शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

जळगाव मनपा निवडणूक : मतदान केंद्रांकडे जाणारी वाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 13:10 IST

मतदानाला जायचे कसे? - नागरिकांचा सवाल

ठळक मुद्देकुठे खड्डे, चिखल तर कुठे वाढले गवतखंडेराव नगरातील रस्त्याची दैना

जळगाव : पिंप्राळा हुडको, खंडेरावनगर, कांचननगर, वाल्मीकनगर, दिनकरनगर, प्रजापतनगर, पिंप्राळा गावठाण, शंकररावनगर, जुनाखेडी रोड या भागातील मतदान केंद्राकडे पायी चालण्यासाठीही रस्ता उरलेला नाही. रस्त्यांची संपूर्ण चाळण झाली असून, दगड-गोटे वर आल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे मतदारांनी मतदानासाठी जायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.१ आॅगस्ट रोजी मनपा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मतदारांना सोयीचे व्हावे. यासाठी ठरावीक अंतरावर असलेल्या शाळा, महाविद्यालयांमध्ये मतदान केंद्राची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर वयोवृद्ध, अपंगा बांधवांच्या सोयीसाठी रॅम्पदेखील उभारण्याचे काम सुरु झाले आहे. मात्र, मतदान केंद्राकडे जाण्याची वाट बिकट असल्याने, केंद्रावर जाण्यासाठी मतदारांना अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले.खंडेराव नगरातील रस्त्याची दैनाखंडेरावनगर, मयुरनगर,पिंप्राळा गावठाण या भागातील मतदारासांठी खंडेरावनगरातीलच लक्ष्मीबाई खंडू मंगळे या प्राथमिक शाळेत मतदान केंद्राची सोय करण्यात आली आहे. रस्त्याच्या बाजूलाच ही शाळा असल्याने, या ठिकाणी रॅम्पची आवश्यकता नाही. मात्र, या केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याचीच अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी तुंबले आहे. काही ठिकाणी तर रस्त्यामधील दगड-गोटे बाहेर येऊन इतरत्र पसरले आहेत. वाहनधारक या मोठ्या आकाराच्या दगड-गोट्यांना चुकवित मार्ग काढावा लागतो. मात्र, नजरचुकीने त्यावरुन वाहनाचे चाक गेल्यास वाहन घसरण्याची शक्यता आहे. रस्त्यावरील काही खड्ड्यांचा आकार अत्यंत मोठा असून, खड्डयांचा अंदाज येत नसल्याने, दोन दिवसांपूर्वी एका दुचाकीस्वाराची दुचाकी घसरुन अपघात झाल्याची घटना घडली.हुडकोतील मनपा शाळाया केंद्राच्या काही अंतरावर हुडकोतील नागरिकांसाठी तेथील मनपाच्या शाळेत मतदान केंद्राची सुविधा करण्यात आली आहे. मात्र, त्या ठिकाणच्या रस्त्यावरही काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. साईड पट्टयांची तर अत्यंत दुरवस्था झाली असून, या ठिकाणाहून वाहन गेल्यास, घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ठिकाणीदेखील काही ठिकाणी पाणी तुंबत असल्याने, वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान,या संदर्भात काही नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार करुनही रस्त्याची साधी डागडुजीही झाली नसल्याचे हुडकोतील अजय शिंदे यांनी सांगितले.नवीन प्राथमिक विद्यालयश्रीराम कॉलनी, दत्तनगर, के.सी.नगर,शंकररावनगर या भागातील मतदारांसाठी नवीन प्राथमिक विद्यालयात मतदानाची सोय करण्यात आली आहे. या केंद्राकडे येण्यासाठी मुख्य रस्ता वगळता, इतर रस्त्यांची मात्र मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. दत्तनगरातील गल्ली-बोळीतील रस्त्यांवर पाणी तुंबल्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणावर नवीन वस्ती तयार झाली आहे. परंतू, या नवीन वस्त्यांमध्ये पक्के रस्ते नसल्याने, दरवर्षी या ठिकाणी चार महिने मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. श्रीराम कॉलनीकडून असोदा रस्त्याकडे येणार रस्त्यावर, काळ््या मातीमुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने, नागरिकांना तो रस्ताच बंद करावा लागला.प्रजापतनगरात प्रचंड चिखलप्रभाग क्रमांक २ मधील मतदारासांठी प्रजापतनगरातील कुंभारवाडा समाज मंदिरामध्ये मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राकडे जाण्यासाठीही रस्त्यांची दैना झाली आहे. कुठल्याही ठिकाणी पक्के रस्ते नसल्याने, काळ््या मातीमुळे मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. यामुळे वाहन घसरुन, अपघात होण्याची शक्यता आहे. मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारासमोरच मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबते.कांचन नगरातील मतदान केंद्रकांचननगर, वाल्मीकनगर व दिनकरनगरातील मतदारासांठी येथील महर्षि वाल्मीक मंदिरासमोरील महापालिकेच्या शाळेत मतदान केंद्र आहे. असोदा रस्त्यालगतच ही शाळा असल्याने, रस्त्यालगतच्या रहिवाशांनी मतदानाला जाण्यासाठी सोयीस्कर रस्ता आहे. मात्र, वाल्मीक नगर, दिनकर नगरातील आतमध्ये घरे असणाºया मतदारांना मात्र मतदान केंद्रावर येण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. वाल्मीकनगरकडे जाणाºया रस्त्यावरच मोठे खड्डे पडल्याने, मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून चिखल झाला आहे. पाऊस सुरु असताना तर, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्याने वापरण्यासाठी वाट राहत नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. जर मतदानाच्या दिवशी पाऊस सुरु असला आणि नेहमीप्रमाणे या रस्त्यावर पाणी तुंबल्यावर, आम्ही मतदानाला कसे जाणार, असा प्रश्नही येथील रहिवाशांकडून उपस्थित होत आहे. प्रशासनाने खड्डे तरी बुजवावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.मतदान केंद्रासमोरच साचला तलाव४कांचननगरासह वाल्मीकनगर व दिनकरनगरातील मतदारासांठी येथील वाल्मीक मंंदिरासमोरील मनपाच्या शाळेत मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, मतदान केंद्राकडे येणाºया सर्व रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या केंद्राच्या प्रवेशद्वारावरच काळ््या मातीमुळे चिखल झाला असून, केंद्रात जाण्यासाठीही व्यवस्थित वाट नाही. तर केंद्राच्या समोरील मोकळ््या मैदानावरच मोठ्या प्रमाणावर गवत उगवले असून, पाऊस सुरु असताना मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत आहे. तसेच या ठिकाणी काडी-कचरा साचून दुर्गंधीदेखील निर्माण झाली आहे. जर मतदान केंद्रावर गर्दी झाली तर, मतदारांना उभे राहण्यासाठीही जागा राहणार नसल्याचे दिसून आले.तर प्रत्येकाकडून मिळते आहे रस्त्यांचे आश्वासनशहरातील काही मतदान केंद्रांची प्रातिनिधीक स्वरुपात ‘लोकमत’ प्रतिनिधीने पाहणी केली असता, काही ठिकाणी मतदारांना चालण्यासाठी पायवाटदेखील नसल्याचे दिसून आले. पावसामध्ये प्रचारासाठी येणाºया उमेदवारांकडे येथील नागरिक रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत तक्रार करित आहेत. यावर उमेदवारांकडून निवडून आल्यानंतर पहिल्यांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन देण्यात येत आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव