शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 22:42 IST

महाराष्ट्रीय संतांनी मराठी माणसाला केवळ निवृत्ती मार्गाची शिकवण दिली नाही, तर परमार्थासोबत प्रपंच ही सुखाचा कसा करता येईल याचा ...

महाराष्ट्रीय संतांनी मराठी माणसाला केवळ निवृत्ती मार्गाची शिकवण दिली नाही, तर परमार्थासोबत प्रपंच ही सुखाचा कसा करता येईल याचा कानमंत्रही सांगितला आहे. ज्याला प्रपंच धड करता आला नाही त्याला परमार्थ तरी कसा जमेल? म्हणून आधी प्रपंच करावा नेटका । मग पहावे परमार्थ विवेका ।। असा उपदेश समर्थ रामदास स्वामी करतात. धन सर्वांनाच हवे आहे. किती पैसा मिळाला म्हणजे माणूस सुखी होईल? धनाची गरज आणि हाव या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. गरजेची पूर्ती होऊ शकेल. पण हावेची पूर्ती कशी होईल? म्हणूनच हे हवे, ते हवे अजून हवे या हावेपोटी धावण्यातच जीवन संपून जाते आणि जे मिळवले त्याचा उपभोग घ्यायचा राहून जातो. ही हाव आणि तिच्यापोटी होणारी धावाधाव कधी तरी थांबली पाहिजे.संत तुकाराम महाराज सांगतात. साधन सूचिता, अर्थ सूचिता, बाळगून व्यवहार केला तर सुखाचे दार दूर नाही. ‘उत्तम व्यवहार’ आणि ‘उदास विचार’ हे धनाच्या प्राप्तीचे आणि विनियोगाचे अधिष्ठान असले पाहिजे असा तुकोबारायांचा आग्रह आहे. उत्तम व्यवहार म्हणजे सचोटीचा व्यवहार, नैतिकतेच्या पायावर झालेला व्यवहार, धनाच्या प्राप्तीसाठीचे एवढे तत्व पाळले पाहिजे. प्रपंचासाठी पैसा हा लागणारच. ‘प्रंपचाचा पाया आहे पैशाविण वाया’ असे समर्थ रामदासांंनी सांगून ठेवले आहे. पवित्र मार्गाने आलेले धन म्हणजे ‘लक्ष्मी’ होय. गैरमार्गाने मिळवलेल्या धनाला फक्त पैसा म्हणता येईल. मिळालेला पैसा आपल्याजवळ सदैव राहणार नाही आणि राहिलाच तर आपण तरी कुठे राहणार आहोत? म्हणून हे समाजकार्यासाठी, देश, देव आणि धर्म कार्यासाठी खर्च करावे अशी संताची शिकवण आहे. अभंगाच्या केवळ एका चरणात फार महत्वाचा अर्थशुचितेचा संदेश तुकोबा देतात. तो आचरणात आणण्याचा संकल्प करू या.प्रा.सी.एस.पाटील, धरणगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव