शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

बाधितांच्या मृत्यूमध्ये राज्यात जळगाव चौथ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 11:59 IST

चिंताजनक : अनेक मोठ्या महानगरांना टाकले मागे, मृत्यू रोखणे मोठे आव्हान

आनंद सुरवाडे।जळगाव : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढतच असून या सोबतच रोज किमान चार बाधितांचे मृत्यूही होत आहेत. त्यामुळे वाढत जाणारी मृत्यूची संख्या दिवसेंदिवस चिंताजनक होत असून राज्यात बाधितांच्या मृत्यूसंख्येत जळगाव जिल्हा चौथ्या क्रमांकावर आला आहे़ मृत्यूदराची तुलना केल्यास जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यात मृतांची संख्या ९४वर पोहचली असून मुंबई, पुणे, ठाणे या नंतर थेट जळगावचा क्रमांक लागत आहे.जळगावचा मृत्यूदर हा देशाच्या मृत्यदरापेक्षा चौपट असल्याचे चित्र असताना असा मृत्यूदर काढला जात नाही, असा दावाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून करण्यात येत आहे़ आता तपासण्या वाढल्यानंतर बाधितांची संख्या झपाट्याने वाढली त्यात मृत्यूदर आपोआप कमी होत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे़ अनेक रुग्ण हे विविध व्याधी असलेले होते़ त्यांना रुग्णालयात आणण्यास उशीर झाला, प्राथमिक स्तरावर निदान होणे अत्यावश्यक आहे़ रुग्ण वेळेवर डॉक्टरकडे आल्यास डॉक्टरलाही उपचार करून त्याचे प्राण वाचविता येतात, असा सूर वैद्यकीय महाविद्यलयातून उमटत आहे़ दुसरीकडे प्राथमिक स्तरावर रुग्णांची तपासणी होणे आवश्यक असल्याचा मुद्दा समोर आला आहे़ ज्या भागात रुग्ण आढळला आहे, केवळ त्याच भागात व स्वत:हून येणारे रुग्ण अशीच सध्या तपासणीची प्रक्रिया सुरू आहे़ ज्यांना अधिक धोका त्यांची तपासणी करून त्यांना सुरक्षित ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे असून ही मोहीम हाती घेणे गरजेचे असल्याचा सूरही उमटत आहे़मोठ्या महापालिकांध्ये कमी मृत्यूकल्याण डोंबिवली, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नवी मुंबई अशा मोठ्या महानगरांपेक्षा जळगावात मृत्यूची संख्या अधिक आहे़ त्यामानाने काही मोठ्या महानगरांमध्ये रुग्णांसंख्या ही अधिक असताना मृत्यू मात्र कमी आहेत़ त्यामानाने जळगावात होणारे मृत्यू हे अधिकच चिंताजनक आहेत़रुग्णसंख्येत मालेगाव, नागपूरला टाकले मागे...जिल्हाभरात रुग्णसंख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे़ गेल्या चारच दिवसात तब्बल २२८नवीन रुग्ण जिल्हाभरात आढळून आले आहेत़ यात चाचण्या वाढविण्यात आल्याने रुग्णसंख्या वाढत असून आधिच या बाधितांना क्वारंटाईन करण्यात आल्याने पुढील धोका टळल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे़ दुसरीकडे जळगावची रुग्ण संख्या ७५० पार गेल्याने जळगावने अगदी काहीच दिवसात नागपूर व मालेगाव या ‘हॉटस्पॉट सिटी’ला मागे टाकले आहे़ मालेगावात सद्यस्थितीत ७४८ रुग्ण असून तेथे ५८ मृत्यू आहेत तर नागपूरमध्ये ५७४ रुग्ण असून तेथे १० मृत्यू झाले आहेत.अनेक रुग्ण मृतावस्थेत आली, अनेकांना विविध व्याधी होत्या़ अनेक लोक अगदीच गंभीरावस्थेत दाखल झाले़ अशा स्थितीत कितीही सुविधा असल्या तरी डॉक्टरांच्या हाती काही नसते़ केवळ डॉक्टरांना दोष देणे चुकीचे आहे़ प्राथमिक स्तरावर निदान होणे आवश्यक आहे़ रुग्णांनी लवकर रुग्णालयात येणे गरजेचे आहे़ उपाययोजना आधीपासून सुरूच आहे़- डॉ़ भास्कर खैरे, अधिष्ठाता

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव