शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

जळगाव जिल्ह्यात १० तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 12:22 IST

केळी पिकाचे नुकसान

ठळक मुद्देवाघूर, हतनूरमध्ये आवक सुरूजोरदार पावसामुळे खरीप हंगामाला जीवदान

जळगाव : जळगाव जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दमदार पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यात १० तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून हतनूर धरणाचे ३६ दरवाजे पूर्ण उघडले आहेत.२९ जुलै पासून गायब झालेल्या पावसाचे तब्बल १८ दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात जोरदार पुनरागमन झाले. दरम्यानच्या काळात जळगाव शहरासह काही तालुक्यांमध्ये पावसाने तुरळक हजेरी लावली होती. मात्र आता जोरदार पाऊस आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या पावसामुळे नदी व नाले वाहू लागल्याने धरणसाठा वाढण्यास मदत होत आहे.तीन मोठ्या प्रकल्पांवर भिस्तजळगाव जिल्ह्याची भिस्त गिरणा, हतनूर व वाघूर या तीन मोठ्या धरणांवर अवलंबून असते.पाणीसाठा पुरेसा झाला नाही तर भीषण टंचाईला सामोरे जावे लागते.वाघूर, हतनूरमध्ये आवक सुरूगुरूवारी झालेल्या दमदार पावसाने वाघूर व हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. हतनूर धरणात पाणी येणे सुरू झाल्याने पाणीपातळी वाढत आहे. शुक्रवारी धरणाचे ३६ दरवाजे उघडण्यात आले.जोरदार पावसामुळे खरीप हंगामाला जीवदानगेल्या तीन आठवड्यांपाासून गायब झालेल्या वरुण राजाचे जोरदार पुनरागमण झाल्याने खरीप हंगामाला नवसंजिवणी मिळाली आहे. खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन या पिकांना गुरुवारी झालेल्या पावसामुळे जीवदान मिळाले असून, शेंगामध्ये दाणा तयार होण्याचा प्रक्रियेदरम्यानच वरुणराजाचे आगमण झाल्यामुळे या पिकांना फायदा होणार आहे. यासह कोरडवाहू कापसाच्या पिकाला देखील लाभ होणार आहे. २७ जुलैपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यातील ५ हजार हेक्टरवरील खरीप हंगाम धोक्यात आला होता.दरम्यान, जळगाव तालुक्यातील दापोरा परिसरात केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव