शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

तळीराम मनपा कर्मचाऱ्यामुळे वयोवद्धाच्या पार्थिवावरील अंत्यसंस्कार तब्बल साडेतीन तास खोळंबले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 09:37 IST

जळगाव : रामानंद परिसरातील एका निराधार वृद्धाच्या निधनानंतर परिसरातील नागरिकांनी माणुसकी दाखवून तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास पुढाकार घेतला. मात्र बुधवारी रात्री स्मशानभूमीत मनपाचा कोणीही कर्मचारी उपस्थित नसल्याने पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल साडेतीन तास प्रतीक्षा करावी लागली. तळीराम मनपा कर्मचा-याच्या तल्लफने हा संतापजनक प्रकार  घडला, तो संतप्त नागरिकांनी ‘लोकमत’कडे कळविला. पार्वतीनगरात राहणारे उत्पल ...

जळगाव : रामानंद परिसरातील एका निराधार वृद्धाच्या निधनानंतर परिसरातील नागरिकांनी माणुसकी दाखवून तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास पुढाकार घेतला. मात्र बुधवारी रात्री स्मशानभूमीत मनपाचा कोणीही कर्मचारी उपस्थित नसल्याने पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल साडेतीन तास प्रतीक्षा करावी लागली. तळीराम मनपा कर्मचा-याच्या तल्लफने हा संतापजनक प्रकार  घडला, तो संतप्त नागरिकांनी ‘लोकमत’कडे कळविला. 

पार्वतीनगरात राहणारे उत्पल डे (वय ६०) यांचे बुधवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास  हृदयविकारामुळे निधन झाले. डे यांचे या भागात मुलगी व जावई वगळता कोणीही नातेवाईक नाही. यामुळे रामानंदनगर परिसरातील नागरिकांनी लोकवर्गणी गोळा करून नेरीनाका स्मशानभूमीत पूर्व सूचना देत त्यांचे पार्थिव रात्री १० वाजता आणले.  मात्र त्यानंतरही रात्री पार्थिव आणले असता स्मशानभूमीत कोणीही कर्मचारी हजर नव्हता. या दरम्यान महापालिकेत फोन करून कळविले. परंतु उपयोग झाला नाही. रात्री दीड वाजेपर्यंत कर्मचारी आलेला नव्हता. अखेरीस नागरिकांनी स्मशानभूमीतील कर्मचा-याला मद्याच्या दुकानावरून शोधून आणले. यानंतर रात्री 1.45 वाजण्याच्या अंत्यसंस्कार करण्यात आले.