शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

सोशल मीडियातील वादविवादाने जामनेरचा सलोखा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 15:26 IST

गेल्या काही दिवसांपासून विविध घटनांमुळे शहरातील वातावरण दूषित होत आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी व पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरजसोशल मीडियातून परस्परांवर आरोप प्रत्यारोपफेसबुकवरील आक्षेपार्ह पोस्टमुळे विचारला जाब

जामनेर, जि.जळगाव : गेल्या काही दिवसांपासून विविध घटनांमुळे शहरातील वातावरण दूषित होत आहे. तरुणांमधील वाढती गुंडगिरी, सोशल मीडियातून परस्परावर केले जाणारे आरोप, प्रत्यारोप व त्यातून निर्माण होत असलेली कटूता कायदा सुव्यवस्था धोक्यात आणू शकते. यासाठी लोकप्रतिनिधी व पोलीस प्रशासनाने याकडे तातडीने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची भावना सामान्य नागरिक बोलून दाखवत आहेत.नागरिकत्व कायद्याला विरोध, समर्थन, बंद यावर सोशल मीडियातून परस्परांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. गेल्या आठवड्यात महाविद्यालयीन तरुणांनी घातलेला धुडगूस व त्यातून झालेली हाणामारीची घटना शैक्षणिक वातावरण गढूळ करणारी आहे. विद्यार्थ्यांच्या हाणामारीच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. मात्र यावेळेस पोलिसांनी केलेल्या कारवाईने अशा प्रकारांना आला बसेल, असे बोलले जात आहे.फेसबुकवर एका तरुणाने नुकत्याच टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे इतर तरुणांनी त्याला जाब विचारला. यातून निर्माण झालेला वाद सामाजिक सलोखा बिघडविण्यास कारणीभूत ठरू शकतो. या प्रकाराने संतापलेल्या तरुणाच्या गटाने शुक्रवारी पालिका कार्यालयापासून पोलीस ठाण्यावर जात निवेदन दिले. या तरुणांच्या भावना अत्यंत तीव्र स्वरूपाच्या होत्या.सामाजिक सलोख्याला बाधाघडत असलेल्या घटना सामाजिक सलोखा बिघडविण्यास सहाय्यभूत ठरू शकत असल्याने प्रशासनाने याकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे. नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ बंदच्या दिवशी दुपारी गांधी चौक परिसरातील घटना शांततेला बाधा आणणारी ठरू शकली असती, पोलिसांनी वेळीच दाखल घेतल्याने अनर्थ टळला.भरधाव वेगाने ट्रिपल सीट दुचाकी चालविणाऱ्या युवकांमुळे पायी चालणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आठवडे बाजाराच्या दिवशी गांधी चौकातून बाजार परिसरात दुचाकी व वाहनांना बंदीची मागणी होत असून, याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. गांधी चौक व पालिका चौकात वाहतूक नियंत्रणासाठी नियमित पोलिसाच्या नियुक्तीची मागणी आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाJamnerजामनेर