शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

बस येईना! पायीच धरावी लागते शाळेची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार राज्यासह जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार राज्यासह जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, काही ग्रामीण भागात अजूनही राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पायी वाट धरावी लागत आहे.

जळगाव जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गांची ८ डिसेंबर २०२० तर २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गांची घंटा वाजली़ सुमारे ५ लाख ६७ हजार विद्यार्थी इयत्ता पाचवी ते बारावीच्या वर्गांमध्ये प्रवेशित आहेत. त्यापैकी दोन लाख विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शाळेत हजेरी लावली असून उर्वरित विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. दरम्यान, अजूनही काही ग्रामीण भागांमध्ये बससेवा बंद आहे़ तर काही ठिकाणी वेळेवर बस येत नसल्यामुळे तासनतास बसची वाट विद्यार्थ्यांना पहावी लागते़ त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बसफेऱ्या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.

विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा इशारा

तालुक्यातील वावडदाजवळील बिलवाडी गावातील विद्यार्थ्यांना बससेवा मिळत नसल्यामुळे चक्क पाच किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. बिलवाडी येथील चाळीस विद्यार्थी हे म्हसावद शाळेत शिक्षण घेत आहेत. आधी एसटी बस ही १० वाजता नियमित सुरू होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती बंद आहे. खासगी वाहनांचे भाडे परवडणारे नसल्यामुळे शेवटी पायीच विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागत आहे. दरम्यान, जळगाव, वावडदा, बिलवाडी व म्हसावद बससेवा सुरू करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन बिलवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. बससेवा सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांच्या पालकांकडून देण्यात आला आहे.

विद्यापीठ बससेवाही सुरू करण्याची मागणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही महाविद्यालय व विद्यापीठ बंद आहे. मात्र, शैक्षणिक कामानिमित्त विद्यार्थ्यांना विद्यापीठात ये-जा करावी लागते. परंतु, एसटी महामंडळाची विद्यापीठ बससेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. अखेर खासगी वाहनांतून ये-जा करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. काही दिवसांपूर्वी काही विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती.

एकूण शाळा

पाचवी ते आठवी - २०५८

नववी ते बारावी - ८६६

एकूण विद्यार्थी

पाचवी ते आठवी - ३ लाख ३४ हजार ८५२

नववी ते बारावी - २ लाख ३२ हजार ५८९