शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

वादानंतरच्या ‘सेटींग’ ला जळगाव डिवायएसपींनी लावला चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 12:01 IST

गेल्या काही दिवसापासून शहरात दोन गटात वाद होऊन त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या घटना घडत आहेत. शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या वादातून सरकारी व खासगी मालमत्तांचे नुकसान, समाजाला वेठीस धरणे, पोलीस यंत्रणांची दमछाकही होते. इतके सारे झाल्यानंतर दोन्ही गटात तथाकथिक पुढा-याची एन्ट्री होऊन प्रकरणे आपसात मिटविण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी स्वत: पुढाकार घेऊन सरकारच्यावतीने पोलिसांनाच फिर्याद द्यायची पध्दत सुरु केली.

ठळक मुद्देपोलीसच होताहेत फिर्यादी दोन प्रकरणात दाखल झाले गुन्हे गुंडगिरीला आळा घालण्यासाठी निर्णय

सुनील पाटीलआॅनलाईन लोकमतजळगाव : गेल्या काही दिवसापासून शहरात दोन गटात वाद होऊन त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या घटना घडत आहेत. अनेक प्रकरणात प्राणघातक हल्ला झालेला आहे. शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या वादातून सरकारी व खासगी मालमत्तांचे नुकसान, समाजाला वेठीस धरणे, पोलीस यंत्रणांची दमछाकही होते. इतके सारे झाल्यानंतर दोन्ही गटात तथाकथिक पुढाºयाची एन्ट्री होऊन प्रकरणे आपसात मिटविण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी स्वत: पुढाकार घेऊन सरकारच्यावतीने पोलिसांनाच फिर्याद द्यायची पध्दत सुरु केली. दोन गटात तेढ असो की गुन्हेगारी कारवाया असो गुन्हा करुन नंतर माफी मागायची, त्यासाठी यंत्रणा व समाजाला वेठीस धरायचे ही पध्दतच समाजासाठी घातक आहे. पोलीस सरकारी फिर्यादी होऊ लागल्याने गुन्हा करणाºयांची हिंमतच होऊ नये, अशा प्रकारांना ब्रेक लागावा या हेतूने सांगळे यांनी घेतलेला निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे. न्यायालयीन तारखांना कर्मचाºयांना हजेरी लावावी लागणार असली तरी गुन्हेगारीच्या घटनांना नक्कीच यामुळे आळा बसेल. नुकतेच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन गटात हाणामारी झाली होती. या घटनेत शस्त्रही बाहेर निघाले होते. काही जण जखमी झाले होते. या प्रकरणात  पुढाºयांनी पुढाकार घेऊन जखमी तरुण व कुटुंबाची समजूत घालून पोलिसात तक्रार न देण्याबाबत राजी केले होते. दोन दिवस या प्रकरणात कोणीच फिर्याद दिली नाही. इतकी मोठी घटना व रात्रभर तणावाची स्थिती असताना फिर्याद द्यायला कोणीच पुढे न आल्याने सांगळे यांनी एका सहायक फौजदारलाच फिर्याद द्यायला लावले. बहुतांश प्रकरणात वरवर वाद आपसात मिटविले असले तरी त्यात फिर्याद न देण्यासाठी धमक्या देण्यात आल्याचे प्रकार उघडकीस झाले आहेत. पोलीस फिर्यादी होत असल्याने गुंडगिरीला नक्कीच आळा बसेल अशी आशा आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा