शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

अवकाळीमुळे ज्वारी, गहू आडवा

By admin | Updated: February 12, 2015 13:32 IST

अवकाळी पावसामुळे गेल्या दोन महिन्यात गहू, ज्वारी, कापूस व इतर पिकांना तिनदा फटका बसला आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे ज्वारी व गहू आडवा झाला आहे.

जळगाव : अवकाळी पावसामुळे गेल्या दोन महिन्यात गहू, ज्वारी, कापूस व इतर पिकांना तिनदा फटका बसला आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे ज्वारी व गहू आडवा झाला आहे. या दोन्ही पिकांचे ३0 ते ३५ टक्के नुकसान होण्याची भीती आहे. तर हरभर्‍यामध्ये घाटेअळी, तुडतुडे पडतील. तर कापसाची बोंडे काळवंडली आहेत. कमी भावात कापूस विक्री करण्याची वेळ आलेले कापूस उत्पादक पुन्हा कोंडीत सापडले आहेत. बाजारपेठेतील चढउतार आणि अवकाळी पाऊस असा दुहेरी मार कापूस उत्पादक व इतर पिके घेणार्‍या शेतकर्‍यांना बसला आहे. कापूस भिजलाजिल्हाभरात चार लाख ६२ हजार हेक्टरवर कापूस आहे. त्यात सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्र पूर्वहंगामी कापसाखाली आहे. कोरडवाहू कापसाची तर पावसाच्या लहरीपणामुळे आधीच बिकट अवस्था झाली आहे. अशातच पूर्वहंगामी किंवा बागायती कापसाकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. पण अवकाळी पावसामुळे बागायती कापसातील बोंडे भिजून काळवंडली असून, कापूस उत्पादक आर्थिक कोंडीत सापडले आहेत. अशात अवकाळी पाऊस पुन्हा पुन्हा झोडपत आहे. गहू, ज्वारी लोळलेसुसाट वारा आणि पावसाचा तडाखा यामुळे गहू व ज्वारी (दादर) ही पिके लोळली आहेत. गहू आडवा झाल्याने दाणे बारीक पडतील. माती व ओलाव्यामुळे दाणे सडतील. कांडी खराब होऊन चाराही हवा तसा मिळणार नाही. ज्वारीला कणसे लागली आहे. ती आडवी झाल्याने कणसांना माती लागेल. दाणे परिपक्व होणार नाहीत. दाणे बारीक पडून काळवंडतील. त्यांचा दर्जा तर खराब होईल. ज्वारी व गव्हाखालील १७ हजार हेक्टर क्षेत्राला फटका बसल्याचा कृषि विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. हरभर्‍यावर रोगराईयंदा हरभर्‍याचे क्षेत्र थंडी व ओलावा यामुळे नंतर वाढले. ते ३७ हजार हेक्टरपर्यंत गेले. अनेक भागात हरभर्‍याला घाटे लागले आहेत. तर काही भागात हरभरा फुलोर्‍यावर आले. परंतु पावसामुळे घाटेअळी फोफावेल. दाणे अर्धवट असणे, फुले गळणे अशा समस्या घाटेअळीमुळे निर्माण होणार आहेत. कृषि विभागाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. नुकसानीचा अहवाल आठवडाभरात तयार होईल, अशी माहिती कृषि उपसंचालक पी.के.पाटील यांनी दिली. एरंडोल तालुक्यात ३७२ घरे अंशत: पडली आणि पाचोरा तालुक्यात दोन जण जखमी झाले.धान्य भिजलेबाजार समितीमध्ये परंतु जुने पोते, गोण्या काही दुकानांसमोर झाकून ठेवल्या होत्या. त्यांचे नुकसान झाले. त्या दुपारी वाळविल्या जात होत्या. आवक नसल्याने शेतकर्‍याच्या धान्याचे कुठलेही मोठे नुकसान बाजार समितीमध्ये झालेले नसल्याचे आडतदार संजय शहा यांनी सांगितले.

--------------

 बाजार समितीमध्ये भिजलेले धान्य बुधवारी वाळविले जात होते. बाजार समितीतही नुकसान कापूस खरेदी केंद्रांवर १५ ट्रॅक्टर कापूस भिजलाशहरालगतच्या आव्हाणे येथे भारतीय कापूस महामंडळातर्फे सुरू करण्यात आलेल्या कापूस खरेदी केंद्रावर अनेक शेतकर्‍यांनी ट्रॅक्टर व इतर वाहनांमध्ये कापूस विक्रीसाठी मंगळवारी दुपारी आणला होता.सायंकाळी केंद्र बंद होईपर्यंत अनेक शेतकर्‍यांचा कापूस विक्री होऊ शकला नाही. अशातच रात्री उशीरा जोरदार पाऊस सुरू झाल्याने या वाहनांमधील कापूस भिजला. कापसाला कनाटने झाकले होते. परंतु जीर्ण कनाट छिद्रे व पाणी रोखू न शकणारे असल्याने पाणी कापसात शिरले. जवळपास १५ ट्रॅक्टरमधील कापूस भिजला. शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. केंद्रात खरेदी केलेल्या कापसावर ताडपत्री टाकलेली असल्याने नुकसान झाले नाही.