शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

विमानतळाच्या धर्तीवर झगमगणार जळगावचे रेल्वे स्टेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 10:59 IST

जळगाव, भुसावळ, चाळीसगाव रेल्वे स्थानकांचा समावेश ; २०२० पर्यंत प्रमुख स्थानकांचा होणार कायापालट

ठळक मुद्दे-डीआरएम आर.के.यादव

जळगाव : गेल्या वर्षभरापासून रेल्वे स्टेशनवर विविध विकासकामे सुरु असून, रेल्वे मंत्रालयाने आता विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे स्टेशनही उजाळण्यासाठी एलईडी दिवे लावण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्री पियुष गोएल यांनी नुकतीच दिल्लीत देशभरातील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीत ही घोषणा केली. देशभरातील ५०० रेल्वे स्टेशन एलईडी दिव्यांनी उजळण्याचे जाहीर केले असून, यामध्ये मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळ , जळगाव, चाळीसगावसह अन्य सहा रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आल्याची माहिती भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी ‘लोकमत’ ला दिली.रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्व महत्वाच्या रेल्वे स्टेशनचा २०२० पर्यंत कायापालट करण्याचे ठरवले असून, त्यानुसार मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात येणाऱ्या भुसावळसह जळगाव, मनमाड, नाशिक या रेल्वे स्टेशनवर वर्षभरापासून विविध विकासकामे युद्ध पातळीवर सुरु आहेत.देशभरातील महत्वाच्या रेल्वे स्टेशनवरील पायाभूत सुविधांचा विकास झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने आता या स्टेशनचा विविध अंगानी कायापालट करण्याचे ठरवले आहे. त्या करिता रेल्वे मंत्री पियुष गोएल यांनी ८ मार्च रोजी दिल्लीत रेल्वेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत रेल्वे मंत्र्यांनी अधिकाºयांकडून त्यांच्या विभागातील स्टेशनच्या विकासासंदर्भात माहिती जाणुन घेतली. या बैठकीला भुसावळ विभागाचे डीआरएम आर. के. यादव देखील उपस्थित होते.५०० रेल्वे स्टेशनमध्ये भुसावळ, जळगाव, शेगाव, वर्धा,अमरावती, खंडवा आणि चाळीसगाव रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. जळगाव स्टेशनवर रेल्वे पोलीस चौकीपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला, दर २५ मीटरच्या अंतरावर एलईडी दिव्याचा पोल बसविण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ््याजवळ लोखंडी प्रवेशद्वार तयार करुन, आकर्षक पद्धतीने या प्रवेशद्वार तसेच दादºयावर आणि रेल्वे स्टेशनच्या आतमध्येही ठिकठिकाणी हे दिवे लावण्यात येणार आहेत.तसेच इतर स्टेशनवरही याच पद्धतीने दिवे लावून, स्टेशनचा संपूर्ण परिसर उजळवण्यात येईल.रंगीबेरंगी लाईटींगची अधिकच शोभास्टेशनच्या बाहेर आणि आतमध्ये सर्व ठिकाणी एलईडी दिवे बसविण्यात आल्यानंतर स्टेशनच्या बाहेरील ईमारतीला आकर्षक रंगबेरंगी लाईटींग केली जाईल. ज्यामुळे दुरवरुनच स्टेशन भव्य आणि दिव्य दिसणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्टेशनच्या सौंदर्यात भर पडणार आहे.रेल्वे मंत्र्यांनी देशभरातील ५०० रेल्वे स्टेशनवर एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये भुसावळसह इतर सहा स्टेशनचा समावेश आहे. या एलईडी दिव्यांमुळे विजेचीदेखील बचत होणार असून, सुरक्षा आणि अपघाताच्या घटनांनादेखील आळा बसणार आहे. विमानतळाच्या धर्तीवर स्टेशनला एलईडी दिव्यांनी उजळणार असून, या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. -आर.के. यादव. डीआरएम, भुसावळ रेल्वे विभाग