शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

महाविकास आघाडीच्या प्रयोगाला जळगाव जिल्हा परिषदेत ब्रेक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 13:08 IST

राष्ट्रवादीच्या काही सदस्यांचे बंडाचे संकेत

जळगाव : जि.प.तील राष्ट्रवादी व शिवसेनेच्या प्रत्येकी एक अशा दोन सदस्य अपात्रेसंदर्भात आठ दिवसापूर्वीच जिल्हा परिषदेला पत्र प्राप्त झाले आहे. जोपर्यंत 'स्टे आॅर्डर' आमच्यापर्यंत येत नाही, तोपर्यंत या सदस्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही, अशी स्पष्ट भूमिका प्रशासनाने घेतली आहे़ तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करत स्वतंत्र भूमिका घेण्याचे संकेत दिल्याने महाविकास आघाडीचे गणित जुळण्याआधीच बिघडले आहे़अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषदेत नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झालेली आहे़ भाजपकडूनच अध्यक्षपदासाठी एकापेक्षा अधिक उमेदवार येऊ शकतात, हे गृहीत धरूनच पुढील आखणी केली जात आहे़ शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांच्याकडून शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार प्रयत्न होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे़ मात्र महाविकास आघाडीच्या गणितांचा पाया असलेल्या दोन सदस्य अपात्रतेच्या मुद्दयावर प्रशासकीय स्पष्टीकरण आल्यामुळे आता हा 'गणिताचा पेपर' महाविकास आघाडीसाठी जवळपास अशक्य झाला आहे़ भाजप नेते माजी आमदार एकनाथराव खडसे व शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांची भूमिका ही महाविकास आघाडीच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाची मानली जात आहे़ या दोघांनी ठरविल्यास भाजपच्या एका गटाला दूर ठेवून सत्ता मिळविता येऊ शकते, असा दावा शिवसेनेकडून वारंवार होत आहे़ त्यामुळे या दोघा नेत्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे़दरम्यान, दोन सदस्य अपात्र असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बहुमताचा आकडा घटणार असल्याने आम्ही स्वबळावरही सत्तेत राहू शकतो, मात्र, तरीही अडीच वर्ष साध दिलेल्या काँग्रेसला सोबत घेऊच, असेही भाजपतर्फे आता सांगितले जात आहे़अध्यक्षपदासाठी भाजपमध्येच अंतर्गत लढतगट -तट व महाविकास आघाडीच्या समीकरणांची पार्श्वभूमी बघता भाजपला व्हीप काढून सत्ता टिकविण्याची धडपड करावी लागणार हे जवळपास निश्चित झाले आहे़ मात्र, अध्यक्षपदावरून भाजपमधून दोन ते तीन उमेदवार अर्ज दाखल करू शकतात तर दोन उमेदवारांचे अर्जही कायम राहू शकतात व पेच निर्माण होऊ शकतो, अशी सध्या परिस्थिती उद्भवल्याचे चित्र आहे़ अशा स्थितीत पक्ष काय भूमिका घेतो?यावर जि़ प़ ची पुढील राजकीय समिकरणे अवलंबून असतील.आघाडी होण्याआधीच मोठा धक्कागेल्या वेळी निवडणुकीत गैरहजर राहिलेल्या राष्ट्रवादीच्या सदस्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे़ या सदस्यांशी गेल्या आठ दिवसांपासून राष्ट्रवादीचे सदस्य सातत्याने संपर्कात असून आपल्याला बदल घडवायचा असल्याची उदाहरणे दिली जात आहे, मात्र, पक्षाने आम्हाला आतापर्यंत विचारले नाही, आता गरज भासल्यावर आम्हाला विचारले जाते, अशा शब्दात यापैकी एका सदस्याने नाराजी व्यक्त केली असून आता आमची भूमिका आम्ही ठरवू, असे सांगितल्याने महाविकास आघाडी निर्माण होण्याआधीच मोठा धक्का बसला आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव