शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

जानवे शाळेला ग्रामपंचायतीने ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:20 IST

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक या शिक्षण संस्थेच्या किसान विद्यालयासाठी १९७९पासून जानवे ग्रामपंचायतीच्या मालकीची इमारत शाळेसाठी वापरण्यात येत होती. ...

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक या शिक्षण संस्थेच्या किसान विद्यालयासाठी १९७९पासून जानवे ग्रामपंचायतीच्या मालकीची इमारत शाळेसाठी वापरण्यात येत होती. २००३साली इमारत २०२५पर्यंत भाडे तत्वावर कराराने वापरण्यास दिली आहे. सध्या ती इमारत जीर्ण झाली असून ती वापरण्यायोग्य नसल्याने सरपंच यांनी १९ जुलै रोजी सदर इमारत आठ दिवसात खाली करण्याबाबत नोटीस बजावली होती. त्यानुसार आज ग्रामपंचायतीने या इमारतीला कुलूप ठोकले, त्यामुळे आता शाळा कुठे भरावयाची हा मुख्याध्यापकापुढे प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांकडून भाडे ठरवले होते. त्यामुळे शाळा इमारत दुरुस्त करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची होती. मात्र ग्रामपंचायतीने गावातील मुलांच्या शिक्षणाचा विचार केला नाही आणि इमारतही दुरुस्त केली नाही.

सुभाष भिला पाटील यांनी २०१३पासून या शाळेची इमारत ही जीर्ण झाल्याची तक्रार ग्रामपंचायतीकडे केली होती. यापूर्वीदेखील २०१७ मध्ये आर. बी. पवार मुख्याध्यापक असताना ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले होते. दरम्यान प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहचल्याने तेव्हा पोलिसांनी मध्यस्थी करत कुलूप उघडले होते. त्यानंतर सुभाष पाटील यांनी जीर्ण इमारतीबाबत पाठपुरावा सुरूच ठेवला. आता पाटील यांनी या जीर्ण इमारतीत वर्ग भरवणे धोक्याचे असल्याचे प्रमाणपत्र बांधकाम विभागाकडून मिळवल्याने आज सरपंच विजय सोनवणे, मनोज पाटील, सुभाष पाटील आणि शरद पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीने कुलूप ठोकले. त्यामुळे शाळा कुठे भरावयाची हा यक्षप्रश्न आता प्रभारी मुख्याध्यापक पी. एस. पाटील यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

दरम्यान शाळेच्या इमारतीसाठी धुळे रस्त्यालगत महावितरणच्या उपकेंद्राजवळ साडेतीन एकर जागा उपलब्ध आहे. त्यावर शिक्षकांनी बांधकाम सुरू केले होते. मात्र शेजारील शेतकऱ्याने अडथळा आणल्याने बांधकाम अर्धवट पडून आहे. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक पी. एस. पाटील यांनी याबाबत आपण संस्था चालकांना कळवले असून माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना देखील कळविले आहे. उद्या प्रभारी मुख्याध्यापक आणि शिक्षक शिक्षणाधिकारी यांची आणि संस्था चालकांची भेट घेणार आहेत, असे सांगितले.

दरम्यान किसान महाविद्यालयात ५ ते १२वीपर्यंतचे वर्ग असून ग्रामपंचायतीच्या सहा खोल्या शाळेला भाडेतत्वावर दिल्या आहेत. गावातीलच गरिबांचे सुमारे साडेतीनशे विद्यार्थी शिक्षण या शाळेत घेत आहेत.

शाळेने इमारत भाडे भरलेले नाही आणि इमारत जीर्ण झाली असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने ती खाली करणे गरजेचे होते म्हणून ती खाली करण्यात आली.

-के. आर. देसले, ग्रामसेवक, जानवे, ता. अमळनेर