शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 22:42 IST

महाराष्ट्रीय संतांनी मराठी माणसाला केवळ निवृत्ती मार्गाची शिकवण दिली नाही, तर परमार्थासोबत प्रपंच ही सुखाचा कसा करता येईल याचा ...

महाराष्ट्रीय संतांनी मराठी माणसाला केवळ निवृत्ती मार्गाची शिकवण दिली नाही, तर परमार्थासोबत प्रपंच ही सुखाचा कसा करता येईल याचा कानमंत्रही सांगितला आहे. ज्याला प्रपंच धड करता आला नाही त्याला परमार्थ तरी कसा जमेल? म्हणून आधी प्रपंच करावा नेटका । मग पहावे परमार्थ विवेका ।। असा उपदेश समर्थ रामदास स्वामी करतात. धन सर्वांनाच हवे आहे. किती पैसा मिळाला म्हणजे माणूस सुखी होईल? धनाची गरज आणि हाव या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. गरजेची पूर्ती होऊ शकेल. पण हावेची पूर्ती कशी होईल? म्हणूनच हे हवे, ते हवे अजून हवे या हावेपोटी धावण्यातच जीवन संपून जाते आणि जे मिळवले त्याचा उपभोग घ्यायचा राहून जातो. ही हाव आणि तिच्यापोटी होणारी धावाधाव कधी तरी थांबली पाहिजे.संत तुकाराम महाराज सांगतात. साधन सूचिता, अर्थ सूचिता, बाळगून व्यवहार केला तर सुखाचे दार दूर नाही. ‘उत्तम व्यवहार’ आणि ‘उदास विचार’ हे धनाच्या प्राप्तीचे आणि विनियोगाचे अधिष्ठान असले पाहिजे असा तुकोबारायांचा आग्रह आहे. उत्तम व्यवहार म्हणजे सचोटीचा व्यवहार, नैतिकतेच्या पायावर झालेला व्यवहार, धनाच्या प्राप्तीसाठीचे एवढे तत्व पाळले पाहिजे. प्रपंचासाठी पैसा हा लागणारच. ‘प्रंपचाचा पाया आहे पैशाविण वाया’ असे समर्थ रामदासांंनी सांगून ठेवले आहे. पवित्र मार्गाने आलेले धन म्हणजे ‘लक्ष्मी’ होय. गैरमार्गाने मिळवलेल्या धनाला फक्त पैसा म्हणता येईल. मिळालेला पैसा आपल्याजवळ सदैव राहणार नाही आणि राहिलाच तर आपण तरी कुठे राहणार आहोत? म्हणून हे समाजकार्यासाठी, देश, देव आणि धर्म कार्यासाठी खर्च करावे अशी संताची शिकवण आहे. अभंगाच्या केवळ एका चरणात फार महत्वाचा अर्थशुचितेचा संदेश तुकोबा देतात. तो आचरणात आणण्याचा संकल्प करू या.प्रा.सी.एस.पाटील, धरणगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव