शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

Jalgaon Election Results : जळगावकरांचा विकासाला कौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 20:35 IST

मनपाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच जळगावात कमळ बहरले

ठळक मुद्देकेंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भाजपाला कौलजलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली मनपाची निवडणूक

विकास पाटीलजळगाव : गेल्या १५ वर्षांपासून जळगावचा विकास खुंटला आहे. केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. जळगावचा विकास करायचा असेल तर आमच्या हाती सत्ता द्या, वर्षभरात विकास करुन दाखवितो, असे आवाहन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले अन् त्यास जळगावकरांनी भरभरुन प्रतिसाद दिलेला दिसतो.मनपाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच जळगावात कमळ बहरले आहे. १९८० साली भाजपाची स्थापना झाली. यानंतर १९८५ च्या जळगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला फक्त ४ जागांवर विजय मिळविला होता. त्यानंतरही भाजपाला पाहिजे तसे यश तत्कालीन नगरपालिकेत व त्यानंतर स्थापनझालेल्या मनपा निवडणुकीतही मिळाले नाही. २००३ मध्ये सर्वाधिक २७ जागांपर्यंत भाजपाने मजल मारली. एकदा लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून भाजपाचे डॉ.के.डी. पाटील विजयी झाले होते, एवढेच यश भाजपाला मिळाले होते.यावेळी मात्र भाजपाने सर्वच्या सर्व ७५ जागा स्वबळावर लढविल्या. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या ऐवजी पहिल्यांदाच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली मनपाची निवडणूक लढण्यात आली. त्यांनी कुणावरही टीका, आरोप न करता शांत व संयमीपणे प्रचार केला. जळगावकरांनी फक्त वर्षभर भाजपाला संधी द्यावी. जळगावचा रखडलेला विकास करुन दाखविणार. त्यासाठी राज्य शासनाकडून २०० कोटी आणणार. ज्या प्रमाणे जामनेरचा विकास केला, तसाच जळगावचा विकास करणार. मुख्यमंत्र्यांनी मला २०० कोटींच्या निधीचे आश्वासन दिले आहे, असा प्रचार केला. वर्षभरात विकास केला नाही तर आगामी विधानसभेत आपल्याकडे मते मागायला येणार नाही....असे जळगावकरांना आवाहन केले. त्या आवाहनाला जळगावकरांना मतदानाद्वारे दाद दिली असल्याचे दिसून येते.मनपाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच कुण्या एका पक्षाच्या हाती जळगावकरांनी सत्ता सोपविली आहे. ही सत्ता सोपविताना शिवसेनेचा जोरदार पराभव झाला आहे. गेल्या ३५ वर्षांपासून मनपावर असलेली माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची सत्ता संपुष्टात आली आहे. हुडकोचे कर्ज, दोन हजार गाळेधारकांचा सहा वर्षांपासून प्रलंबित असलेला गाळेकराराचा प्रश्न हे दोन विषय सरकारशी संबंधित आहेत. २०१३ च्या निवडणुकीतही हेच विषय होते. तरीही जळगावकरांनी सुरेशदादा जैन यांच्या आघाडीला निवडून दिले. मात्र हे प्रश्न मार्गी लागले नाहीत. सत्तेशिवाय पर्याय नसल्याने जळगावकरांनी केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भाजपाला कौल देणे पसंत केलेले दिसून येते.यानिवडणुकीतराष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस व सपाला भोपळाही फोडता आलेला नाही. एमआयएमने मात्र चमत्कार घडविला आहे. यापक्षाने एकूण सहा जागा लढविल्या, त्यापैकी ३ जागांवर यश मिळविले. खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी जळगावात सभा घेतली. मुस्लीम बांधवांच्या विकासासाठी उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद दिला आहे. एकूणच जळगावकरांनी विकासाला कौल दिलेला दिसून येतो.

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकJalgaonजळगाव