शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

Jalgaon: जळगावात सकाळी विद्यार्थी आले, पण दुपारनंतर तेही नाहीत..!

By अमित महाबळ | Updated: March 14, 2023 17:40 IST

Government Employees Strike : जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदात संपात शिक्षक संघटनांनी घेतलेल्या सहभागाचे पडसाद मंगळवारी सकाळपासून शहरातील शैक्षणिक संस्थांमध्ये बघायला मिळाले.

- अमित महाबळ

जळगाव - जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदात संपात शिक्षक संघटनांनी घेतलेल्या सहभागाचे पडसाद मंगळवारी सकाळपासून शहरातील शैक्षणिक संस्थांमध्ये बघायला मिळाले. सकाळच्या सत्रात तुरळक संख्येने विद्यार्थी आले होते पण दुपारनंतर तेही दिसले नाहीत. शाळांनी मुलांना शाळेत पाठवू नका, असे आवाहन पालकांना केले होते. मात्र अधिकृत सुटी जाहीर केली नव्हती.

दोन सत्रात भरणाऱ्या शाळांमध्ये सकाळच्या सत्रात विद्यार्थी आले होते पण त्यांची संख्या अतिशय कमी होती. एरवी ३० वर्ग लागायचे तेथे आज एक वर्गही मोठा भासत होता. नियमित शिक्षक नसल्याने अस्थायी शिक्षक व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या भरवशावर शाळा, महाविद्यालयांचे कामकाज पार पडले. दुपारनंतर विद्यार्थीच आले नाही. परंतु, अधिकृत सुटी घोषित करण्यात आलेली नव्हती.

यावेळी आधीच खबरदारीसंपामुळे नियमित शिक्षक व कर्मचारी शाळेत उपस्थित राहणार नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत आल्यानंतर परत घरी जावे लागणार होते. अशावेळी त्यांची जबाबदारी कुणी घ्यायची, यातून पालकांनाही मनस्ताप होतो, मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न असतो आदी मुद्दे लक्षात घेऊन शहरातील शाळांच्या मुख्याध्यापकांनी मुलांना शाळेत पाठवू नका, असे आवाहन पालकांना केले होते. प. न. लुंकड कन्या शाळेत विद्यार्थिनींचे नाव नोंदवून घेतल्यावर त्यांना घरी सोडले जात होते.

अन् बारावीची परीक्षाही सुरळीतसंपाचा पहिलाच दिवस आणि बारावीचे दोन सत्रात पेपर कसे घ्यायचे अशा संकटात माध्यमिक शिक्षण विभाग सापडला होता. सोमवारी करण्यात आलेल्या नियोजनानुसार परीक्षा सुरळीत पार पाडण्यात यश आले. शिक्षक संपात असल्याने पूरक व्यवस्था उभी करण्याचे निर्देश होते. जिल्ह्यातील ३७ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. जळगाव शहरातील नूतन मराठा केंद्रात केंद्र संचालक हजर होते पण संपामुळे पर्यवेक्षक नव्हते. त्यामुळे विनाअनुदानित व इंग्रजी माध्यमातील सहा जणांची मदत घेण्यात आली. धरणगाव केंद्रातही पूरक व्यवस्था करण्यात आली.

अस्थायी शिक्षकांच्या मदतीने पार पडला नववीचा पेपरला. ना. शाळेत सात वर्षांपासून दहावीच्या परीक्षेच्या बरोबरीने नववीच्या विद्यार्थ्यांचीही परीक्षा घेतली जाते. त्यांचा मंगळवारी शेवटचा हिंदी/संस्कृतचा पेपर होता. अस्थायी शिक्षकांच्या मदतीने दुपारी १२ ते ३ वेळेत तो पार पडला. ३६८ परीक्षार्थी होते. नियमित सेवेतील शिक्षक संपावर होते. या विद्यार्थ्यांचे वर्ग १५ मार्च ते एप्रिल अखेरपर्यंत भरणार आहेत. त्यामुळे त्यांना दीड महिना अभ्यासासाठी अतिरिक्त मिळेल. संप सुरूच राहिला, तर अस्थायी शिक्षकांच्या मदतीने नववीच्या मुलांना शिकवणे सुरू केले जाईल, अशी माहिती मुख्याध्यापक दुर्गादास मोरे यांनी दिली.

टॅग्स :Government Employees Strikeसरकारी कर्मचाऱ्यांचा संपJalgaonजळगावStudentविद्यार्थी