शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

Jalgaon Election Results : जळगावकरांचा विकासाला कौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 20:35 IST

मनपाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच जळगावात कमळ बहरले

ठळक मुद्देकेंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भाजपाला कौलजलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली मनपाची निवडणूक

विकास पाटीलजळगाव : गेल्या १५ वर्षांपासून जळगावचा विकास खुंटला आहे. केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. जळगावचा विकास करायचा असेल तर आमच्या हाती सत्ता द्या, वर्षभरात विकास करुन दाखवितो, असे आवाहन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले अन् त्यास जळगावकरांनी भरभरुन प्रतिसाद दिलेला दिसतो.मनपाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच जळगावात कमळ बहरले आहे. १९८० साली भाजपाची स्थापना झाली. यानंतर १९८५ च्या जळगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला फक्त ४ जागांवर विजय मिळविला होता. त्यानंतरही भाजपाला पाहिजे तसे यश तत्कालीन नगरपालिकेत व त्यानंतर स्थापनझालेल्या मनपा निवडणुकीतही मिळाले नाही. २००३ मध्ये सर्वाधिक २७ जागांपर्यंत भाजपाने मजल मारली. एकदा लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून भाजपाचे डॉ.के.डी. पाटील विजयी झाले होते, एवढेच यश भाजपाला मिळाले होते.यावेळी मात्र भाजपाने सर्वच्या सर्व ७५ जागा स्वबळावर लढविल्या. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या ऐवजी पहिल्यांदाच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली मनपाची निवडणूक लढण्यात आली. त्यांनी कुणावरही टीका, आरोप न करता शांत व संयमीपणे प्रचार केला. जळगावकरांनी फक्त वर्षभर भाजपाला संधी द्यावी. जळगावचा रखडलेला विकास करुन दाखविणार. त्यासाठी राज्य शासनाकडून २०० कोटी आणणार. ज्या प्रमाणे जामनेरचा विकास केला, तसाच जळगावचा विकास करणार. मुख्यमंत्र्यांनी मला २०० कोटींच्या निधीचे आश्वासन दिले आहे, असा प्रचार केला. वर्षभरात विकास केला नाही तर आगामी विधानसभेत आपल्याकडे मते मागायला येणार नाही....असे जळगावकरांना आवाहन केले. त्या आवाहनाला जळगावकरांना मतदानाद्वारे दाद दिली असल्याचे दिसून येते.मनपाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच कुण्या एका पक्षाच्या हाती जळगावकरांनी सत्ता सोपविली आहे. ही सत्ता सोपविताना शिवसेनेचा जोरदार पराभव झाला आहे. गेल्या ३५ वर्षांपासून मनपावर असलेली माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची सत्ता संपुष्टात आली आहे. हुडकोचे कर्ज, दोन हजार गाळेधारकांचा सहा वर्षांपासून प्रलंबित असलेला गाळेकराराचा प्रश्न हे दोन विषय सरकारशी संबंधित आहेत. २०१३ च्या निवडणुकीतही हेच विषय होते. तरीही जळगावकरांनी सुरेशदादा जैन यांच्या आघाडीला निवडून दिले. मात्र हे प्रश्न मार्गी लागले नाहीत. सत्तेशिवाय पर्याय नसल्याने जळगावकरांनी केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भाजपाला कौल देणे पसंत केलेले दिसून येते.यानिवडणुकीतराष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस व सपाला भोपळाही फोडता आलेला नाही. एमआयएमने मात्र चमत्कार घडविला आहे. यापक्षाने एकूण सहा जागा लढविल्या, त्यापैकी ३ जागांवर यश मिळविले. खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी जळगावात सभा घेतली. मुस्लीम बांधवांच्या विकासासाठी उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद दिला आहे. एकूणच जळगावकरांनी विकासाला कौल दिलेला दिसून येतो.

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकJalgaonजळगाव