शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात विद्यार्थिनीने बारावीच्या पेपर देऊन पित्याला दिला खांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 12:27 IST

दोन्ही मुलींनी मुलाची कोणतीही उणीव भासू न देता पित्याला खांदा देऊन अग्नीडागही देत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला असल्याचा सूर

ठळक मुद्देसाध्वींसोबत विहार करीत असताना संजय संचेती यांनी घेतला अखेरचा श्वास दोन्ही मुलींनी निर्माण केला आदर्श

विजयकुमार सैतवाल / ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. १ - अवघ्या तीन तासांवर बारावीची परीक्षा देण्याची वेळ आली असताना पित्याचा अचानक मृत्यू होऊन दु:खाचा डोंगर कोसळलेल्या आयोध्यानगरातील संजना संजय संचेती या विद्यार्थिनीने दु:खावर मात करीत मोठ्या धीराने बारावीची परीक्षा दिली. विशेष म्हणजे परीक्षा झाल्यानंतर संजनाने आपली बहिण अमृतासह पित्याच्या पार्थिवाला खांदा देत दोघींनी मुखाग्नीही दिला. मन हेलावून टाकणारा हा प्रसंग बुधवारी संचेती कुटुंबावर ओढावला व सर्वांनी याबाबत हळहळ व्यक्त करीत या मुलींच्या धाडसाचे कौतुक केले.व्यापारी संजय शांतीलाल संचेती (४९) हे पत्नी, दोन मुली, आई, भाऊ यांच्यासह आयोध्यानगरमध्ये रहात. त्यांची धाकटी मुलगी संजना हिची बारावीची परीक्षा सुरू असून तिचा आज सकाळी ११ वाजता रसायनशास्त्र विषयाचा पेपर होता.याच दरम्यान बुधवारी सकाळी संजय संचेती हे भुसावळ - जळगाव दरम्यान असलेल्या लोढा नगर येथून जैन साध्वी इंदुबालाजी म.सा. आदी ठाणा ६ यांच्या सोबत जळगावकडे विहार करीत होते. लोढा नगरपासून एक-दीड कि.मी अंतरावर आले असताना सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास संजय संचेती यांना अचानक चक्कर येऊन खाली कोसळले. त्या वेळी त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.इकडे घरी धाकटी मुलगी बारावीच्या परीक्षेला जाण्याची तयारी करीत होती तेवढ्यात पित्याच्या मृत्यूची वार्ता घरी येऊन धडकली. यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांसह परीक्षार्थी संजना हिच्यावरही दु:खाचा डोंगर कोसळला. घरात एकच अकांत सुरू होता. या दुु:खद घटनेने अवघ्या तीन तासांवर आलेली परीक्षा देण्याचाही धीर काही क्षण हरविला. त्यावेळी इतरांनी संजनाचे सांत्वन केले व तीदेखील मोठ्या धीराने उभी राहिली आणि पिताच्याचे पार्थिव घरात ठेवून व आशीर्वाद घेऊन परीक्षेला गेली.मुलींनीच दिला खांदादुपारी दोन वाजता परीक्षा संपल्यानंतर घरी येऊन संजना व तिची मोठी बहीण अमृता यांनी पित्याची सेवा केली व पार्थिवाला खांदा दिला. पुढे वैकुंठधाम येथे अंत्यायात्रा पोहचल्यानंतर तेथे दोन्ही मुलींनी पित्याला मुखाग्नी देत अखेरचा निरोप दिला. या वेळी संपूर्ण वातावरण भावूक होऊन उपस्थितांचे डोळे पाणावले होते.साध्वींना आहार देण्याची इच्छा राहिली अपूर्णजैनाचार्य हस्तीमलजी म.सा. यांच्या शिष्या इंदुबालाजी म.सा. आदी ठाणा ६ या बुधवारी जळगावातील जैन भवनकडे विहार करीत असल्याने या दरम्यान असलेल्या आयोध्यानगरातील आपल्या घरी त्यांना आणून आहार देण्यासाठी सकाळपासून संजय संचेती हे साध्वीजींसोबत होते. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याने आहार देण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली.संचेती कुटुंबावरील या अचानक कोसळलेल्या दु:खाच्या प्रसंगी महावीर जैन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बेदमुथा यांनी धाव घेऊन कुटुंबास धीर दिला व संजना हिलादेखील परीक्षेसाठी प्रोत्साहीत केले.घराण्याला कुलदीपक म्हणून तसेच शेवटच्या क्षणी अग्नीडाग देण्यासाठी मुलगाच पाहिजे, असा साधारणपणे समज असतो. मात्र जळगावातील या दोन्ही मुलींनी मुलाची कोणतीही उणीव भासू न देता पित्याला खांदा देऊन अग्नीडागही देत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला असल्याचा सूर या निमित्ताने उमटत आहे.

टॅग्स :JalgaonजळगावStudentविद्यार्थी