शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon Election Results : जळगावकरांचा विकासाला कौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 20:35 IST

मनपाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच जळगावात कमळ बहरले

ठळक मुद्देकेंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भाजपाला कौलजलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली मनपाची निवडणूक

विकास पाटीलजळगाव : गेल्या १५ वर्षांपासून जळगावचा विकास खुंटला आहे. केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. जळगावचा विकास करायचा असेल तर आमच्या हाती सत्ता द्या, वर्षभरात विकास करुन दाखवितो, असे आवाहन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले अन् त्यास जळगावकरांनी भरभरुन प्रतिसाद दिलेला दिसतो.मनपाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच जळगावात कमळ बहरले आहे. १९८० साली भाजपाची स्थापना झाली. यानंतर १९८५ च्या जळगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला फक्त ४ जागांवर विजय मिळविला होता. त्यानंतरही भाजपाला पाहिजे तसे यश तत्कालीन नगरपालिकेत व त्यानंतर स्थापनझालेल्या मनपा निवडणुकीतही मिळाले नाही. २००३ मध्ये सर्वाधिक २७ जागांपर्यंत भाजपाने मजल मारली. एकदा लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून भाजपाचे डॉ.के.डी. पाटील विजयी झाले होते, एवढेच यश भाजपाला मिळाले होते.यावेळी मात्र भाजपाने सर्वच्या सर्व ७५ जागा स्वबळावर लढविल्या. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या ऐवजी पहिल्यांदाच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली मनपाची निवडणूक लढण्यात आली. त्यांनी कुणावरही टीका, आरोप न करता शांत व संयमीपणे प्रचार केला. जळगावकरांनी फक्त वर्षभर भाजपाला संधी द्यावी. जळगावचा रखडलेला विकास करुन दाखविणार. त्यासाठी राज्य शासनाकडून २०० कोटी आणणार. ज्या प्रमाणे जामनेरचा विकास केला, तसाच जळगावचा विकास करणार. मुख्यमंत्र्यांनी मला २०० कोटींच्या निधीचे आश्वासन दिले आहे, असा प्रचार केला. वर्षभरात विकास केला नाही तर आगामी विधानसभेत आपल्याकडे मते मागायला येणार नाही....असे जळगावकरांना आवाहन केले. त्या आवाहनाला जळगावकरांना मतदानाद्वारे दाद दिली असल्याचे दिसून येते.मनपाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच कुण्या एका पक्षाच्या हाती जळगावकरांनी सत्ता सोपविली आहे. ही सत्ता सोपविताना शिवसेनेचा जोरदार पराभव झाला आहे. गेल्या ३५ वर्षांपासून मनपावर असलेली माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची सत्ता संपुष्टात आली आहे. हुडकोचे कर्ज, दोन हजार गाळेधारकांचा सहा वर्षांपासून प्रलंबित असलेला गाळेकराराचा प्रश्न हे दोन विषय सरकारशी संबंधित आहेत. २०१३ च्या निवडणुकीतही हेच विषय होते. तरीही जळगावकरांनी सुरेशदादा जैन यांच्या आघाडीला निवडून दिले. मात्र हे प्रश्न मार्गी लागले नाहीत. सत्तेशिवाय पर्याय नसल्याने जळगावकरांनी केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भाजपाला कौल देणे पसंत केलेले दिसून येते.यानिवडणुकीतराष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस व सपाला भोपळाही फोडता आलेला नाही. एमआयएमने मात्र चमत्कार घडविला आहे. यापक्षाने एकूण सहा जागा लढविल्या, त्यापैकी ३ जागांवर यश मिळविले. खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी जळगावात सभा घेतली. मुस्लीम बांधवांच्या विकासासाठी उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद दिला आहे. एकूणच जळगावकरांनी विकासाला कौल दिलेला दिसून येतो.

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकJalgaonजळगाव