शहरं
Join us  
Trending Stories
1
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
2
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
3
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
5
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
7
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
8
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
9
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
10
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
11
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
12
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
13
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
14
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
15
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
16
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
17
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
20
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल

वादानंतरच्या ‘सेटींग’ ला जळगाव डिवायएसपींनी लावला चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 12:01 IST

गेल्या काही दिवसापासून शहरात दोन गटात वाद होऊन त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या घटना घडत आहेत. शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या वादातून सरकारी व खासगी मालमत्तांचे नुकसान, समाजाला वेठीस धरणे, पोलीस यंत्रणांची दमछाकही होते. इतके सारे झाल्यानंतर दोन्ही गटात तथाकथिक पुढा-याची एन्ट्री होऊन प्रकरणे आपसात मिटविण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी स्वत: पुढाकार घेऊन सरकारच्यावतीने पोलिसांनाच फिर्याद द्यायची पध्दत सुरु केली.

ठळक मुद्देपोलीसच होताहेत फिर्यादी दोन प्रकरणात दाखल झाले गुन्हे गुंडगिरीला आळा घालण्यासाठी निर्णय

सुनील पाटीलआॅनलाईन लोकमतजळगाव : गेल्या काही दिवसापासून शहरात दोन गटात वाद होऊन त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या घटना घडत आहेत. अनेक प्रकरणात प्राणघातक हल्ला झालेला आहे. शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या वादातून सरकारी व खासगी मालमत्तांचे नुकसान, समाजाला वेठीस धरणे, पोलीस यंत्रणांची दमछाकही होते. इतके सारे झाल्यानंतर दोन्ही गटात तथाकथिक पुढाºयाची एन्ट्री होऊन प्रकरणे आपसात मिटविण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी स्वत: पुढाकार घेऊन सरकारच्यावतीने पोलिसांनाच फिर्याद द्यायची पध्दत सुरु केली. दोन गटात तेढ असो की गुन्हेगारी कारवाया असो गुन्हा करुन नंतर माफी मागायची, त्यासाठी यंत्रणा व समाजाला वेठीस धरायचे ही पध्दतच समाजासाठी घातक आहे. पोलीस सरकारी फिर्यादी होऊ लागल्याने गुन्हा करणाºयांची हिंमतच होऊ नये, अशा प्रकारांना ब्रेक लागावा या हेतूने सांगळे यांनी घेतलेला निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे. न्यायालयीन तारखांना कर्मचाºयांना हजेरी लावावी लागणार असली तरी गुन्हेगारीच्या घटनांना नक्कीच यामुळे आळा बसेल. नुकतेच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन गटात हाणामारी झाली होती. या घटनेत शस्त्रही बाहेर निघाले होते. काही जण जखमी झाले होते. या प्रकरणात  पुढाºयांनी पुढाकार घेऊन जखमी तरुण व कुटुंबाची समजूत घालून पोलिसात तक्रार न देण्याबाबत राजी केले होते. दोन दिवस या प्रकरणात कोणीच फिर्याद दिली नाही. इतकी मोठी घटना व रात्रभर तणावाची स्थिती असताना फिर्याद द्यायला कोणीच पुढे न आल्याने सांगळे यांनी एका सहायक फौजदारलाच फिर्याद द्यायला लावले. बहुतांश प्रकरणात वरवर वाद आपसात मिटविले असले तरी त्यात फिर्याद न देण्यासाठी धमक्या देण्यात आल्याचे प्रकार उघडकीस झाले आहेत. पोलीस फिर्यादी होत असल्याने गुंडगिरीला नक्कीच आळा बसेल अशी आशा आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा