शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
4
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
5
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
6
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
7
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
8
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
9
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
10
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
11
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
12
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
13
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
14
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
15
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
16
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
18
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
19
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
20
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा

जळगाव मनपा निवडणूक : अडीच लाख मतदारांना मतदार चिठ्ठ्या वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 13:20 IST

४ दिवस शिल्लक

ठळक मुद्देअद्याप १ लाख मतदारांपर्यंत पोहचण्याचे आव्हानसायंकाळी सादर करावा लागतो अहवाल

जळगाव : मनपा निवडणुकीसाठी यावर्षी राज्य निवडणूक आयोगाकडून मतदारांना मतदारचिठ्ठ्या दिल्या जात आहेत. यासाठी ३५० हून अधिक बीएलओ, मनपा कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.गेल्या आठ दिवसांपासून मतदारांच्या घरापर्यंत जावून त्यांना मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत असून, आतापर्यंत २ लाख ४२ हजार ४४६ मतदारांना मतदार चिठ्ठ्या वाटप झाल्याची माहिती मनपा उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी दिली.मनपा प्रशासनाकडून मतदान जागृतीसाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. मतदानाच्या दिवशी अनेक मतदारांना मतदार याद्यांमध्ये नाव न सापडण्याची अडचण निर्माण होते. यामुळे त्यांना मतदानापासून देखील वंचित राहण्याची स्थिती निर्माण होत असते.ही स्थिती निर्माण होवू नये म्हणून यासाठी निवडणूक आयोगाकडूनच मतदारांना चिठ्ठ्यांचे वाटप केले जात आहे.या चिठ्ठ्यांचे वाटप होत आहे की नाही. या तपासणीसाठी देखील मनपा प्रशासनाकडून काही कर्मचाºयांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.चार दिवसात १ लाख २२ हजार मतदार चिठ्ठ्यांचे करावे लागेल वाटपमतदानाला आता केवळ चार दिवसांचा अवधी बाकी आहे. शंभर टक्के मतदार चिठ्ठ्या वाटप करणे शक्य नाही. कारण अनेकांनी आपल्या रहिवासात बदल केला आहे. तर अनेक मतदारांचे नाव जरी मतदार यादीत असले तरी त्यांचा रहिवास इतर शहरांमध्ये आहे. अद्याप १ लाख २२ हजार ६२६ मतदारांना मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करणे बाकी असून, ३१ जुलै पर्यंतच या चिठ्ठ्यांचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर १ आॅगस्ट रोजी मतदान केंद्रावर देखील मनपाकडून मतदारांना मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती उपायुक्त कहार यांनी दिली आहे.सायंकाळी सादर करावा लागतो अहवालसकाळपासून बीएलओ, मनपा कर्मचारी व आशा वर्कर यांच्या माध्यमातून मतदार चिठ्ठ्यांचे वाटप केले जात आहे. प्रत्येक बीएलओंना स्वतंत्र प्रभाग व काही भाग विभागून देण्यात आले आहेत. सायंकाळी मतदार चिठ्ठ्यांचे वाटप झाल्यानंतर प्रत्येकाला दिवसभराचा संपूर्ण अहवाल निवडणूक विभागाकडे सादर करावा लागत आहे.ज्या मतदारांचे पत्ते सापडले नाहीत. अशा मतदारांच्या चिठ्ठ्या निवडणूक विभागात जमा केल्या जात आहेत. तसेच मतदार चिठ्ठ्या वाटप करताना संबधित मतदाराचा मोबाईल क्रमांक व सही देखील घेतली जात आहे. त्यानंतर सायंकाळी मनपा प्रशासनाकडून या मतदारांना मोबाईलव्दारे संपर्क करून त्यांना मतदार चिठ्ठ्या भेटल्या की नाही. याची देखील खातरजमा करून घेण्यात येत आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव