शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

जळगाव मनपा निवडणूक : विकासाच्या नावावर भ्रष्टाचार - दिलीप कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 13:14 IST

शासनाचा निधी सत्ताधाऱ्यांच्या घरात

ठळक मुद्देघरकुल, व्यापारी संकुल योजनेत गैरव्यवहारपावसाला सुरुवात आणि पटांगण खाली

जळगाव : शहराच्या विकासाचा आराखडा तयार करून विकास करणे अपेक्षित असताना महापालिकेतील सत्ताधाºयांनी विकासाच्या नावावर भष्ट्राचार केला. शासनाकडून आलेल्या निधीतून सत्ताधाºयांनी केवळ आपली घरे भरल्याचा आरोप सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री दिलीप कांबळे यांनी महाबळमधील जाहीर सभेत केला.गुरुवारी रात्री प्रभाग १२ मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर खासदार ए.टी.पाटील, सुरतच्या आमदार संगीता पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार उन्मेष पाटील, माजी महापौर ललित कोल्हे, जि.प.चे समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांच्यासह भाजपाचे उमेदवार उपस्थित होते.घरकुल, व्यापारी संकुल योजनेत गैरव्यवहारसत्ताधाºयांनी जळगाव शहराचा विकास आराखडा तयार करून विकास करणे गरजेचे होते. मात्र घरकुल योजना व व्यापारी संकुलाच्या कामातून केवळ भष्ट्राचार झाला. आलेल्या निधीतून सत्ताधाºयांनी केवळ आपले घरे भरण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला.आमदार उन्मेष पाटील यांनी व्यक्ती पाहून मतदान करण्यापेक्षा पक्ष पाहून मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. आमदार संगीता पाटील यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी भाजपाला संधी देण्याचे आवाहन केले. सुरत महानगरपालिकेचे ५ हजार ६०० कोटी रुपयांचे बजेट आहे. त्या तुलनेत जळगावातील रस्त्यांची मात्र दुरवस्था झाल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाला संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. खासदार ए.टी.पाटील यांनीही मार्गदर्शन केले.पावसाला सुरुवात आणि पटांगण खालीसुरतच्या आमदार संगीता पाटील यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर काही वेळेत पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे काही काळ गोंधळ होऊन खुर्च्या रिकामा झाल्या.दिलीप कांबळे यांची गणेश कॉलनी चौकातही सभा झाली.सत्ताधाºयांच्या आडमुठ्या धोरणाने निधी खर्च झाला नाहीआमदार सुरेश भोळे यांनी महापालिकेची जबाबदारी नेमकी काय? असा प्रश्न उपस्थित केला. सत्ताधारी केंद्र व राज्य सरकारच्या नावाने ओरडत असताना अमृत योजना, भुयारी गटार योजना व घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी कुणी दिला असे सांगितले. जळगाव शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी २५ कोटींचा निधी दिला. मात्र सत्ताधाºयांच्या आडमुठ्या धोरणामुळे हा निधी खर्च झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले.जळगाव हे मोठ खेड...कांबळे म्हणाले की, आमदारांनी शहरासाठी शासनाकडून निधी आणला तरीही तो निधी खर्च करण्यासाठी मनपाकडे जातो. त्याची नीट अंमलबजावणी झाली नाही, की निधी आणूनही विकास होत नाही. मनपाने शहर विकास आराखडा करून शासनाकडून निधी आणून विकास करायला हवा होता. मात्र जळगाव हे आज मोठ खेड असल्याचे जाणवते, अशी टीका त्यांनी केली.मनपाने दलित वस्तीचा निधी वळविल्याची होणार चौकशीशासनाने दलित वस्तीच्या विकासासाठी दिलेला निधी मनपाने अन्यत्र खर्च केला असून त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती दिलीप कांबळे यांनी दिली. सकाळी समतानगर परिसरात रॅलीला गेलो असताना त्या भागात रस्त्यांचा अभाव असल्याचे व चिखल असल्याचे, गटारी उघड्या असल्याचे दिसून आले. याबाबत महानगराध्यक्ष आमदार सुरेश भोळे व नागरिकांकडून माहिती घेतली असता दलित वस्ती सुधारणेसाठी राज्य शासनाकडून दिला जाणारा निधी रस्त्यासाठी न वापरता अन्यत्र वळविण्यात आला. वास्तविक दलित वस्तीचा निधी त्याच वस्तीच्या विकासासाठी वापरणे बंधनकारक आहे. एवढे वर्ष शासनाकडून हा निधी मिळत असतानाही या वस्त्यांमध्ये अशी बिकट परिस्थिती दिसून आली.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव