शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

भारनियमनाच्या असह्य चटक्यांनी जळगावकर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 23:15 IST

परीक्षा, सणासुदीच्या काळातील संकटाने संताप

ठळक मुद्दे सर्व नऊ ग्रुपच्या फिडरवर भारनियमनदोन तासापासून ते साडेनऊ तास भारनियमन

ऑनलाईन लोकमत 

जळगाव, दि. 6 - पावसाचे कमी प्रमाण, वीज निर्मितीचे काही संच बंद पडल्याने वीज निर्मितीमध्ये घट येऊन भारनियमनाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातीलही सर्वच नऊ ग्रुपच्या फिडरवर  भारनियमन केले जात असून ऐन ‘ऑक्टोबर हिट’च्या तडाख्यात दोन तास ते साडे नऊ तासाच्या भारनियमनामुळे शहरवासीय होरपळून निघत आहे. विजेच्या पुरवठय़ापेक्षा मागणी वाढल्याने राज्यभर  भारनियमन करण्यात येत आह़े त्यानुसार शहरातही भारनियमन वाढले आहे.  अनेक संच बंद पडल्याने वीज निर्मितीवर मोठा परिणाम होऊन  भारनियमन कक्षाकडून  परिमंडळ कार्यालयांना कुठे व किती तास भारनियमन करावे, याबाबत आदेश देण्यात आले आहे.  

सर्व फिडरवर भारनियमनयापूर्वी शहरात ज्या ठिकाणी वीजचोरी जास्त आहे व वसुली कमी आहे, अशाच ठिकाणी आपत्कालीन भारनियमन केले जात असे. यामध्ये शहरातील फिडरचे नऊ ग्रुप तयार करण्यात आले आहे. यामध्ये ग्रुप ई, एफ, जी-1, जी-2 या ग्रुपवर हे भारनियमन होत असे. मात्र आता या ग्रुपसह कधीतरी भारनियमन होणा:या ए ते डी ग्रुपमधील फिडरवरदेखील भारनियमन केले जात आहे. 

नागरिक घामाघूमसध्या ऑक्टोबर हिटचा चांगलाच तडाखा जाणवत असून या उकाडय़ामुळे नागरिक हैराण आहेत. त्यात भरात भर म्हणजे भारनियमनामुळे घरात बसणे कठीण झाले आहे. यामध्ये लहान बालकांनाही जास्त त्रास होत आहे. दुपारी, संध्याकाळी होणा:या भारनियमनामुळे नागरिक घामाघू होत आहेत. 

परीक्षेच्या काळातील भारनियमनाने विद्याथ्र्यानाही फटकासध्या परीक्षेचा काळ असल्याने अनेक शाळांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत तर काहींच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत. ऐन परीक्षेच्या काळातील भारनियमनामुळे अभ्यासावर परिणाम होत असल्याने विद्यार्थी व पालकही चिंतीत झाले आहेत. 

सणासुदीत अंधाराने संतापऐन सणासुदीचा काळ जवळ येत असल्याने व भारनियमन वाढत असल्याने नागरिक संतप्त भावना व्यक्त करीत आहेत. सध्या सुरू असलेले भारनियमन ऐन प्रकाशपर्व, दिवाळीच्या दिवसातही सुरू राहण्याच्या शक्यतेने शहरवासीय चिंतीत झाले आहेत. 

रुग्णांना असह्य वेदनासध्या शहरात डेंग्यू व इतर आजाराचे रुग्ण असल्याने त्यांनाही याचा फटका बसत आहे. वाढता उकाडा व त्यात भारनियमनामुळे डेंग्यूचे रुग्ण तळमळत आहे. शहरातील रुग्णालयामध्येही हीच स्थिती असून जनरेटरवर जास्त भार शक्य होत नसल्याचे चित्र आहे. 

संपूर्ण शहरात भारनियमन यापूर्वी ई फिडरवरील शास्त्री टॉवर, भवानीपेठ, नवीपेठ, फुले मार्केट,  एफ फिडरवरील  संत मीराबाई नगर,  ज़ेडी़सी़सी बँक कॉलनी परिसर, जिल्हापेठ परिसर, सिंधी कॉलनी, सालार नगर, कासमवाडी,  बळीरामपेठ, रथचौक, सुभाष चौक, जिल्हा परिषद, शनिपेठ या भागात  भारनियमन  केले जात होते. मात्र आता सर्वच्या सर्व नऊ ग्रुपमधील फिडरवर भारनियमन केले जात आहे. 

नागरिकांनी दिले निवेदनवाढत्या भारनियमनाच्या पाश्र्वभूमीवर तसेच नागरिकांना होणा:या त्रासासंदर्भात शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला महानगराध्यक्षा प्रतिभा शिरसाठ, अशफाक पिंजारी, डॉ. सुषमा चौधरी, डॉ. शरीफ बागवान, फहीम पटेल, रऊ फ शेख, सैयद आबिद अली, वैशाली झाल्टे आदींनी महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय तडवी यांना निवेदन दिले व भारनियमन बंद करण्याची मागणी केली. 

औद्योगिक वसाहतीलाही झळऔद्योगिक वसाहत परिसरातही दररोज अचानक एक ते दीड तास वीज गायब होत आहे. येथे भारनियमन नसले तरी काहीही न कळविता वीज गेल्याने उत्पादनावर परिणाम होत आहे. डाळ उद्योगाचा विचार केला तर प्रक्रियेसाठी माल मशिनमध्ये टाकलेला असताना अचानक वीज गेल्यास तो अडकून राहतो व पुन्हा काढण्यास मोठा वेळ जातो. सोबतच कामगार, मजूर बसून राहत आहे.  एकूणच डाळ उत्पादनावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

असे आहे भारनियमन- ग्रुप ए -  तीन तास 15 मिनिटे- ग्रुप बी - चार तास- ग्रुप सी - चार तास 45 मिनिटे- ग्रुप डी - पाच तास 30 मिनिटे- ग्रुप ई - सहा तास 15 मिनिटे- ग्रुप एफ - सात तास- ग्रुप ई 1 - सात तास 45 मिनिटे- ग्रुप जी 1 - आठ तास 30 मिनिटे- ग्रुप जी 2 - नऊ तास 15 मिनिटे

हे सर्व भारनियमन दररोज सकाळी सहा ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत वेगवेगळ्य़ा वेळेनुसार दोन टप्प्यात केले जात आहे. 

वरिष्ठ पातळीवरील आदेशानुसार भारनियमन केले जात आहे. सध्या शहरातील नऊ ग्रुपवरील फिडरवर दोन तास ते साडेनऊ तास भारनियमन केले जात आहे.- संजय तडवी, कार्यकारी अभियंता, महावितरण.

अचानक एक ते दीड तास वीज जात असल्याने कामगार, मजूर बसून राहतात व काम ठप्प होऊन उत्पादनावर परिणाम होत आहे. - प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.