शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

Jalgaon: शेती, माती आणि संस्कृतीचे पाईक कविवर्य ना.धो. महानोर अनंतात विलीन

By चुडामण.बोरसे | Updated: August 4, 2023 18:37 IST

Jalgaon: शेती, माती आणि संस्कृतीचे पाईक असलेले कविवर्य ना.धो. महानोर यांना आज शुक्रवारी  सायंकाळी साश्रु नयनांनी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला.

जळगाव - शेती, माती आणि संस्कृतीचे पाईक असलेले कविवर्य ना.धो. महानोर यांना आज शुक्रवारी  सायंकाळी साश्रु नयनांनी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. पळसखेड या मुळ गावी सायंकाळी ‘सुलोचना बाग’ या महानोरांच्या शेतात त्यांचे धाकटे चिरंजीव डॉ. बाळकृष्ण महानोर यांनी त्यांना मुखाग्नी दिला.  

अंत्यसंस्कारासाठी लाकडांऐवजी गोवऱ्या आणि चंदनाच्या फुलांचे हार यांचा उपयोग करण्यात आला. तीन वेळा हवेत फैरी झाडण्यात आल्या. त्यानंतर महानोर परिवाराच्या सदस्यांनी अंत्यसंस्काराचे सोपस्कार पूर्ण केले. सायंकाळी ५.१० वाजता कवी महानोर यांच्या पार्थिवावर अग्निडाग देण्यात आला. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, साहित्यिक रंगनाथ पठारे, सुमती लांडे, श्रीकांत देशमुख, माजी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, कवी दासू वैद्य, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील, पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, पुर्णिमा हुंडीवाले, अब्दुल नवाज राही, रंगकर्मी शंभु पाटील आदी उपस्थित होते.  

महानोर हे महाकवी आणि रानकवी होते. त्यांच्या शब्दांचाच रंग हिरवा होता. मोठ्या मनाच्या या माणसाने  पुन्हा परतून यावे, अशी भावना अरुणभाई गुजराथी यांनी व्यक्त केल्या.  श्रीकांत देशमुख यांनी म्हटले की, महानोर हे अजिंठा लेण्यांप्रमाणे एक लेणं होते. गाण्याचा चेहरा बदलणारे हे मराठी चित्रपटसृष्टीतील पहिलेच कवी होते.  रंगनाथ पठारे म्हणाले की, ‘महानोरांनी साहित्याला श्रीमंत केले. आणि त्यांचे देणं कधीही संपणार नाही.’  अंत्यसंस्कार सुरु असतांना ‘पीक करपलं, पक्षी दुर देशी गेला’ हे गीत वाजवण्यात येत होते.

टॅग्स :Jalgaonजळगावmarathiमराठी