शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

थंडीने जळगावकर गारठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 18:23 IST

उत्तरेकडून येणाºया थंड वाºयांमुळे राज्यभर थंडीची लाट असली तरीही इतर जिल्ह्यांचा तूलनेत जळगाव व धुळ्याला थंडीची अधिक तीव्रता जाणवतेय

ठळक मुद्देपारा १० अंशावर स्थिरवाऱ्यांमुळे दिवसाही गारवातीन दिवस थंडीची लाट कायम राहणार

जळगाव : गेल्या आठवडाभरापासून शहराच्या किमान तापमानात सारखी घट होत आहे. चार दिवसांपासून शहराचा किमान पारा १० अंशावर स्थिर असल्यामुळे जळगावकर गुलाबी थंडीने गारठले आहे. उत्तरेकडून येणाºया थंड वाºयांमुळे राज्यभर थंडीची लाट असली तरीही इतर जिल्ह्यांचा तूलनेत जळगाव व धुळ्याला थंडीची अधिक तीव्रता जाणवतेय, अजून तीन दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.यंदा थंडीच्या प्रमाणात सारखाच चढ-उतार पहायला मिळत आहे. आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस थंडीचा कडाखा वाढला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा थंडी गायब झाली होती. त्यानंतर दिवाळीच्या चार दिवसात देखील किमान पारा ११ अंशापर्यंत खाली आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली होती. नोव्हेंबर महिन्यात किमान सरासरी तापमान १६ ते १८ अंशपर्यंत कायम होते. १५ डिसेंबर पर्यंत १२ ते १४ अंशपर्यंत किमान तापमानाचा पारा कायम राहील आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्यात पारा याच सरासरीने कायम राहणार आहे. थंडीच्या लाटेचा परिणाम जनजीवनावर देखील झालेला पहायला मिळत आहे. नागरिकांनी त्यानुसार आपल्या दैनंदिन कामकाजात देखील बदल केलेला दिसून येत आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला येणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यामध्ये युवकांसोबत ज्येष्ठ नागरिकांचीही संख्या लक्षणीय आहे.रब्बीच्या पिकांच्या वाढीसाठी थंडी लाभदायकआठवडाभरापासून पडणाºया कडाक्याच्या थंडीमुळे रब्बीच्या गहु, हरभरा व मका पिकाला चांगला लाभ मिळत आहे. थंडीसह आर्द्रतेचे प्रमाण देखील वाढल्यामुळे वातावरणात दव देखील वाढले आहे. त्यामुळे रब्बीच्या पिकांना पाणी भरणा करण्याची खुप कमी पडत आहे. तालुक्यात रब्बी हंगामाची जवळ-जवळ ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पेरणी झालेल्या पिकांच्या वाढीला थंडी लाभदायक ठरत आहे. दरम्यान, केळीला मात्र, अतीथंडीचा फटका बसत असून, त्यामुळे केळीवर करपा रोज वाढण्याची शक्यता आहे.थंडीचे वातावरण न मानवणाºयांना सर्दी, खोकल्यासह सांधेदुखीचा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे दवाखान्यांमधील रुग्णांची संख्याही वाढली आहे. तसेच दिवसाही गरम वस्तूंमधून ऊब मिळविण्याची गरज भासू लागली आहे. दोन दिवसांपासून सर्दी-खोकल्याच्या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. दरम्यान, थंडीपासून बचावासाठी कानाला रुमाल व अंगात स्वेटर घालण्याचे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे. गरम पाण्याची वाफ घेतल्यास सर्दी कमी होण्यास मदत होते असा सल्ला सर्जन डॉ.उत्तम चौधरी यांनी दिला आहे.दरम्यान, या आठवड्यात थंडीच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता असून, पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. तसेच काही दिवस ढगाळ वातावरण देखील जिल्ह्यात पहायला मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :JalgaonजळगावTemperatureतापमान