शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

कर्मे इशु भजावा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 23:54 IST

जीवनरुपी वृक्षाला मृत्यू हे लागलेले सगळ्यात गोड फळ आहे. त्या फळाचा प्रत्येकाला स्वीकार करावाच लागतो, मग जिवाची इच्छा असेल ...

जीवनरुपी वृक्षाला मृत्यू हे लागलेले सगळ्यात गोड फळ आहे. त्या फळाचा प्रत्येकाला स्वीकार करावाच लागतो, मग जिवाची इच्छा असेल काय किंवा नसेल काय. जीवनात जन्माची तारीख, लग्नाची तारीख, प्रत्येकाला सांगता येते, पण मृत्यूची तारीख कोणालाच सांगता येत नाही. मृत्यूची तारीख निश्चित नाही, पण मृत्यू मात्र निश्चितच आहे .उपजे ते नासे। नाशिले ते पुनरपि दिसे। हे घटिका यंत्र जैसे । परिभ्रमे गा ॥ म्हणजेच मृत्यूच्या आत सावध होणे खरे जीवन आहे. परमेश्वराने शंभर वर्ष आयुष्य दिलंय त्याचे योग्य व्यवस्थापन करणे आपले कर्तव्य आहे.प्रथमं नार्जित विद्या। व्दितीय़ नार्जित़ धऩ।। तृतीय़ नाार्जित पुण्यं। चतुर्थ़ किंम करिष्यति।।आयुष्यात पहिली २५ वर्षे विद्याभ्यास करावा, नंतरची २५ वर्षे धन, पैसा कमवावा, आयुष्यातली तिसऱ्या टप्प्यातली २५ वर्षे कमावलेले धन सन्मार्गात व्यतित करावे. या तीन टप्प्यात जर तीन गोष्टी जमल्या नाहीत, तर शेवटच्या टप्प्यात पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरत नाही. जीवन म्हणजे जुगार आहे. जुगारात चांगली पाने कधी सोडायची नसतात. पण चुकीची पानेही उचलायची नसतात. चांगली पाने सोडणारा किंवा चुकीची पाने उचलणारा हारतोच. जीवनात अगदी त्याचप्रमाणे चुकीची माणसे जवळ केल्याने किंवा चांगली माणसे दूर केल्याने माणसे पराभूत होतात.जीवनाची दुसरी व्याख्या -म्हणजे अष्टदल. अष्टदल म्हणजे रांगोळी. दारात काढलेली रांगोळी किती ठिपक्यांची काढायची हे पुस्तकात लिहलेले असते, पण काढलेल्या रांगोळीत कोणते रंग भरायचे.. हे त्या काढणाºया तरुणी अथवा महिलेच्या हातात असते.अगदी त्याचप्रकारे आयुष्याची रांगोळी किती वर्षाची काढायची? हे परमेश्वराच्या हातात असते पण त्याने काढलेल्या ५०, ६०, ७० वर्षांच्या रांगोळीत प्रेमाचे, सदाचाराचे, माणुसकीचे कोणते रंग भरायचे हे मात्र आपल्याच हातात असते.जीवनाची तिसरी व्याख्या अशी आहे पहा, जीवन म्हणजे संवादिनी. संवादिनी म्हणजे हार्मोनियम. हार्मोनियम वाजवताना तिच्या सगळ्याच पट्टया महत्त्वाच्या असतात. ,पण सर्व एकाच वेळी वाजवायच्या नसतात काही पट्टया सोडायच्या तर काही पट्टया वाजवायच्या असतात. वाजवलेल्या पट्टयांनी गर्व करायचा नसतो. सोडलेल्या पट्टयांनी अपमान धरायचा नसतो. कारण सोडलेल्या पट्टया जर सुटल्याच नसत्या तर वाजलेल्या पट्टयांना राग रागेश्वरी, भैरवी निर्माण करता आलीच नसती. अगदी त्याचप्रकारे सुखाच्या पट्टया वाजवायच्या असतात आणि दु:खाच्या पट्टया सोडायच्या असतात. जीवन हे सुख -दु:ख हे जीवनाचे सारभूत गणित आहे. जीवन हे गणित आहे, त्यात जन्म ही बेरीज, लग्न हा गुणाकार तर मृत्यू ही वजाबाकी आहे. म्हणून आदर्शवत जीवन हेच जीवनाचे सार आहे.- ज्ञानेश्वर महाराज पाटील (जळकेकर)

टॅग्स :Jalgaonजळगाव