शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जळगाव जिल्ह्यात १० तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 12:22 IST

केळी पिकाचे नुकसान

ठळक मुद्देवाघूर, हतनूरमध्ये आवक सुरूजोरदार पावसामुळे खरीप हंगामाला जीवदान

जळगाव : जळगाव जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दमदार पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यात १० तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून हतनूर धरणाचे ३६ दरवाजे पूर्ण उघडले आहेत.२९ जुलै पासून गायब झालेल्या पावसाचे तब्बल १८ दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात जोरदार पुनरागमन झाले. दरम्यानच्या काळात जळगाव शहरासह काही तालुक्यांमध्ये पावसाने तुरळक हजेरी लावली होती. मात्र आता जोरदार पाऊस आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या पावसामुळे नदी व नाले वाहू लागल्याने धरणसाठा वाढण्यास मदत होत आहे.तीन मोठ्या प्रकल्पांवर भिस्तजळगाव जिल्ह्याची भिस्त गिरणा, हतनूर व वाघूर या तीन मोठ्या धरणांवर अवलंबून असते.पाणीसाठा पुरेसा झाला नाही तर भीषण टंचाईला सामोरे जावे लागते.वाघूर, हतनूरमध्ये आवक सुरूगुरूवारी झालेल्या दमदार पावसाने वाघूर व हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. हतनूर धरणात पाणी येणे सुरू झाल्याने पाणीपातळी वाढत आहे. शुक्रवारी धरणाचे ३६ दरवाजे उघडण्यात आले.जोरदार पावसामुळे खरीप हंगामाला जीवदानगेल्या तीन आठवड्यांपाासून गायब झालेल्या वरुण राजाचे जोरदार पुनरागमण झाल्याने खरीप हंगामाला नवसंजिवणी मिळाली आहे. खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन या पिकांना गुरुवारी झालेल्या पावसामुळे जीवदान मिळाले असून, शेंगामध्ये दाणा तयार होण्याचा प्रक्रियेदरम्यानच वरुणराजाचे आगमण झाल्यामुळे या पिकांना फायदा होणार आहे. यासह कोरडवाहू कापसाच्या पिकाला देखील लाभ होणार आहे. २७ जुलैपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यातील ५ हजार हेक्टरवरील खरीप हंगाम धोक्यात आला होता.दरम्यान, जळगाव तालुक्यातील दापोरा परिसरात केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव