शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
4
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
5
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
6
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
7
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
8
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
9
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
10
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
11
पुतीन परतले, पुढे...?
12
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
13
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
15
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
16
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
17
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
18
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
19
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
20
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात भरधाव ट्रकने मोहाडीच्या महिलेला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 13:24 IST

नातेवाईकांकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावर झाला अपघात

ठळक मुद्देअपघातग्रस्त ट्रक व दुचाकी पोलिसांनी घेतली ताब्यातअपघातानंतर पत्नीचा मृतदेह पाहून पती बेशुद्धमिस्तरी काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.५ : अमळनेर तालुक्यातील भरवस येथे नातेवाईकांकडे दुचाकीने जात असलेल्या वसंत पंडीत खैरनार (वय ६०) व त्यांच्या पत्नी मिराबाई खैरनार (वय ५२) रा.मोहाडी, ता.जळगाव या दाम्पत्याला मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने ट्रकच्या टायरखाली येऊन मिराबाई खैरनार यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी साडे सात वाजता महामार्गावर बांभोरी येथील जैन इरिगेशन या कंपनीच्या समोर झाला.वसंत खैरनार व त्यांच्या पत्नी मीराबाई भरवस येथे नातेवाईकांकडे जाण्यासाठी दुचाकीने (क्र. एम.एच.१९ ए.जे.४४१७) सकाळी सात वाजता घरातून बाहेर पडले. बांभोरीजवळ जैन इरिगेशन कंपनीजवळ मागून आलेल्या ट्रकने (क्र.डब्यु.बी.२३ ई ९४१५) जोरदार धडक दिली. त्यात वसंत खैरनार हे रस्त्याच्या कडेला फेकले गेले तर त्यांच्या पत्नी रस्त्यावर पडल्याने या ट्रकचे टायर त्यांच्या अंगावरुन गेले. त्यामुळे त्या जागीच गतप्राण झाल्या.मिस्तरी काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाहखैरनार यांची परिस्थिती साधारण आहे. त्यांना एक मुलगा व पाच मुली आहे. त्यापैकी तीन मुलींचे लग्न झालेले असून मुलगा हरिलाल व दोन मुली अविवाहित आहेत. मिस्तरी काम करुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. आई ठार झाल्याने मुलांना मोठा धक्का बसला. जिल्हा रुग्णालयात त्यांनी प्रचंड आक्रोश केला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह मोहाडी येथे नेण्यात आला. याप्रकरणी पाळधी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.पत्नीचा मृतदेह पाहून पती बेशुद्धअंगावरुन ट्रक गेल्याने मिराबाई यांच्या शरीरातील मांस बाहेर आले. ते रस्त्यावर पसरले होते. या अपघातात जखमी झालेल्या वसंत खैरनार हे प्रकार पाहिल्यावर जागेवरच बेशुध्द पडले. दरम्यान, जैन इरिगेशन कंपनीच्या सहकाºयांनी तत्काळ पाळधी पोलिसांना घटनेची माहिती कळवून घटनास्थळ गाठले. सहायक फौजदार रमेश पाटील, किरण धमके व सुमित पाटील यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. तर अपघातग्रस्त ट्रक व दुचाकी ताब्यात घेतली. दरम्यान, घटना घडल्यानंतर चालक ट्रक सोडून पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघात