शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

जळगाव जिल्ह्यातील तीन तालुक्यात पावसाने ओलांडली सत्तरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 16:56 IST

जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पावसाची सरासरी ६०.४ टक्क्यांवर पोहोचली आहे.

ठळक मुद्देगिरणा, वाघूर धरणात होतेय आवकअद्यापही ३० गावांना २८ टँकरने पाणीपुरवठागिरणा नदी दुथडी भरून लागली वाहू

जळगाव: जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पावसाची सरासरी ६०.४ टक्क्यांवर पोहोचली आहे. जिल्ह्यातील ३ तालुक्यांमध्ये पावसाने टक्केवारीची सत्तरी ओलांडली आहे. मात्र अद्यापही काही भागांमध्ये समाधानकारक पाऊस नसल्याने ३० गावांना २८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच आहे. जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये अद्यापही समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही. मात्र गिरणा व वाघूर धरणात आता पाण्याची आवक सुरू झाल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दरम्यान पावसामुळे गिरणा नदीही दुथडी भरून वाहू लागली आहे.जिल्ह्यात यंदा जून महिन्याच्या सुरूवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र नंतर दडी मारली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे जिल्ह्याची पावसाची आजच्या तारखेची सरासरी गतवर्षीच्या ४८.८ टक्के सरासरी पेक्षा जास्त म्हणजे ६०.४ टक्क्यांवर पोहोचली आहे.जिल्ह्यातील तीन तालुक्यात पावसाच्या सरासरीने सत्तरी पार केली आहे. त्यात एरंडोल ७९ टक्के, धरणगाव ७८.५ टक्के, पारोळा ७३.८८ टक्के पाऊस झाला आहे. तर भुसावळ तालुक्यात सर्वात कमी ४९.१ टक्के पाऊस झाला आहे. जळगाव तालुक्यात ५७.७ टक्के पाऊस झाला आहे.

टॅग्स :riverनदीRainपाऊस