शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

विमानतळाच्या धर्तीवर झगमगणार जळगावचे रेल्वे स्टेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 10:59 IST

जळगाव, भुसावळ, चाळीसगाव रेल्वे स्थानकांचा समावेश ; २०२० पर्यंत प्रमुख स्थानकांचा होणार कायापालट

ठळक मुद्दे-डीआरएम आर.के.यादव

जळगाव : गेल्या वर्षभरापासून रेल्वे स्टेशनवर विविध विकासकामे सुरु असून, रेल्वे मंत्रालयाने आता विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे स्टेशनही उजाळण्यासाठी एलईडी दिवे लावण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्री पियुष गोएल यांनी नुकतीच दिल्लीत देशभरातील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीत ही घोषणा केली. देशभरातील ५०० रेल्वे स्टेशन एलईडी दिव्यांनी उजळण्याचे जाहीर केले असून, यामध्ये मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळ , जळगाव, चाळीसगावसह अन्य सहा रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आल्याची माहिती भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी ‘लोकमत’ ला दिली.रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्व महत्वाच्या रेल्वे स्टेशनचा २०२० पर्यंत कायापालट करण्याचे ठरवले असून, त्यानुसार मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात येणाऱ्या भुसावळसह जळगाव, मनमाड, नाशिक या रेल्वे स्टेशनवर वर्षभरापासून विविध विकासकामे युद्ध पातळीवर सुरु आहेत.देशभरातील महत्वाच्या रेल्वे स्टेशनवरील पायाभूत सुविधांचा विकास झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने आता या स्टेशनचा विविध अंगानी कायापालट करण्याचे ठरवले आहे. त्या करिता रेल्वे मंत्री पियुष गोएल यांनी ८ मार्च रोजी दिल्लीत रेल्वेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत रेल्वे मंत्र्यांनी अधिकाºयांकडून त्यांच्या विभागातील स्टेशनच्या विकासासंदर्भात माहिती जाणुन घेतली. या बैठकीला भुसावळ विभागाचे डीआरएम आर. के. यादव देखील उपस्थित होते.५०० रेल्वे स्टेशनमध्ये भुसावळ, जळगाव, शेगाव, वर्धा,अमरावती, खंडवा आणि चाळीसगाव रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. जळगाव स्टेशनवर रेल्वे पोलीस चौकीपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला, दर २५ मीटरच्या अंतरावर एलईडी दिव्याचा पोल बसविण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ््याजवळ लोखंडी प्रवेशद्वार तयार करुन, आकर्षक पद्धतीने या प्रवेशद्वार तसेच दादºयावर आणि रेल्वे स्टेशनच्या आतमध्येही ठिकठिकाणी हे दिवे लावण्यात येणार आहेत.तसेच इतर स्टेशनवरही याच पद्धतीने दिवे लावून, स्टेशनचा संपूर्ण परिसर उजळवण्यात येईल.रंगीबेरंगी लाईटींगची अधिकच शोभास्टेशनच्या बाहेर आणि आतमध्ये सर्व ठिकाणी एलईडी दिवे बसविण्यात आल्यानंतर स्टेशनच्या बाहेरील ईमारतीला आकर्षक रंगबेरंगी लाईटींग केली जाईल. ज्यामुळे दुरवरुनच स्टेशन भव्य आणि दिव्य दिसणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्टेशनच्या सौंदर्यात भर पडणार आहे.रेल्वे मंत्र्यांनी देशभरातील ५०० रेल्वे स्टेशनवर एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये भुसावळसह इतर सहा स्टेशनचा समावेश आहे. या एलईडी दिव्यांमुळे विजेचीदेखील बचत होणार असून, सुरक्षा आणि अपघाताच्या घटनांनादेखील आळा बसणार आहे. विमानतळाच्या धर्तीवर स्टेशनला एलईडी दिव्यांनी उजळणार असून, या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. -आर.के. यादव. डीआरएम, भुसावळ रेल्वे विभाग