शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

कर्मे इशु भजावा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 23:54 IST

जीवनरुपी वृक्षाला मृत्यू हे लागलेले सगळ्यात गोड फळ आहे. त्या फळाचा प्रत्येकाला स्वीकार करावाच लागतो, मग जिवाची इच्छा असेल ...

जीवनरुपी वृक्षाला मृत्यू हे लागलेले सगळ्यात गोड फळ आहे. त्या फळाचा प्रत्येकाला स्वीकार करावाच लागतो, मग जिवाची इच्छा असेल काय किंवा नसेल काय. जीवनात जन्माची तारीख, लग्नाची तारीख, प्रत्येकाला सांगता येते, पण मृत्यूची तारीख कोणालाच सांगता येत नाही. मृत्यूची तारीख निश्चित नाही, पण मृत्यू मात्र निश्चितच आहे .उपजे ते नासे। नाशिले ते पुनरपि दिसे। हे घटिका यंत्र जैसे । परिभ्रमे गा ॥ म्हणजेच मृत्यूच्या आत सावध होणे खरे जीवन आहे. परमेश्वराने शंभर वर्ष आयुष्य दिलंय त्याचे योग्य व्यवस्थापन करणे आपले कर्तव्य आहे.प्रथमं नार्जित विद्या। व्दितीय़ नार्जित़ धऩ।। तृतीय़ नाार्जित पुण्यं। चतुर्थ़ किंम करिष्यति।।आयुष्यात पहिली २५ वर्षे विद्याभ्यास करावा, नंतरची २५ वर्षे धन, पैसा कमवावा, आयुष्यातली तिसऱ्या टप्प्यातली २५ वर्षे कमावलेले धन सन्मार्गात व्यतित करावे. या तीन टप्प्यात जर तीन गोष्टी जमल्या नाहीत, तर शेवटच्या टप्प्यात पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरत नाही. जीवन म्हणजे जुगार आहे. जुगारात चांगली पाने कधी सोडायची नसतात. पण चुकीची पानेही उचलायची नसतात. चांगली पाने सोडणारा किंवा चुकीची पाने उचलणारा हारतोच. जीवनात अगदी त्याचप्रमाणे चुकीची माणसे जवळ केल्याने किंवा चांगली माणसे दूर केल्याने माणसे पराभूत होतात.जीवनाची दुसरी व्याख्या -म्हणजे अष्टदल. अष्टदल म्हणजे रांगोळी. दारात काढलेली रांगोळी किती ठिपक्यांची काढायची हे पुस्तकात लिहलेले असते, पण काढलेल्या रांगोळीत कोणते रंग भरायचे.. हे त्या काढणाºया तरुणी अथवा महिलेच्या हातात असते.अगदी त्याचप्रकारे आयुष्याची रांगोळी किती वर्षाची काढायची? हे परमेश्वराच्या हातात असते पण त्याने काढलेल्या ५०, ६०, ७० वर्षांच्या रांगोळीत प्रेमाचे, सदाचाराचे, माणुसकीचे कोणते रंग भरायचे हे मात्र आपल्याच हातात असते.जीवनाची तिसरी व्याख्या अशी आहे पहा, जीवन म्हणजे संवादिनी. संवादिनी म्हणजे हार्मोनियम. हार्मोनियम वाजवताना तिच्या सगळ्याच पट्टया महत्त्वाच्या असतात. ,पण सर्व एकाच वेळी वाजवायच्या नसतात काही पट्टया सोडायच्या तर काही पट्टया वाजवायच्या असतात. वाजवलेल्या पट्टयांनी गर्व करायचा नसतो. सोडलेल्या पट्टयांनी अपमान धरायचा नसतो. कारण सोडलेल्या पट्टया जर सुटल्याच नसत्या तर वाजलेल्या पट्टयांना राग रागेश्वरी, भैरवी निर्माण करता आलीच नसती. अगदी त्याचप्रकारे सुखाच्या पट्टया वाजवायच्या असतात आणि दु:खाच्या पट्टया सोडायच्या असतात. जीवन हे सुख -दु:ख हे जीवनाचे सारभूत गणित आहे. जीवन हे गणित आहे, त्यात जन्म ही बेरीज, लग्न हा गुणाकार तर मृत्यू ही वजाबाकी आहे. म्हणून आदर्शवत जीवन हेच जीवनाचे सार आहे.- ज्ञानेश्वर महाराज पाटील (जळकेकर)

टॅग्स :Jalgaonजळगाव