शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीमुळे ज्वारी, गहू आडवा

By admin | Updated: February 12, 2015 13:32 IST

अवकाळी पावसामुळे गेल्या दोन महिन्यात गहू, ज्वारी, कापूस व इतर पिकांना तिनदा फटका बसला आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे ज्वारी व गहू आडवा झाला आहे.

जळगाव : अवकाळी पावसामुळे गेल्या दोन महिन्यात गहू, ज्वारी, कापूस व इतर पिकांना तिनदा फटका बसला आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे ज्वारी व गहू आडवा झाला आहे. या दोन्ही पिकांचे ३0 ते ३५ टक्के नुकसान होण्याची भीती आहे. तर हरभर्‍यामध्ये घाटेअळी, तुडतुडे पडतील. तर कापसाची बोंडे काळवंडली आहेत. कमी भावात कापूस विक्री करण्याची वेळ आलेले कापूस उत्पादक पुन्हा कोंडीत सापडले आहेत. बाजारपेठेतील चढउतार आणि अवकाळी पाऊस असा दुहेरी मार कापूस उत्पादक व इतर पिके घेणार्‍या शेतकर्‍यांना बसला आहे. कापूस भिजलाजिल्हाभरात चार लाख ६२ हजार हेक्टरवर कापूस आहे. त्यात सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्र पूर्वहंगामी कापसाखाली आहे. कोरडवाहू कापसाची तर पावसाच्या लहरीपणामुळे आधीच बिकट अवस्था झाली आहे. अशातच पूर्वहंगामी किंवा बागायती कापसाकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. पण अवकाळी पावसामुळे बागायती कापसातील बोंडे भिजून काळवंडली असून, कापूस उत्पादक आर्थिक कोंडीत सापडले आहेत. अशात अवकाळी पाऊस पुन्हा पुन्हा झोडपत आहे. गहू, ज्वारी लोळलेसुसाट वारा आणि पावसाचा तडाखा यामुळे गहू व ज्वारी (दादर) ही पिके लोळली आहेत. गहू आडवा झाल्याने दाणे बारीक पडतील. माती व ओलाव्यामुळे दाणे सडतील. कांडी खराब होऊन चाराही हवा तसा मिळणार नाही. ज्वारीला कणसे लागली आहे. ती आडवी झाल्याने कणसांना माती लागेल. दाणे परिपक्व होणार नाहीत. दाणे बारीक पडून काळवंडतील. त्यांचा दर्जा तर खराब होईल. ज्वारी व गव्हाखालील १७ हजार हेक्टर क्षेत्राला फटका बसल्याचा कृषि विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. हरभर्‍यावर रोगराईयंदा हरभर्‍याचे क्षेत्र थंडी व ओलावा यामुळे नंतर वाढले. ते ३७ हजार हेक्टरपर्यंत गेले. अनेक भागात हरभर्‍याला घाटे लागले आहेत. तर काही भागात हरभरा फुलोर्‍यावर आले. परंतु पावसामुळे घाटेअळी फोफावेल. दाणे अर्धवट असणे, फुले गळणे अशा समस्या घाटेअळीमुळे निर्माण होणार आहेत. कृषि विभागाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. नुकसानीचा अहवाल आठवडाभरात तयार होईल, अशी माहिती कृषि उपसंचालक पी.के.पाटील यांनी दिली. एरंडोल तालुक्यात ३७२ घरे अंशत: पडली आणि पाचोरा तालुक्यात दोन जण जखमी झाले.धान्य भिजलेबाजार समितीमध्ये परंतु जुने पोते, गोण्या काही दुकानांसमोर झाकून ठेवल्या होत्या. त्यांचे नुकसान झाले. त्या दुपारी वाळविल्या जात होत्या. आवक नसल्याने शेतकर्‍याच्या धान्याचे कुठलेही मोठे नुकसान बाजार समितीमध्ये झालेले नसल्याचे आडतदार संजय शहा यांनी सांगितले.

--------------

 बाजार समितीमध्ये भिजलेले धान्य बुधवारी वाळविले जात होते. बाजार समितीतही नुकसान कापूस खरेदी केंद्रांवर १५ ट्रॅक्टर कापूस भिजलाशहरालगतच्या आव्हाणे येथे भारतीय कापूस महामंडळातर्फे सुरू करण्यात आलेल्या कापूस खरेदी केंद्रावर अनेक शेतकर्‍यांनी ट्रॅक्टर व इतर वाहनांमध्ये कापूस विक्रीसाठी मंगळवारी दुपारी आणला होता.सायंकाळी केंद्र बंद होईपर्यंत अनेक शेतकर्‍यांचा कापूस विक्री होऊ शकला नाही. अशातच रात्री उशीरा जोरदार पाऊस सुरू झाल्याने या वाहनांमधील कापूस भिजला. कापसाला कनाटने झाकले होते. परंतु जीर्ण कनाट छिद्रे व पाणी रोखू न शकणारे असल्याने पाणी कापसात शिरले. जवळपास १५ ट्रॅक्टरमधील कापूस भिजला. शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. केंद्रात खरेदी केलेल्या कापसावर ताडपत्री टाकलेली असल्याने नुकसान झाले नाही.