शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

कस्तुरबांच्या जावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 12:03 IST

स्तुरबाला गांधीजींची नाना रूपे आठवलीत. वेगवेगळे प्रयोग करणारे गांधीजी. सतत नव्याचा शोध घेतात. जुने उचलतात. त्यावर नव्याचे कलम करतात. समूहाला बदलाची दीक्षा देतात. कालच्याहून आज सुंदर व्हावा यासाठी धडपडतात. कस्तुरबा मायदेशी परतली होती. आपला देश. आपली माती. आपली माणसे. आपली भाषा. आपले आभाळ. आपले लढे.दोघांनी धावत-पळत राजकोट, पोरबंदर गाठले. नातलगांच्या ...

स्तुरबाला गांधीजींची नाना रूपे आठवलीत. वेगवेगळे प्रयोग करणारे गांधीजी. सतत नव्याचा शोध घेतात. जुने उचलतात. त्यावर नव्याचे कलम करतात. समूहाला बदलाची दीक्षा देतात. कालच्याहून आज सुंदर व्हावा यासाठी धडपडतात. कस्तुरबा मायदेशी परतली होती. आपला देश. आपली माती. आपली माणसे. आपली भाषा. आपले आभाळ. आपले लढे.दोघांनी धावत-पळत राजकोट, पोरबंदर गाठले. नातलगांच्या गाठीभेटी घेतल्या. सुख-दु:खे वाटून घेतलीत. वाटून घेण्यासारखी तर दु:खेच होती. लक्ष्मीदास व करसनदास यांच्या विधवा बायकांची भेट घेतली. कस्तुरबाचे मन अपार दु:खी झाले. आपल्या जावांचा उकर्ष काळ तिने अनुभवला होता. तिला आपल्या जावांची आठवण यायची. मोठी जाऊबाई तिची खूप काळजी घ्यायच्या. गांधीजी जेव्हा विलायतेत शिकायला गेले तेव्हा त्यांचीच तर सोबत होती. त्या सुख-दु:खाच्या साथीदार होत्या. एकमेकांची एकमेकींना मदत होती. त्या जावांची छान गट्टी जमायची. हे दुर्मीळ होते.ते सोन्याचे दिवस आता संपले होते. मुंग्यांच्या वारुळाला जणू आग लागावी तसे कस्तुरबांचे झाले. जावांच्या कपाळीचा सौभाग्यसूर्य मावळला होता. त्यांच्या गात्रावर आधीची उजळ कांती आता उरली नव्हती. त्या तिच्या गळ्यात गळा घालून मिरवलेल्या सख्या उरल्या नव्हत्या आता. कितीदा त्या एकमेकींच्या अंगावर हात टाकून पडल्या होत्या. एकमेकींशी मनीचे गुज बोलल्या होत्या. कुजबुजल्या होत्या. रुसल्या-भांडल्या-करवादल्या होत्या. पुन्हा न करमून एक झाल्या होत्या. आताच्या या सख्या नसून वृद्ध, गंभीर, प्रौढ बायका होत्या. त्यांच्या भोवताली जणू काही वयाचा कोट होता. त्यांना साद घालता येत नव्हती. कस्तुरबाचे पुढे उचललेले पाऊल मागे ओढले गेले होते. त्याच म्हणाल्या, ‘अग कस्तुर. येना, बस. उभी का अशी? केव्हा आलीस? कशी आहेस?’ तिचे यावर मौन होते. रंगीत वस्त्रांमध्ये त्यांना बघायची सवय असलेल्या कस्तुरबाला त्यांना अशा विधवा वेषात बघावे लागले. ती दमून गेली. त्यांच्या हातातील रंगीत काकणे उतरली होती. आता त्या गंगा भागीरथी झाल्या होत्या. पवित्र तर त्या होत्याच; पण आता वैधव्याने त्यांना अग्निपरीक्षा द्यायला लावले होते.ती हतबुद्ध होऊन त्यांच्यासमोर बसली. तिला लग्नात धमाल करणाºया जावा आठवत राहिल्या. देवघरात मोठ्याने भजने गाणाºया जावा आठवत राहिल्यात. आता त्यांचा कंठस्वर एकदम मौन-मूक झाला होता. अनिवारपणे आलेला हुंदका तिला रोखता आला नाही. तिच्या मनाभोवती आठवणींचा जाळ पेटला होता.कस्तुरबांचे जीवन अनेक अर्थाने पारिवारिक होते. कौटुंबिक होते. कुटुंब हा तिच्या चिंतनाचा मूलाधार होता. घर उभं राहावं, टिकावं आणि जगाला मार्गदर्शक व्हावं या दिशेने ती प्रयत्नशील राहिली. गांधी कुटुंबात पाऊल ठेवल्यावर तिची मोठी म्हणवणारी जाऊ खरं तर बरोबरीची होती, किंबहुना बा मोठ्याही होत्या. एक सुरम्य स्वप्न आपल्या जावांच्या सोबत कस्तुरबाने विणले होते. आज त्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. (क्रमश:)- प्रा.डॉ. विश्वास पाटील

टॅग्स :Jalgaonजळगाव