शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

गाढोद्याची केळी पोहचली काश्मिरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:13 IST

रामचंद्र पाटील यांनी वडिलोपार्जित शेतीला दिली आधुनिकतेची जोड : इतर पिकांचेही घेतात उत्पन्न

जळगाव : तालुक्यातील गिरणा व तापी नदीच्या मधोमध असलेल्या गाढोदा येथील रामचंद्र सीताराम पाटील यांनी आपल्या शेतात पारंपरिक व आधुनिक शेतीचा संगम घालत आज वडिलोपार्जित शेतीला आधुनिकतेची जोड दिली. जिल्ह्यापर्यंत ओळखली जाणारी गाढोद्याची केळीचा आता काश्मिर ते उत्तरप्रदेशपर्यंत पुरवठा केला जात आहे.रामचंद्र पाटील यांचे वडील सिताराम पाटील यांच्याकडे १६ बिघे जमीन होती. या वडिलोपार्जित जमिनीत त्यांनी आधूनिकतेची जोड दिली. गिरणा व तापी नदीच्या काठालगत केळीचेच पीक मुख्यत्वेकरून घेतले जाते. मात्र, हे पीक घेताना अनेकदा निसर्गाच्या प्रकोप देखील शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत केळी पीक हे बेभरवशाचेच पीक समजले जाते. हवमानाचा अभ्यास, वादळ किंवा जास्त तापमानाचा फटका केळीला बसणार नाही यासाठीची उपाययोजना करत ते केळीची लागवड करतात.स्वत:च पिकवतात व स्वत:च विकतातअनेकदा शेतकऱ्यांची व्यापा-यांकडून फसगत किं वा नुकसान होत असते. शेतकरी जोपर्यंत आपल्याच मालाला बाजार मिळवून देणार नाही तो पर्यंत त्याची व्यापाºयांकडून फसगत ही होणारच असते. हे ओळखून त्यांनी आपल्या शेतीत लागवड करून घेतलेल्या केळी स्वत:च बाजारात न्यायला सुरुवात केली. यासाठी मोठा मुलगा निलेश पाटील प्रयत्न करत असून, केळी व्यापारी किंवा एजंटच्या माध्यमातून विक्री करीत स्वत:चा व्यवसाय सुरु करत वेगवेगळ्या राज्यांमध्ये गाढोद्याच्या केळीचा पुरवठा करत आहेत. तो आता काश्मीर आणि उत्तरप्रदेशातही केळी पाठविली जात आहे. शेतकºयांनी आता व्यापारी किंवा शासनाच्या भरवश्यावर न राहता आपल्या मालाला बाजारपेठ कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.मेहनतीमुळे १६ बिघे जमीनीचे झाले ६० बिघेरामचंद्र पाटील यांना वारसाहक्काने मिळालेल्या १६ बिघे जमीनीत केळीची लागवड करत गेल्या २० वर्षांमध्ये १६ बिघे जमीनीचे रुपांतर ६० बिघे जमिनीत केले असून, सध्यस्थितीत ते ३७ बिघे जमिनीवर केळीची लागवड करतात. यासह कापूस, मका, ज्वारी हे पीक देखील घेत असतात. मात्र, जमिनीचे काही क्षेत्र ते दरवर्षी शेतीतील वेगवेगळ्या प्रयोगांना चालना देण्यासाठी राखीव ठेवतात. या जमीनीत हळद, तीळ, फळबाग किंवा इतर धान्य घेत आधुनिक शेतीचे प्रयोग ते करीत असतात.शेतकरी जोपर्यंत पारंपरिक पध्दतीने शेती करत राहिंल तोपर्यंत शेती शेतकºयांना परवडणार नाही. शेतकºयांनी शेतीत प्रयोग करत आधूनिक व पारंपरिक शेतीचा मेळ घालणे गरजेचे आहे.-रामचंद्र पाटील, शेतकरी , गाढोदा ता. जळगाव.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव