शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाच्या धर्तीवर झगमगणार जळगावचे रेल्वे स्टेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 10:59 IST

जळगाव, भुसावळ, चाळीसगाव रेल्वे स्थानकांचा समावेश ; २०२० पर्यंत प्रमुख स्थानकांचा होणार कायापालट

ठळक मुद्दे-डीआरएम आर.के.यादव

जळगाव : गेल्या वर्षभरापासून रेल्वे स्टेशनवर विविध विकासकामे सुरु असून, रेल्वे मंत्रालयाने आता विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे स्टेशनही उजाळण्यासाठी एलईडी दिवे लावण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्री पियुष गोएल यांनी नुकतीच दिल्लीत देशभरातील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीत ही घोषणा केली. देशभरातील ५०० रेल्वे स्टेशन एलईडी दिव्यांनी उजळण्याचे जाहीर केले असून, यामध्ये मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळ , जळगाव, चाळीसगावसह अन्य सहा रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आल्याची माहिती भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी ‘लोकमत’ ला दिली.रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्व महत्वाच्या रेल्वे स्टेशनचा २०२० पर्यंत कायापालट करण्याचे ठरवले असून, त्यानुसार मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात येणाऱ्या भुसावळसह जळगाव, मनमाड, नाशिक या रेल्वे स्टेशनवर वर्षभरापासून विविध विकासकामे युद्ध पातळीवर सुरु आहेत.देशभरातील महत्वाच्या रेल्वे स्टेशनवरील पायाभूत सुविधांचा विकास झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने आता या स्टेशनचा विविध अंगानी कायापालट करण्याचे ठरवले आहे. त्या करिता रेल्वे मंत्री पियुष गोएल यांनी ८ मार्च रोजी दिल्लीत रेल्वेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत रेल्वे मंत्र्यांनी अधिकाºयांकडून त्यांच्या विभागातील स्टेशनच्या विकासासंदर्भात माहिती जाणुन घेतली. या बैठकीला भुसावळ विभागाचे डीआरएम आर. के. यादव देखील उपस्थित होते.५०० रेल्वे स्टेशनमध्ये भुसावळ, जळगाव, शेगाव, वर्धा,अमरावती, खंडवा आणि चाळीसगाव रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. जळगाव स्टेशनवर रेल्वे पोलीस चौकीपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला, दर २५ मीटरच्या अंतरावर एलईडी दिव्याचा पोल बसविण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ््याजवळ लोखंडी प्रवेशद्वार तयार करुन, आकर्षक पद्धतीने या प्रवेशद्वार तसेच दादºयावर आणि रेल्वे स्टेशनच्या आतमध्येही ठिकठिकाणी हे दिवे लावण्यात येणार आहेत.तसेच इतर स्टेशनवरही याच पद्धतीने दिवे लावून, स्टेशनचा संपूर्ण परिसर उजळवण्यात येईल.रंगीबेरंगी लाईटींगची अधिकच शोभास्टेशनच्या बाहेर आणि आतमध्ये सर्व ठिकाणी एलईडी दिवे बसविण्यात आल्यानंतर स्टेशनच्या बाहेरील ईमारतीला आकर्षक रंगबेरंगी लाईटींग केली जाईल. ज्यामुळे दुरवरुनच स्टेशन भव्य आणि दिव्य दिसणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्टेशनच्या सौंदर्यात भर पडणार आहे.रेल्वे मंत्र्यांनी देशभरातील ५०० रेल्वे स्टेशनवर एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये भुसावळसह इतर सहा स्टेशनचा समावेश आहे. या एलईडी दिव्यांमुळे विजेचीदेखील बचत होणार असून, सुरक्षा आणि अपघाताच्या घटनांनादेखील आळा बसणार आहे. विमानतळाच्या धर्तीवर स्टेशनला एलईडी दिव्यांनी उजळणार असून, या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. -आर.के. यादव. डीआरएम, भुसावळ रेल्वे विभाग