शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात १० तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 12:22 IST

केळी पिकाचे नुकसान

ठळक मुद्देवाघूर, हतनूरमध्ये आवक सुरूजोरदार पावसामुळे खरीप हंगामाला जीवदान

जळगाव : जळगाव जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दमदार पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यात १० तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून हतनूर धरणाचे ३६ दरवाजे पूर्ण उघडले आहेत.२९ जुलै पासून गायब झालेल्या पावसाचे तब्बल १८ दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात जोरदार पुनरागमन झाले. दरम्यानच्या काळात जळगाव शहरासह काही तालुक्यांमध्ये पावसाने तुरळक हजेरी लावली होती. मात्र आता जोरदार पाऊस आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या पावसामुळे नदी व नाले वाहू लागल्याने धरणसाठा वाढण्यास मदत होत आहे.तीन मोठ्या प्रकल्पांवर भिस्तजळगाव जिल्ह्याची भिस्त गिरणा, हतनूर व वाघूर या तीन मोठ्या धरणांवर अवलंबून असते.पाणीसाठा पुरेसा झाला नाही तर भीषण टंचाईला सामोरे जावे लागते.वाघूर, हतनूरमध्ये आवक सुरूगुरूवारी झालेल्या दमदार पावसाने वाघूर व हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. हतनूर धरणात पाणी येणे सुरू झाल्याने पाणीपातळी वाढत आहे. शुक्रवारी धरणाचे ३६ दरवाजे उघडण्यात आले.जोरदार पावसामुळे खरीप हंगामाला जीवदानगेल्या तीन आठवड्यांपाासून गायब झालेल्या वरुण राजाचे जोरदार पुनरागमण झाल्याने खरीप हंगामाला नवसंजिवणी मिळाली आहे. खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन या पिकांना गुरुवारी झालेल्या पावसामुळे जीवदान मिळाले असून, शेंगामध्ये दाणा तयार होण्याचा प्रक्रियेदरम्यानच वरुणराजाचे आगमण झाल्यामुळे या पिकांना फायदा होणार आहे. यासह कोरडवाहू कापसाच्या पिकाला देखील लाभ होणार आहे. २७ जुलैपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यातील ५ हजार हेक्टरवरील खरीप हंगाम धोक्यात आला होता.दरम्यान, जळगाव तालुक्यातील दापोरा परिसरात केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव