शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गाढोद्याची केळी पोहचली काश्मिरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:13 IST

रामचंद्र पाटील यांनी वडिलोपार्जित शेतीला दिली आधुनिकतेची जोड : इतर पिकांचेही घेतात उत्पन्न

जळगाव : तालुक्यातील गिरणा व तापी नदीच्या मधोमध असलेल्या गाढोदा येथील रामचंद्र सीताराम पाटील यांनी आपल्या शेतात पारंपरिक व आधुनिक शेतीचा संगम घालत आज वडिलोपार्जित शेतीला आधुनिकतेची जोड दिली. जिल्ह्यापर्यंत ओळखली जाणारी गाढोद्याची केळीचा आता काश्मिर ते उत्तरप्रदेशपर्यंत पुरवठा केला जात आहे.रामचंद्र पाटील यांचे वडील सिताराम पाटील यांच्याकडे १६ बिघे जमीन होती. या वडिलोपार्जित जमिनीत त्यांनी आधूनिकतेची जोड दिली. गिरणा व तापी नदीच्या काठालगत केळीचेच पीक मुख्यत्वेकरून घेतले जाते. मात्र, हे पीक घेताना अनेकदा निसर्गाच्या प्रकोप देखील शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत केळी पीक हे बेभरवशाचेच पीक समजले जाते. हवमानाचा अभ्यास, वादळ किंवा जास्त तापमानाचा फटका केळीला बसणार नाही यासाठीची उपाययोजना करत ते केळीची लागवड करतात.स्वत:च पिकवतात व स्वत:च विकतातअनेकदा शेतकऱ्यांची व्यापा-यांकडून फसगत किं वा नुकसान होत असते. शेतकरी जोपर्यंत आपल्याच मालाला बाजार मिळवून देणार नाही तो पर्यंत त्याची व्यापाºयांकडून फसगत ही होणारच असते. हे ओळखून त्यांनी आपल्या शेतीत लागवड करून घेतलेल्या केळी स्वत:च बाजारात न्यायला सुरुवात केली. यासाठी मोठा मुलगा निलेश पाटील प्रयत्न करत असून, केळी व्यापारी किंवा एजंटच्या माध्यमातून विक्री करीत स्वत:चा व्यवसाय सुरु करत वेगवेगळ्या राज्यांमध्ये गाढोद्याच्या केळीचा पुरवठा करत आहेत. तो आता काश्मीर आणि उत्तरप्रदेशातही केळी पाठविली जात आहे. शेतकºयांनी आता व्यापारी किंवा शासनाच्या भरवश्यावर न राहता आपल्या मालाला बाजारपेठ कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.मेहनतीमुळे १६ बिघे जमीनीचे झाले ६० बिघेरामचंद्र पाटील यांना वारसाहक्काने मिळालेल्या १६ बिघे जमीनीत केळीची लागवड करत गेल्या २० वर्षांमध्ये १६ बिघे जमीनीचे रुपांतर ६० बिघे जमिनीत केले असून, सध्यस्थितीत ते ३७ बिघे जमिनीवर केळीची लागवड करतात. यासह कापूस, मका, ज्वारी हे पीक देखील घेत असतात. मात्र, जमिनीचे काही क्षेत्र ते दरवर्षी शेतीतील वेगवेगळ्या प्रयोगांना चालना देण्यासाठी राखीव ठेवतात. या जमीनीत हळद, तीळ, फळबाग किंवा इतर धान्य घेत आधुनिक शेतीचे प्रयोग ते करीत असतात.शेतकरी जोपर्यंत पारंपरिक पध्दतीने शेती करत राहिंल तोपर्यंत शेती शेतकºयांना परवडणार नाही. शेतकºयांनी शेतीत प्रयोग करत आधूनिक व पारंपरिक शेतीचा मेळ घालणे गरजेचे आहे.-रामचंद्र पाटील, शेतकरी , गाढोदा ता. जळगाव.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव