगवेगळे प्रयोग करणारे गांधीजी. सतत नव्याचा शोध घेतात. जुने उचलतात. त्यावर नव्याचे कलम करतात. समूहाला बदलाची दीक्षा देतात. कालच्याहून आज सुंदर व्हावा यासाठी धडपडतात. कस्तुरबा मायदेशी परतली होती. आपला देश. आपली माती. आपली माणसे. आपली भाषा. आपले आभाळ. आपले लढे.दोघांनी धावत-पळत राजकोट, पोरबंदर गाठले. नातलगांच्या ...

स्तुरबाला गांधीजींची नाना रूपे आठवलीत. वेगवेगळे प्रयोग करणारे गांधीजी. सतत नव्याचा शोध घेतात. जुने उचलतात. त्यावर नव्याचे कलम करतात. समूहाला बदलाची दीक्षा देतात. कालच्याहून आज सुंदर व्हावा यासाठी धडपडतात. कस्तुरबा मायदेशी परतली होती. आपला देश. आपली माती. आपली माणसे. आपली भाषा. आपले आभाळ. आपले लढे.दोघांनी धावत-पळत राजकोट, पोरबंदर गाठले. नातलगांच्या गाठीभेटी घेतल्या. सुख-दु:खे वाटून घेतलीत. वाटून घेण्यासारखी तर दु:खेच होती. लक्ष्मीदास व करसनदास यांच्या विधवा बायकांची भेट घेतली. कस्तुरबाचे मन अपार दु:खी झाले. आपल्या जावांचा उकर्ष काळ तिने अनुभवला होता. तिला आपल्या जावांची आठवण यायची. मोठी जाऊबाई तिची खूप काळजी घ्यायच्या. गांधीजी जेव्हा विलायतेत शिकायला गेले तेव्हा त्यांचीच तर सोबत होती. त्या सुख-दु:खाच्या साथीदार होत्या. एकमेकांची एकमेकींना मदत होती. त्या जावांची छान गट्टी जमायची. हे दुर्मीळ होते.ते सोन्याचे दिवस आता संपले होते. मुंग्यांच्या वारुळाला जणू आग लागावी तसे कस्तुरबांचे झाले. जावांच्या कपाळीचा सौभाग्यसूर्य मावळला होता. त्यांच्या गात्रावर आधीची उजळ कांती आता उरली नव्हती. त्या तिच्या गळ्यात गळा घालून मिरवलेल्या सख्या उरल्या नव्हत्या आता. कितीदा त्या एकमेकींच्या अंगावर हात टाकून पडल्या होत्या. एकमेकींशी मनीचे गुज बोलल्या होत्या. कुजबुजल्या होत्या. रुसल्या-भांडल्या-करवादल्या होत्या. पुन्हा न करमून एक झाल्या होत्या. आताच्या या सख्या नसून वृद्ध, गंभीर, प्रौढ बायका होत्या. त्यांच्या भोवताली जणू काही वयाचा कोट होता. त्यांना साद घालता येत नव्हती. कस्तुरबाचे पुढे उचललेले पाऊल मागे ओढले गेले होते. त्याच म्हणाल्या, ‘अग कस्तुर. येना, बस. उभी का अशी? केव्हा आलीस? कशी आहेस?’ तिचे यावर मौन होते. रंगीत वस्त्रांमध्ये त्यांना बघायची सवय असलेल्या कस्तुरबाला त्यांना अशा विधवा वेषात बघावे लागले. ती दमून गेली. त्यांच्या हातातील रंगीत काकणे उतरली होती. आता त्या गंगा भागीरथी झाल्या होत्या. पवित्र तर त्या होत्याच; पण आता वैधव्याने त्यांना अग्निपरीक्षा द्यायला लावले होते.ती हतबुद्ध होऊन त्यांच्यासमोर बसली. तिला लग्नात धमाल करणाºया जावा आठवत राहिल्या. देवघरात मोठ्याने भजने गाणाºया जावा आठवत राहिल्यात. आता त्यांचा कंठस्वर एकदम मौन-मूक झाला होता. अनिवारपणे आलेला हुंदका तिला रोखता आला नाही. तिच्या मनाभोवती आठवणींचा जाळ पेटला होता.कस्तुरबांचे जीवन अनेक अर्थाने पारिवारिक होते. कौटुंबिक होते. कुटुंब हा तिच्या चिंतनाचा मूलाधार होता. घर उभं राहावं, टिकावं आणि जगाला मार्गदर्शक व्हावं या दिशेने ती प्रयत्नशील राहिली. गांधी कुटुंबात पाऊल ठेवल्यावर तिची मोठी म्हणवणारी जाऊ खरं तर बरोबरीची होती, किंबहुना बा मोठ्याही होत्या. एक सुरम्य स्वप्न आपल्या जावांच्या सोबत कस्तुरबाने विणले होते. आज त्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. (क्रमश:)- प्रा.डॉ. विश्वास पाटील

टॅग्स :Jalgaonजळगाव