शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

Jalgaon: होत्याचे नव्हते झाले, पंधरा दिवसांपुर्वी पाहिलेल्या बळीराजाच्या स्वप्नांचा चुराडा, कृषी विभागाकडून पंचनामे सुरु

By ajay.patil | Updated: March 14, 2023 18:27 IST

Jalgaon : खरीपाच्या कटू आठवणी विसरून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरणी केली होती. अगदी पंधरादिवसांपर्यंत शेतातील डोलणारी पीकं पाहून बळीराजाने  खरीप हंगामाची कसर रब्बी हंगामात भरून निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

- अजय पाटील  जळगाव - खरीपाच्या कटू आठवणी विसरून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरणी केली होती. अगदी पंधरादिवसांपर्यंत शेतातील डोलणारी पीकं पाहून बळीराजाने  खरीप हंगामाची कसर रब्बी हंगामात भरून निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर मंगळवारी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या पावसामुळे होत्याचे नव्हते झाले असून, पंधरा दिवसांपुर्वी पाहिलेल्या स्वप्नांचा अक्षरश चुराळा झाला आहे.

मंगळवारी जिल्ह्यातील यावल, चोपडा, धरणगाव, जळगाव, अमळनेर या तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बीच्या गहू, हरभरा, मका व ज्वारीचे प्रचंड नुकसान झाले असल्याची माहिती समोर येत आहे. कृषी विभागाकडून अद्याप कोणताही आकडा समोर आला नसला तरी झालेल्या नुकसानीची आकडेवारी मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. कृषी विभागाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी यंदा उशीराने पेरणी केली होती, अशा शेतकऱ्यांचा माल अद्यापही शेतांमध्येच आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने पुन्हा शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.

संकट वाढणार, आगामी दोन गारपीटीचा अंदाजमंगळवारी जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये पाऊस झाला आहे. मात्र, सुदैवाने वारा नसल्यामुळे केळीचे नुकसान झाले नाही. दरम्यान, शेतकऱ्यांवरील संकट आणखीन दोन दिवस वाढणार आहे. कारण, भारतीय हवामान खात्याकडून आगामी दोन दिवस जिल्ह्यात  वादळी पावसासह आता गारपीटीचाही अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. जिल्ह्यात ज्वारी, दादर, बाजरी व मका मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढला जात असतो. त्यामुळे सध्यस्थितीत मका, दादर शेतातच आहे. एकीकडे दादरला चांगला भाव असताना गारपीटीचा अंदाज असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

मार्च महिना शेतकऱ्यांसाठी ठरतोय धोकेदायकगेल्या अनेक वर्षांपासून जागतिक हवामानात होत असलेल्या बदलामुळे जिल्ह्यातील वातावरणात देखील मोठा बदल होत आहे. गेल्या अनेक वर्षांचा अभ्यास पाहिला तर मार्च महिना हा शेतकऱ्यांसाठी धोकेदायक ठरत आहे. यंदा मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे ९ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीची लागवड जर नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली तर अवकाळीमुळे होणारे नुकसान टाळता येवू शकते.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव