शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
2
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
3
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
4
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
5
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
6
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
7
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
8
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
9
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
10
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
11
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
12
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
13
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
14
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
15
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
16
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
17
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
18
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
19
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
20
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव मनपा निवडणूक : अडीच लाख मतदारांना मतदार चिठ्ठ्या वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 13:20 IST

४ दिवस शिल्लक

ठळक मुद्देअद्याप १ लाख मतदारांपर्यंत पोहचण्याचे आव्हानसायंकाळी सादर करावा लागतो अहवाल

जळगाव : मनपा निवडणुकीसाठी यावर्षी राज्य निवडणूक आयोगाकडून मतदारांना मतदारचिठ्ठ्या दिल्या जात आहेत. यासाठी ३५० हून अधिक बीएलओ, मनपा कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.गेल्या आठ दिवसांपासून मतदारांच्या घरापर्यंत जावून त्यांना मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत असून, आतापर्यंत २ लाख ४२ हजार ४४६ मतदारांना मतदार चिठ्ठ्या वाटप झाल्याची माहिती मनपा उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी दिली.मनपा प्रशासनाकडून मतदान जागृतीसाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. मतदानाच्या दिवशी अनेक मतदारांना मतदार याद्यांमध्ये नाव न सापडण्याची अडचण निर्माण होते. यामुळे त्यांना मतदानापासून देखील वंचित राहण्याची स्थिती निर्माण होत असते.ही स्थिती निर्माण होवू नये म्हणून यासाठी निवडणूक आयोगाकडूनच मतदारांना चिठ्ठ्यांचे वाटप केले जात आहे.या चिठ्ठ्यांचे वाटप होत आहे की नाही. या तपासणीसाठी देखील मनपा प्रशासनाकडून काही कर्मचाºयांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.चार दिवसात १ लाख २२ हजार मतदार चिठ्ठ्यांचे करावे लागेल वाटपमतदानाला आता केवळ चार दिवसांचा अवधी बाकी आहे. शंभर टक्के मतदार चिठ्ठ्या वाटप करणे शक्य नाही. कारण अनेकांनी आपल्या रहिवासात बदल केला आहे. तर अनेक मतदारांचे नाव जरी मतदार यादीत असले तरी त्यांचा रहिवास इतर शहरांमध्ये आहे. अद्याप १ लाख २२ हजार ६२६ मतदारांना मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करणे बाकी असून, ३१ जुलै पर्यंतच या चिठ्ठ्यांचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर १ आॅगस्ट रोजी मतदान केंद्रावर देखील मनपाकडून मतदारांना मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती उपायुक्त कहार यांनी दिली आहे.सायंकाळी सादर करावा लागतो अहवालसकाळपासून बीएलओ, मनपा कर्मचारी व आशा वर्कर यांच्या माध्यमातून मतदार चिठ्ठ्यांचे वाटप केले जात आहे. प्रत्येक बीएलओंना स्वतंत्र प्रभाग व काही भाग विभागून देण्यात आले आहेत. सायंकाळी मतदार चिठ्ठ्यांचे वाटप झाल्यानंतर प्रत्येकाला दिवसभराचा संपूर्ण अहवाल निवडणूक विभागाकडे सादर करावा लागत आहे.ज्या मतदारांचे पत्ते सापडले नाहीत. अशा मतदारांच्या चिठ्ठ्या निवडणूक विभागात जमा केल्या जात आहेत. तसेच मतदार चिठ्ठ्या वाटप करताना संबधित मतदाराचा मोबाईल क्रमांक व सही देखील घेतली जात आहे. त्यानंतर सायंकाळी मनपा प्रशासनाकडून या मतदारांना मोबाईलव्दारे संपर्क करून त्यांना मतदार चिठ्ठ्या भेटल्या की नाही. याची देखील खातरजमा करून घेण्यात येत आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव