शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

जानवे शाळेला ग्रामपंचायतीने ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:20 IST

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक या शिक्षण संस्थेच्या किसान विद्यालयासाठी १९७९पासून जानवे ग्रामपंचायतीच्या मालकीची इमारत शाळेसाठी वापरण्यात येत होती. ...

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक या शिक्षण संस्थेच्या किसान विद्यालयासाठी १९७९पासून जानवे ग्रामपंचायतीच्या मालकीची इमारत शाळेसाठी वापरण्यात येत होती. २००३साली इमारत २०२५पर्यंत भाडे तत्वावर कराराने वापरण्यास दिली आहे. सध्या ती इमारत जीर्ण झाली असून ती वापरण्यायोग्य नसल्याने सरपंच यांनी १९ जुलै रोजी सदर इमारत आठ दिवसात खाली करण्याबाबत नोटीस बजावली होती. त्यानुसार आज ग्रामपंचायतीने या इमारतीला कुलूप ठोकले, त्यामुळे आता शाळा कुठे भरावयाची हा मुख्याध्यापकापुढे प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांकडून भाडे ठरवले होते. त्यामुळे शाळा इमारत दुरुस्त करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची होती. मात्र ग्रामपंचायतीने गावातील मुलांच्या शिक्षणाचा विचार केला नाही आणि इमारतही दुरुस्त केली नाही.

सुभाष भिला पाटील यांनी २०१३पासून या शाळेची इमारत ही जीर्ण झाल्याची तक्रार ग्रामपंचायतीकडे केली होती. यापूर्वीदेखील २०१७ मध्ये आर. बी. पवार मुख्याध्यापक असताना ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले होते. दरम्यान प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहचल्याने तेव्हा पोलिसांनी मध्यस्थी करत कुलूप उघडले होते. त्यानंतर सुभाष पाटील यांनी जीर्ण इमारतीबाबत पाठपुरावा सुरूच ठेवला. आता पाटील यांनी या जीर्ण इमारतीत वर्ग भरवणे धोक्याचे असल्याचे प्रमाणपत्र बांधकाम विभागाकडून मिळवल्याने आज सरपंच विजय सोनवणे, मनोज पाटील, सुभाष पाटील आणि शरद पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीने कुलूप ठोकले. त्यामुळे शाळा कुठे भरावयाची हा यक्षप्रश्न आता प्रभारी मुख्याध्यापक पी. एस. पाटील यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

दरम्यान शाळेच्या इमारतीसाठी धुळे रस्त्यालगत महावितरणच्या उपकेंद्राजवळ साडेतीन एकर जागा उपलब्ध आहे. त्यावर शिक्षकांनी बांधकाम सुरू केले होते. मात्र शेजारील शेतकऱ्याने अडथळा आणल्याने बांधकाम अर्धवट पडून आहे. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक पी. एस. पाटील यांनी याबाबत आपण संस्था चालकांना कळवले असून माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना देखील कळविले आहे. उद्या प्रभारी मुख्याध्यापक आणि शिक्षक शिक्षणाधिकारी यांची आणि संस्था चालकांची भेट घेणार आहेत, असे सांगितले.

दरम्यान किसान महाविद्यालयात ५ ते १२वीपर्यंतचे वर्ग असून ग्रामपंचायतीच्या सहा खोल्या शाळेला भाडेतत्वावर दिल्या आहेत. गावातीलच गरिबांचे सुमारे साडेतीनशे विद्यार्थी शिक्षण या शाळेत घेत आहेत.

शाळेने इमारत भाडे भरलेले नाही आणि इमारत जीर्ण झाली असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने ती खाली करणे गरजेचे होते म्हणून ती खाली करण्यात आली.

-के. आर. देसले, ग्रामसेवक, जानवे, ता. अमळनेर