शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

जळगाव मनपा निवडणूक : अडीच लाख मतदारांना मतदार चिठ्ठ्या वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 13:20 IST

४ दिवस शिल्लक

ठळक मुद्देअद्याप १ लाख मतदारांपर्यंत पोहचण्याचे आव्हानसायंकाळी सादर करावा लागतो अहवाल

जळगाव : मनपा निवडणुकीसाठी यावर्षी राज्य निवडणूक आयोगाकडून मतदारांना मतदारचिठ्ठ्या दिल्या जात आहेत. यासाठी ३५० हून अधिक बीएलओ, मनपा कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.गेल्या आठ दिवसांपासून मतदारांच्या घरापर्यंत जावून त्यांना मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत असून, आतापर्यंत २ लाख ४२ हजार ४४६ मतदारांना मतदार चिठ्ठ्या वाटप झाल्याची माहिती मनपा उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी दिली.मनपा प्रशासनाकडून मतदान जागृतीसाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. मतदानाच्या दिवशी अनेक मतदारांना मतदार याद्यांमध्ये नाव न सापडण्याची अडचण निर्माण होते. यामुळे त्यांना मतदानापासून देखील वंचित राहण्याची स्थिती निर्माण होत असते.ही स्थिती निर्माण होवू नये म्हणून यासाठी निवडणूक आयोगाकडूनच मतदारांना चिठ्ठ्यांचे वाटप केले जात आहे.या चिठ्ठ्यांचे वाटप होत आहे की नाही. या तपासणीसाठी देखील मनपा प्रशासनाकडून काही कर्मचाºयांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.चार दिवसात १ लाख २२ हजार मतदार चिठ्ठ्यांचे करावे लागेल वाटपमतदानाला आता केवळ चार दिवसांचा अवधी बाकी आहे. शंभर टक्के मतदार चिठ्ठ्या वाटप करणे शक्य नाही. कारण अनेकांनी आपल्या रहिवासात बदल केला आहे. तर अनेक मतदारांचे नाव जरी मतदार यादीत असले तरी त्यांचा रहिवास इतर शहरांमध्ये आहे. अद्याप १ लाख २२ हजार ६२६ मतदारांना मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करणे बाकी असून, ३१ जुलै पर्यंतच या चिठ्ठ्यांचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर १ आॅगस्ट रोजी मतदान केंद्रावर देखील मनपाकडून मतदारांना मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती उपायुक्त कहार यांनी दिली आहे.सायंकाळी सादर करावा लागतो अहवालसकाळपासून बीएलओ, मनपा कर्मचारी व आशा वर्कर यांच्या माध्यमातून मतदार चिठ्ठ्यांचे वाटप केले जात आहे. प्रत्येक बीएलओंना स्वतंत्र प्रभाग व काही भाग विभागून देण्यात आले आहेत. सायंकाळी मतदार चिठ्ठ्यांचे वाटप झाल्यानंतर प्रत्येकाला दिवसभराचा संपूर्ण अहवाल निवडणूक विभागाकडे सादर करावा लागत आहे.ज्या मतदारांचे पत्ते सापडले नाहीत. अशा मतदारांच्या चिठ्ठ्या निवडणूक विभागात जमा केल्या जात आहेत. तसेच मतदार चिठ्ठ्या वाटप करताना संबधित मतदाराचा मोबाईल क्रमांक व सही देखील घेतली जात आहे. त्यानंतर सायंकाळी मनपा प्रशासनाकडून या मतदारांना मोबाईलव्दारे संपर्क करून त्यांना मतदार चिठ्ठ्या भेटल्या की नाही. याची देखील खातरजमा करून घेण्यात येत आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव