शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
3
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
4
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
5
दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
6
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
7
वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
8
मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
9
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
10
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
11
तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
12
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
13
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
14
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
15
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
16
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
17
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
18
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
20
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
Daily Top 2Weekly Top 5

बस येईना! पायीच धरावी लागते शाळेची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार राज्यासह जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार राज्यासह जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, काही ग्रामीण भागात अजूनही राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पायी वाट धरावी लागत आहे.

जळगाव जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गांची ८ डिसेंबर २०२० तर २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गांची घंटा वाजली़ सुमारे ५ लाख ६७ हजार विद्यार्थी इयत्ता पाचवी ते बारावीच्या वर्गांमध्ये प्रवेशित आहेत. त्यापैकी दोन लाख विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शाळेत हजेरी लावली असून उर्वरित विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. दरम्यान, अजूनही काही ग्रामीण भागांमध्ये बससेवा बंद आहे़ तर काही ठिकाणी वेळेवर बस येत नसल्यामुळे तासनतास बसची वाट विद्यार्थ्यांना पहावी लागते़ त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बसफेऱ्या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.

विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा इशारा

तालुक्यातील वावडदाजवळील बिलवाडी गावातील विद्यार्थ्यांना बससेवा मिळत नसल्यामुळे चक्क पाच किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. बिलवाडी येथील चाळीस विद्यार्थी हे म्हसावद शाळेत शिक्षण घेत आहेत. आधी एसटी बस ही १० वाजता नियमित सुरू होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती बंद आहे. खासगी वाहनांचे भाडे परवडणारे नसल्यामुळे शेवटी पायीच विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागत आहे. दरम्यान, जळगाव, वावडदा, बिलवाडी व म्हसावद बससेवा सुरू करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन बिलवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. बससेवा सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांच्या पालकांकडून देण्यात आला आहे.

विद्यापीठ बससेवाही सुरू करण्याची मागणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही महाविद्यालय व विद्यापीठ बंद आहे. मात्र, शैक्षणिक कामानिमित्त विद्यार्थ्यांना विद्यापीठात ये-जा करावी लागते. परंतु, एसटी महामंडळाची विद्यापीठ बससेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. अखेर खासगी वाहनांतून ये-जा करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. काही दिवसांपूर्वी काही विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती.

एकूण शाळा

पाचवी ते आठवी - २०५८

नववी ते बारावी - ८६६

एकूण विद्यार्थी

पाचवी ते आठवी - ३ लाख ३४ हजार ८५२

नववी ते बारावी - २ लाख ३२ हजार ५८९