शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

कर्मे इशु भजावा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 23:54 IST

जीवनरुपी वृक्षाला मृत्यू हे लागलेले सगळ्यात गोड फळ आहे. त्या फळाचा प्रत्येकाला स्वीकार करावाच लागतो, मग जिवाची इच्छा असेल ...

जीवनरुपी वृक्षाला मृत्यू हे लागलेले सगळ्यात गोड फळ आहे. त्या फळाचा प्रत्येकाला स्वीकार करावाच लागतो, मग जिवाची इच्छा असेल काय किंवा नसेल काय. जीवनात जन्माची तारीख, लग्नाची तारीख, प्रत्येकाला सांगता येते, पण मृत्यूची तारीख कोणालाच सांगता येत नाही. मृत्यूची तारीख निश्चित नाही, पण मृत्यू मात्र निश्चितच आहे .उपजे ते नासे। नाशिले ते पुनरपि दिसे। हे घटिका यंत्र जैसे । परिभ्रमे गा ॥ म्हणजेच मृत्यूच्या आत सावध होणे खरे जीवन आहे. परमेश्वराने शंभर वर्ष आयुष्य दिलंय त्याचे योग्य व्यवस्थापन करणे आपले कर्तव्य आहे.प्रथमं नार्जित विद्या। व्दितीय़ नार्जित़ धऩ।। तृतीय़ नाार्जित पुण्यं। चतुर्थ़ किंम करिष्यति।।आयुष्यात पहिली २५ वर्षे विद्याभ्यास करावा, नंतरची २५ वर्षे धन, पैसा कमवावा, आयुष्यातली तिसऱ्या टप्प्यातली २५ वर्षे कमावलेले धन सन्मार्गात व्यतित करावे. या तीन टप्प्यात जर तीन गोष्टी जमल्या नाहीत, तर शेवटच्या टप्प्यात पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरत नाही. जीवन म्हणजे जुगार आहे. जुगारात चांगली पाने कधी सोडायची नसतात. पण चुकीची पानेही उचलायची नसतात. चांगली पाने सोडणारा किंवा चुकीची पाने उचलणारा हारतोच. जीवनात अगदी त्याचप्रमाणे चुकीची माणसे जवळ केल्याने किंवा चांगली माणसे दूर केल्याने माणसे पराभूत होतात.जीवनाची दुसरी व्याख्या -म्हणजे अष्टदल. अष्टदल म्हणजे रांगोळी. दारात काढलेली रांगोळी किती ठिपक्यांची काढायची हे पुस्तकात लिहलेले असते, पण काढलेल्या रांगोळीत कोणते रंग भरायचे.. हे त्या काढणाºया तरुणी अथवा महिलेच्या हातात असते.अगदी त्याचप्रकारे आयुष्याची रांगोळी किती वर्षाची काढायची? हे परमेश्वराच्या हातात असते पण त्याने काढलेल्या ५०, ६०, ७० वर्षांच्या रांगोळीत प्रेमाचे, सदाचाराचे, माणुसकीचे कोणते रंग भरायचे हे मात्र आपल्याच हातात असते.जीवनाची तिसरी व्याख्या अशी आहे पहा, जीवन म्हणजे संवादिनी. संवादिनी म्हणजे हार्मोनियम. हार्मोनियम वाजवताना तिच्या सगळ्याच पट्टया महत्त्वाच्या असतात. ,पण सर्व एकाच वेळी वाजवायच्या नसतात काही पट्टया सोडायच्या तर काही पट्टया वाजवायच्या असतात. वाजवलेल्या पट्टयांनी गर्व करायचा नसतो. सोडलेल्या पट्टयांनी अपमान धरायचा नसतो. कारण सोडलेल्या पट्टया जर सुटल्याच नसत्या तर वाजलेल्या पट्टयांना राग रागेश्वरी, भैरवी निर्माण करता आलीच नसती. अगदी त्याचप्रकारे सुखाच्या पट्टया वाजवायच्या असतात आणि दु:खाच्या पट्टया सोडायच्या असतात. जीवन हे सुख -दु:ख हे जीवनाचे सारभूत गणित आहे. जीवन हे गणित आहे, त्यात जन्म ही बेरीज, लग्न हा गुणाकार तर मृत्यू ही वजाबाकी आहे. म्हणून आदर्शवत जीवन हेच जीवनाचे सार आहे.- ज्ञानेश्वर महाराज पाटील (जळकेकर)

टॅग्स :Jalgaonजळगाव