शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

जळगाव - शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या रकमेतून परस्पर काढली जातेय कर्जाची रक्कम

By ajay.patil | Updated: September 8, 2022 19:22 IST

राष्ट्रीयीकृत बँकेसह जिल्हा बँकेची मनमानी; खासदार उन्मेष पाटलांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार.

यंदा जास्त तापमान व कमी तापमानामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांना एकूण ३७५ कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, ही रक्कम खात्यात वर्ग झाल्यानंतर अनेक राष्ट्रीयीकृत बँकांनी ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची रक्कम घेतली आहे, अशा शेतकऱ्यांची कर्जाची रक्कम परस्पर पीक विम्याच्या रकमेतून सेव्हींग अकांऊटमधून थेट कर्ज खात्यात वर्ग केली जात आहे. याबाबत शेतकऱ्यांना साधी विचारणादेखील होत नसल्याचा तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत.

याबाबत खासदार उन्मेष पाटील यांनी गुरुवारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीदेखील बँकांना ही रक्कम शेतकऱ्यांना न विचारता किंवा त्यांची परवानगी न घेता कर्ज खात्यात वर्ग करण्यात येऊ नये, अशा सूचना बँकांना दिल्या आहेत. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांकडेही या प्रकरणी दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून देण्यात आली आहे.

कर्ज वसूल करण्याची पद्धत सोडून मनमानी कारभारज्या शेतकऱ्यांकडे बँकांची कर्जाची रक्कम थकीत आहे. ही रक्कम वसूल करण्याबाबत बँकांकडून संबंधित शेतकऱ्यांकडून ही रक्कम मिळावी यासाठी शेतकऱ्यांना नोटीस दिली जाऊ शकते, किंवा शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर बोझा बसविला जावू शकतो. मात्र, शेतकऱ्यांच्या बचत खात्यातील रक्कम कर्ज खात्यात वर्ग करण्याची तरतूद नाही. विशेष म्हणजे हा नियमच नाही, त्यातच जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांकडून ही रक्कम तर परस्पर वर्ग केलीच जात आहे. मात्र, याबाबत शेतकऱ्यांना विचारले देखील जात नसून, कोणतीही माहिती देखील शेतकऱ्यांना दिली जात नसल्याची माहिती जळगाव तालुक्यातील नांद्रा, गाढोदा येथील शेतकऱ्यांनी दिली आहे.

नुकसानभरपाईच्या रकमेतून वर्ग करणे नियमबाह्य - खासदार उन्मेष पाटीलशेतकऱ्यांच्या खात्यात आलेली रक्कम ही शेतकऱ्यांना बक्षीस स्वरूपात मिळालेली रक्कम नाही. तर ही रक्कम शेतकऱ्यांनी लावलेल्या केळीचे जास्त व कमी तापमानामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाईपोटी मिळालेली पीक विम्याची रक्कम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा हा मोबदला आहे. मात्र, त्या रकमेतून शेतकऱ्यांना न विचारता शेतकऱ्यांच्या बचत खात्यातून ती रक्कम कर्ज खात्यात टाकणे हे नियमबाह्य असल्याची प्रतिक्रिया खासदार उन्मेष पाटील यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देखील सूचना दिल्या असून, अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांनाही ही रक्कम परस्पर वर्ग करू नये, अशा सूचना दिल्याची माहिती उन्मेष पाटील यांनी दिली आहे.

जिल्हा बँकेकडून अशा प्रकारे शेतकऱ्यांची कोणतीही रक्कम वर्ग केली जात नाही. राष्ट्रीयीकृत बँकांकडून अशाप्रकारे रक्कम वर्ग केली जात आहे. राष्ट्रीयीकृत बँका जिल्हाधिकाऱ्यांच्याही सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेत. जिल्हा बँकेकडून अशा प्रकारे रक्कम वर्ग केली जात नाही.जितेंद्र देशमुख,कार्यकारी संचालक, जिल्हा बँक

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव