शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Jalgaon: जळगावच्या विद्यापीठाने करून दाखवले !

By अमित महाबळ | Updated: October 18, 2023 17:39 IST

Jalgaon News: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षांचे निकाल ३० ते ४५ दिवसाच्या आत जाहीर करून राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये अग्रस्थान प्राप्त केले आहे.

- अमित महाबळ जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षांचे निकाल ३० ते ४५ दिवसाच्या आत जाहीर करून राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये अग्रस्थान प्राप्त केले आहे. तसेच परीक्षा निकालातील त्रुटी देखील कमी केल्या आहेत, अशी माहिती प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी परीक्षा विभागाची कार्यपद्धती आणि तणावमुक्त व कॉपीमुक्त परीक्षा या विषयांवरील बैठकीत दिली. मंगळवारी विद्यापीठात ही बैठक घेण्यात आली. 

अधिसभा सदस्य, महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, शिक्षक प्रतिनिधी व विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रा.योगेश पाटील, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, माजी संचालक प्रा.दीपक दलाल यांनी मार्गदर्शन केले. प्रा. योगेश पाटील यांनी परीक्षेशी निगडीत अध्यादेशाची सविस्तर माहिती बैठकीत दिली. कॉपी केल्यास कोणत्या शिक्षा होऊ शकतात याची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी, असे आवाहन केले. प्रास्ताविक‍ कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.मुनाफ शेख यांनी केले. व्यवस्थापन परिषद सदस्य ॲड. अमोल पाटील व प्रा. सुरेखा पालवे यांनी मनोगत व्यक्त केले. 

तक्रारी महाविद्यालय स्तरावर सोडवाप्रा. एस. टी. इंगळे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या परीक्षा निकालासंदर्भातील तक्रारी विद्यापीठात प्राप्त होण्यापूर्वी त्या महाविद्यालय स्तरावर सोडविल्या जाव्यात. विद्यार्थ्यांना विद्यापीठात येण्याची गरज पडू नये. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात तासिकांना नियमित उपस्थिती द्यावी. जेणेकरून त्यांना कॉपी करण्याची गरज भासणार नाही. यासाठी विद्यापीठाच्या अभियानाला संघटनांनी व सर्व घटकांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

विधी शाखेचा पॅटर्न सुधारित कराविद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींनी विधी शाखेचा पॅटर्न सुधारित करावा, प्राध्यापकांनी आदर्श उत्तर पत्रिका कशी लिहावी याचे मार्गदर्शन करावे, विद्यार्थ्यांचा तक्रारींचा निपटारा त्वरीत व्हावा, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवाव्यात यासारख्या विविध मागण्या केल्या.

टॅग्स :universityविद्यापीठJalgaonजळगावEducationशिक्षण