शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

Jalgaon Election Results : जळगावकरांचा विकासाला कौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 20:35 IST

मनपाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच जळगावात कमळ बहरले

ठळक मुद्देकेंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भाजपाला कौलजलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली मनपाची निवडणूक

विकास पाटीलजळगाव : गेल्या १५ वर्षांपासून जळगावचा विकास खुंटला आहे. केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. जळगावचा विकास करायचा असेल तर आमच्या हाती सत्ता द्या, वर्षभरात विकास करुन दाखवितो, असे आवाहन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले अन् त्यास जळगावकरांनी भरभरुन प्रतिसाद दिलेला दिसतो.मनपाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच जळगावात कमळ बहरले आहे. १९८० साली भाजपाची स्थापना झाली. यानंतर १९८५ च्या जळगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला फक्त ४ जागांवर विजय मिळविला होता. त्यानंतरही भाजपाला पाहिजे तसे यश तत्कालीन नगरपालिकेत व त्यानंतर स्थापनझालेल्या मनपा निवडणुकीतही मिळाले नाही. २००३ मध्ये सर्वाधिक २७ जागांपर्यंत भाजपाने मजल मारली. एकदा लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून भाजपाचे डॉ.के.डी. पाटील विजयी झाले होते, एवढेच यश भाजपाला मिळाले होते.यावेळी मात्र भाजपाने सर्वच्या सर्व ७५ जागा स्वबळावर लढविल्या. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या ऐवजी पहिल्यांदाच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली मनपाची निवडणूक लढण्यात आली. त्यांनी कुणावरही टीका, आरोप न करता शांत व संयमीपणे प्रचार केला. जळगावकरांनी फक्त वर्षभर भाजपाला संधी द्यावी. जळगावचा रखडलेला विकास करुन दाखविणार. त्यासाठी राज्य शासनाकडून २०० कोटी आणणार. ज्या प्रमाणे जामनेरचा विकास केला, तसाच जळगावचा विकास करणार. मुख्यमंत्र्यांनी मला २०० कोटींच्या निधीचे आश्वासन दिले आहे, असा प्रचार केला. वर्षभरात विकास केला नाही तर आगामी विधानसभेत आपल्याकडे मते मागायला येणार नाही....असे जळगावकरांना आवाहन केले. त्या आवाहनाला जळगावकरांना मतदानाद्वारे दाद दिली असल्याचे दिसून येते.मनपाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच कुण्या एका पक्षाच्या हाती जळगावकरांनी सत्ता सोपविली आहे. ही सत्ता सोपविताना शिवसेनेचा जोरदार पराभव झाला आहे. गेल्या ३५ वर्षांपासून मनपावर असलेली माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची सत्ता संपुष्टात आली आहे. हुडकोचे कर्ज, दोन हजार गाळेधारकांचा सहा वर्षांपासून प्रलंबित असलेला गाळेकराराचा प्रश्न हे दोन विषय सरकारशी संबंधित आहेत. २०१३ च्या निवडणुकीतही हेच विषय होते. तरीही जळगावकरांनी सुरेशदादा जैन यांच्या आघाडीला निवडून दिले. मात्र हे प्रश्न मार्गी लागले नाहीत. सत्तेशिवाय पर्याय नसल्याने जळगावकरांनी केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भाजपाला कौल देणे पसंत केलेले दिसून येते.यानिवडणुकीतराष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस व सपाला भोपळाही फोडता आलेला नाही. एमआयएमने मात्र चमत्कार घडविला आहे. यापक्षाने एकूण सहा जागा लढविल्या, त्यापैकी ३ जागांवर यश मिळविले. खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी जळगावात सभा घेतली. मुस्लीम बांधवांच्या विकासासाठी उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद दिला आहे. एकूणच जळगावकरांनी विकासाला कौल दिलेला दिसून येतो.

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकJalgaonजळगाव