शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जळगाव जि.प.च्या सभेत पाणीप्रश्न गाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 12:15 IST

आता आमचे कपडे फाटायची वेळ आली आहे ; सर्व सदस्य आक्रमक

जळगाव : जिल्हाभरातील पाणीटंचाई दिवसेंदिवस भीषण होत असताना अधिकारी, कर्मचारी एसीत बसून कागदोपत्री टंचाईमुक्तीच्या गप्पा करीत असून आमच्या गटात आता केवळ आमचे कपडे फाटायची वेळ आली आहे. अशी आक्रमक भूमिका घेत सर्व सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. टंचाईचा विषय सर्वत्र पेटला असून ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष आहे़ प्रशासनाकडून मात्र, टँकर मंजूर असतानाही बंद करण्यात येतात, उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात, असा आक्षेप अनेक सदस्यांनी घेत़ एसीच्या थंड हवेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना घाम फोडला़आचारसंहितेच्या सावटतात झालेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी सुरूवातीपासून वादळी झाली़ दोन वाजेची वेळ असताना वीस मिनिटांनी सभेला उशीरा सुरूवात झाल्याने सदस्या पल्लवी सावकारे यांनी संताप व्यक्त करीत पदाधिकाऱ्यांना गांभिर्य नसल्याचा आरोप केला़ सभा कधी सुरू करताय अशी विचारणा केली़ अध्यक्षा उपस्थित नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली़ दरम्यान, अध्यक्षा उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन व शिक्षण सभापती पोपट भोळे हे अनुपस्थित असल्याने अखेर महिला व बालकल्याण समिती सभापती रजनी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.अनुकंपा भरतीबाबत चौकशीजि.प.२१३ जागा मंजूर असताना २४९ कर्मचाºयांना नियुक्ती देण्यात आली आहे़ यात ३६ पदे अतिरिक्त असताना त्यात आणखी अनुकंपा तत्त्वार सहा जणांना नियुक्ती देण्यात आली असून सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी़ एस़ अकलाडे यांनी उमेदवारांकडून पैसे घेऊन नियुक्त्या दिल्याचा आरोप सदस्य गोपाळ चौधरी यांनी केला़ यासंदर्भात चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली़ यावर स्वतंत्र चौकशी करून महिनाभरात अहवाल देऊ, असे आश्वासन अतिरिक्त संजय मस्कर यांनी दिले़ आपण या कर्मचाºयांचे पगार देणार कुठून आहोत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला़ आपण या बाबत सचिवांकडे तक्रार करू, असेही चौधरी यांनी यावेळी सांगितले़ रिक्त जागा नसताना जिल्हा परिषदेत अनुकंपाची भरती याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशीत केले होते़अधिकारी घामाघूममंगळवारी तापामानात वाढ जाणवत होती़ अशा स्थितीत सभागृहातील एसी चालू बंद होत होते़ अशाच स्थितीत पाणीटंचाईवर वादळी चर्चा झाली़ सदस्य नानाभाऊ महाजन यांनी पंधरा मिनिटांपर्यंत टंचाईचे चटके किती तीव्र आहे, याबाबत माहिती देत़ प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले़ विहिर खोलीकरणाचे प्रस्ताव तीन तीन महिने मंजूर होत नाही, जीएसडीएला(भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा) कर्मचारी नाही त्यामुळे स्त्रोत कळणार कसे,आपण एसीत बसून केवळ गप्पा ठोकतो़ अशी आक्रमक भूमिका मांडत विखरणला पाणीपुरवठा नसताना टंँकर अचानक बंद असल्याचे त्यांनी सांगितले़ पश्चिम महाराष्ट्रासारख्या भागात अडिचशे टँकर सुरू आहे़ आपल्या जिल्ह्यात मात्र दोनशेच टँकर कसे, सहाशे गावांमध्ये पाणीटंचाई असताना ऐवढ्या कमी टँकरवर तहान भागणार कशी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला़ सदस्यांच्या अक्रमक भूमिकेपुढे अधिकारी घामाघूम झाले होते़ पाणीटंचाईवर गाजलेल्या दोन तासांच्या याबैठकीत प्रत्येकाने किमान दोनदोन बॉटल पाणी पिले़ ४९ विहिरींचे प्रस्ताव आले होते़ त्यापैकी १६ कामे झालेली आहेत़ अशी माहिती पाणीपुरवठा अभियंता नरवाडे यांनी दिली़‘लोकमत’च्या टँकर स्टींगचे कौतुक... भुसावळ तालुक्यातील महादेव तांडा येथे पाणीपाुरवठ्यासाठी वापरण्यात येणारा टँकर अतिशय गळका असून हा टँकर भुसावळ पालिकेच्या विहिरीवरून भरण्याचे आदेश होते मात्र हा टँकर कधी कुºहे पानाचे येथील गावातून तर कधी धरणाच्या बॅकवॉटर जवळील एक नर्सरीमधील भरण्यात येत होता़ ‘लोकमत’ने यासंदर्भात स्टींग आॅपरेशन करून ही बाब उघडकीस आणली होती़ ‘लोकमत’ने स्टिंग केले म्हणून प्रशासनाला जाग आल्याचे सांगत सदस्या पल्लवी सावकारे यांनी लोकमत प्रतिनिधी उत्तम काळे यांचे अभिनंदन केले़ यासह अधिकाºयांना या मुद्यावरून धारेवर धरले़ यासदंर्भात भुसावळ बीडिओंना तत्काळ या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी आदेश दिले आहेत़ कोºया रजिस्टरवर सह्या घेतल्या जात असून यातून ठेकदारांचेचे पोषण होत आहे, जीपीएस केवळ लावून उपयोग नाही, ती तपासली गेली पाहिजे असा मुद्दाही सदस्या सावकारे यांनी मांडला़पाचोºयात वीस ते पंचवीस टँकर रस्त्यावरच उभेजि.प.ने डिझेलचे पैसे थकविल्याने २० ते २५ टँकर रस्त्यावर उभे आहेत़ लोक फोटो टाकून आम्हाला विचारणा करून आमच्यावर टीका होत असल्याचा मुद्दा मधू काटे यांनी मांडला़ यावर जिल्हाभरातील टँकरसाठी आलेली ३ कोटी ४४ लाखांची रक्कम सर्व गटविकास अधिकाºयांच्या स्तरावर पाठविली आहे़ त्यात पाचोºयाच्या दहा लाखांचाही समावेश असल्याचे नरवाडे यांनी सांगितले़तांत्रिक बाबीमुळे ही रक्कम पाचोºयात पोहचली नसल्याचे लेखा व वित्त अधिकाºयांनी स्पष्ट केले़ चहार्डीच्या २५ हजार ग्रामस्थांसाठी दोनच बोरवेल मंजूर का पर्यायी पाण्यासाठी व्यवस्था काय करणार अशी विचारणा नीलिमा पाटील यांनी केली़कांताई बंधाºयाचे १ कोटी ८३ लाख थकीत - गोपाळ चौधरीमोहाडी व शिरसोली शिवारातील पाझर तलाव नियोजित संस्था कांताबाई भवरलाल जैन फॅमिली नॉले इन्स्टीट्युट अंतर्गत शैक्षणिक व अभ्यासाच्या प्रयोजनार्थ सदर तलावांचे देखभाल, जतन व संवर्धन हेतू तीस वर्षांच्या कालावधीसाठी कराराअंतर्गत मिळावा, अशा प्रस्ताव आल्यानंतर शेतकरी वर्ग पाण्यापासून वंचित राहील, लोकांना पाणी मिळत नाही असे सांगत सदस्य गोपाळ चौधरी यांनी याबाबत विरोध दर्शविला होता़ त्यावेळी तीस वर्षांऐवजी ११ वर्षांचा करार करावा प्रति तलाव वार्षीक २० हजारांची आकारणी करावी व त्यात पाच वर्षानंतर वाढ करावी, असा ठराव करण्यात आला होता़ मात्र, ठरावानंतरही ११ ऐवजी ३० वर्षांचा उल्लेख इतिवृत्तात असल्याने ठराव झाला असताना असे झाले कसे असा सवाल उपस्थित करून यावर कारवाई करावी, अशी मागणी चौधरी यांनी सभेत केली़ ही प्रिटींग मिस्टेक असल्याचे स्पष्टीकरण अकलाडे यांनी दिले़ यासह कांताई बंधाºयासाठी पाणी उचल केली जात असताना २०१३ पासून या बंधाºयाचे १ कोटी ८३ लाख रूपये थकीत आहे़ एकीकडे गावे तहानलेली असताना प्रशासन पैसाने बंधाºयासाठी पाणी देते आणि वर पैसेही थकविले जातात़ ही वसुली करणार कोण? असा सवाल उपस्थित केला. आधी पाच वर्षाचे भडे घ्यावे अशी मागणी चौधरी यांनी केली़ यावर तुम्ही तसा ठराव करा आम्ही करारात तशा अटी शर्ती टाकतो असे मस्कर यांनी सांगितले़

टॅग्स :Jalgaonजळगाव