शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
3
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
4
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
5
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
6
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
7
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
8
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
9
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
10
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
11
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
12
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
13
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
14
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
15
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
16
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
17
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
18
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
19
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
20
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."

Jalgaon: ३८ दिवसांनंतर जलसाठ्यात केवळ ७ टक्क्यांनी वाढ! जिल्ह्यातील प्रकल्पात ४१.२० टक्के साठा

By विलास.बारी | Updated: August 19, 2023 22:48 IST

Jalgaon: गेल्या महिन्याभरात जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठा केवळ ७ टक्के इतकाच वाढला आहे. जिल्ह्यातील जलसाठ्याची टक्केवारी ४१.२० असून गेल्यावर्षी ७०.८० टक्के इतकी होती. त्यामुळे यंदा धरणातील जलसाठा शंभरी गाठणार नाही, असेच चित्र आजतरी दिसून येत आहे.

- विलास बारीजळगाव - गेल्या महिन्याभरात जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठा केवळ ७ टक्के इतकाच वाढला आहे. जिल्ह्यातील जलसाठ्याची टक्केवारी ४१.२० असून गेल्यावर्षी ७०.८० टक्के इतकी होती. त्यामुळे यंदा धरणातील जलसाठा शंभरी गाठणार नाही, असेच चित्र आजतरी दिसून येत आहे.

दि.११ जुलै रोजी हतनूर धरणात ३२.८२, गिरणेत १९.२८ तर वाघूरमध्ये ५६.४१ टक्के जलसाठा होता. दि.१७ ऑगस्ट रोजी हतनूर ३२.३९, गिरणा ३७.३४, वाघूर धरणात ५६.३० टक्के जलसाठा होता. याची एकूण टक्केवारी ४०.७० टक्के इतकी आहे. गेल्यावर्षी ही टक्केवारी ७०.८३ इतकी होती. त्यामुळे धरणांमधील जलसाठ्याची आकडेवारी पाहून अनेकांना चिंतेत टाकणारा आहे.

७ प्रकल्प ‘पन्नाशी’वरदि.१७ ऑगस्ट रोजीच्या नोंदीनुसार सुकी, अभोरा व मंगरुळ धरणात १०० टक्के साठा आहे. गूळ आणि मोर धरणही साठ टक्क्यांवर भरले आहे. गिरणा, अंजनी धरणात ५० टक्क्यांवर साठा आहे. अग्नावती, हिवरा धरणात मात्र शून्य टक्के जलसाठा आहे. भोकरबारी २.२६, बोरी ४.९२, बहुळा ९.१० टक्के इतका जलसाठा आहे.

टॅग्स :WaterपाणीJalgaonजळगाव