शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

जळगावात विद्येच्या मंदिरात मद्यपींची भरतेय शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 15:16 IST

शिक्षक, कर्मचाºयांना रोज फेकाव्या लागतात दारुच्या बाटल्या

ठळक मुद्दे३०-४० मद्यपी युवकांचा असतो घोळकाशिक्षण विभागाकडे केली अनेकदा तक्रार...सुरक्षा रक्षकाच्या नियुक्तीची आवश्यकता

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.७ : शहरातील शिवतिर्थ मैदान परिसरातील जिल्हा परिषदेच्या विद्यानिकेतन शाळेच्या आवारात रोज रात्री मद्यपींचा अड्डा भरत आहे. मद्यपींकडून शाळेच्या आवारातच दारुच्या बाटल्या फेकल्या जातात. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, शाळेतील शिक्षक व शिपायांना या दारुच्या बाटल्या रोज जमा करून फेकाव्या लागत आहेत. मात्र या प्रकाराकडे पोलीस प्रशासन व जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. यामुळे शिक्षक व पालकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.जिल्हा परिषदेच्या विद्यानिकेतन शाळेच्या परिसर अनेक दिवसांपासून रात्रीच्या वेळी ३० ते ४० मद्यपींचा खास अड्डा बनला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून या ठिकाणी दारुच्या पार्ट्या रंगत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच रात्रीच्या पार्ट्या संपल्यानंतर रोज सकाळी शाळेच्या आवारात दारुच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून येत आहे. त्यामुळे शाळेत येणाºया विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. अनेकदा मुख्य प्रवेशव्दाराजवळच या बाटल्या पडलेल्या असतात. विद्यानिकेतन शाळेसह पंचायत समिती व गट शिक्षणाधिकाºयांचा कार्यालयाच्या आवारात देखील या बाटल्या पडलेल्या असतात.३०-४० युवकांचा असतो घोळकारात्री ९ वाजेनंतर या ठिकाणी मद्यपींचा अड्डा सुरु होतो. मद्यपींमध्ये युवकांची मोठ्या प्रमाणात संख्या असून दररोज या ठिकाणी ३० ते ४० मद्यपींचा घोळका या ठिकाणी दररोज असतो. दरम्यान, रात्रीच्या वेळी पोलीसांच्या गस्ती पथकाकडून शहरात पाहणी होते. मात्र या ठिकाणी दररोज सुरु असलेल्या अड्याकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत आहे. बुधवारी शाळेतील शिक्षकांनी ‘लोकमत’ ला याबाबतची माहिती दिल्यानंतर, सकाळी १० वाजेच्या सुमारास शाळा सुरु होण्याअगोदर ‘लोकमत’च्या चमुने या ठिकाणी पाहणी केली असता, ठिक-ठिकाणी दारुच्या बाटल्या दिसल्या. शिवतिर्थ मैदानाला सुरक्षा भिंत तयार करण्यात आली असली, तरी जिल्हा ग्रामीण विकास केंद्राकडील दरवाजा उघडाच असतो.शिक्षण विभागाकडे केली अनेकदा तक्रार...गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरु असून याबाबत जि.प.विद्यानिकेतनच्या प्राचार्यांनी शिक्षण विभागाकडे याबाबत तक्रार देखील केली. त्यानंतर शिक्षण विभागाकडून या ठिकाणी रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली होती. मात्र काही महिन्यातच सुरक्षा रक्षक ाचे देखील येणे बंद झाले. यामुळे मद्यपींना या ठिकाणी मोकळे रान मिळाले आहे. दरम्यान, बुधवारी देखील विद्यानिकेतन शाळेचे प्राचार्य व शिक्षकांनी शिक्षणाधिकाºयांकडे या प्रकाराबाबत तक्रार दिली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावSchoolशाळा