शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

गाढोद्याची केळी पोहचली काश्मिरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:13 IST

रामचंद्र पाटील यांनी वडिलोपार्जित शेतीला दिली आधुनिकतेची जोड : इतर पिकांचेही घेतात उत्पन्न

जळगाव : तालुक्यातील गिरणा व तापी नदीच्या मधोमध असलेल्या गाढोदा येथील रामचंद्र सीताराम पाटील यांनी आपल्या शेतात पारंपरिक व आधुनिक शेतीचा संगम घालत आज वडिलोपार्जित शेतीला आधुनिकतेची जोड दिली. जिल्ह्यापर्यंत ओळखली जाणारी गाढोद्याची केळीचा आता काश्मिर ते उत्तरप्रदेशपर्यंत पुरवठा केला जात आहे.रामचंद्र पाटील यांचे वडील सिताराम पाटील यांच्याकडे १६ बिघे जमीन होती. या वडिलोपार्जित जमिनीत त्यांनी आधूनिकतेची जोड दिली. गिरणा व तापी नदीच्या काठालगत केळीचेच पीक मुख्यत्वेकरून घेतले जाते. मात्र, हे पीक घेताना अनेकदा निसर्गाच्या प्रकोप देखील शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत केळी पीक हे बेभरवशाचेच पीक समजले जाते. हवमानाचा अभ्यास, वादळ किंवा जास्त तापमानाचा फटका केळीला बसणार नाही यासाठीची उपाययोजना करत ते केळीची लागवड करतात.स्वत:च पिकवतात व स्वत:च विकतातअनेकदा शेतकऱ्यांची व्यापा-यांकडून फसगत किं वा नुकसान होत असते. शेतकरी जोपर्यंत आपल्याच मालाला बाजार मिळवून देणार नाही तो पर्यंत त्याची व्यापाºयांकडून फसगत ही होणारच असते. हे ओळखून त्यांनी आपल्या शेतीत लागवड करून घेतलेल्या केळी स्वत:च बाजारात न्यायला सुरुवात केली. यासाठी मोठा मुलगा निलेश पाटील प्रयत्न करत असून, केळी व्यापारी किंवा एजंटच्या माध्यमातून विक्री करीत स्वत:चा व्यवसाय सुरु करत वेगवेगळ्या राज्यांमध्ये गाढोद्याच्या केळीचा पुरवठा करत आहेत. तो आता काश्मीर आणि उत्तरप्रदेशातही केळी पाठविली जात आहे. शेतकºयांनी आता व्यापारी किंवा शासनाच्या भरवश्यावर न राहता आपल्या मालाला बाजारपेठ कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.मेहनतीमुळे १६ बिघे जमीनीचे झाले ६० बिघेरामचंद्र पाटील यांना वारसाहक्काने मिळालेल्या १६ बिघे जमीनीत केळीची लागवड करत गेल्या २० वर्षांमध्ये १६ बिघे जमीनीचे रुपांतर ६० बिघे जमिनीत केले असून, सध्यस्थितीत ते ३७ बिघे जमिनीवर केळीची लागवड करतात. यासह कापूस, मका, ज्वारी हे पीक देखील घेत असतात. मात्र, जमिनीचे काही क्षेत्र ते दरवर्षी शेतीतील वेगवेगळ्या प्रयोगांना चालना देण्यासाठी राखीव ठेवतात. या जमीनीत हळद, तीळ, फळबाग किंवा इतर धान्य घेत आधुनिक शेतीचे प्रयोग ते करीत असतात.शेतकरी जोपर्यंत पारंपरिक पध्दतीने शेती करत राहिंल तोपर्यंत शेती शेतकºयांना परवडणार नाही. शेतकºयांनी शेतीत प्रयोग करत आधूनिक व पारंपरिक शेतीचा मेळ घालणे गरजेचे आहे.-रामचंद्र पाटील, शेतकरी , गाढोदा ता. जळगाव.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव