शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

जळगाव जिल्ह्यात बारावीचा निकाल ३.५ टक्क्यांनी घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 14:02 IST

विलास बारी / आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. ५ : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला. जळगाव जिल्ह्याच्या गुणवत्तेत ३.५ टक्क्यांनी घट झाली असताना परीक्षेदरम्यान गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यांमध्ये जळगाव जिल्हा उत्तर महाराष्ट्रात पहिला ठरल्याने ही बाब शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने चिंताजनक ...

ठळक मुद्देबारावीच्या निकालात ग्रामीण भागाची आघाडीगैरमार्गात जळगावचे विद्यार्थी उत्तर महाराष्ट्रात अव्वलगेल्या वर्षाच्या तुलनेत ३.५ टक्के घट

विलास बारी / आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. ५ : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला. जळगाव जिल्ह्याच्या गुणवत्तेत ३.५ टक्क्यांनी घट झाली असताना परीक्षेदरम्यान गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यांमध्ये जळगाव जिल्हा उत्तर महाराष्ट्रात पहिला ठरल्याने ही बाब शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने चिंताजनक ठरत आहे.यंदा उत्तर महाराष्ट्रातील ९८७ महाविद्यालयातील १ लाख ६० हजार २८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील १ लाख ३८ हजार ५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.शिक्षण क्षेत्रात वेगाने बदल होत आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील स्पर्धा वाढत आहे. जळगाव जिल्ह्यातील कला, वाणिज्य, विज्ञान व किमान कौशल्य विभागाचा निकाल ८७.६२ टक्के लागला होता.यावर्षी त्यात घट होऊन जळगाव जिल्ह्याचा निकाल ८४.२० टक्के इतका राहिला. एकाच वर्षामध्ये तब्बल ३.४२ टक्के घट आढळून आली आहे.वाणिज्य वगळता सर्वच शाखांचा निकाल घटलाजळगाव जिल्ह्याचा संपूर्ण निकाल ८४.२० टक्के राहिला. त्यात विज्ञान शाखा ९५.३४, कला शाखा ७२.८९, वाणिज्य शाखा ९१.३४ तर किमान कौशल्य ७४.४९ टक्के राहिला. गेल्या वर्षी विज्ञान शाखा ९६.६८ टक्के, कला शाखा ७९.९२, वाणिज्य शाखा ९१.६४ तर किमान कौशल्य शाखा ७९.८६ टक्के निकाल होता. वाणिज्य शाखा वगळता अन्य सर्वच शाखांच्या निकालात यावर्षी घसरण झाली आहे.गुणपडताळणीला सुरुवातआॅनलाईन निकालानंतर गुरुवार ३१ पासून गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची सुविधा मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी मंडळाच्या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे. गुरुवार ३१ मे ते ९ जून पर्यंत हा अर्ज करता येणार आहे. तर छायाप्रतीसाठी १९ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच छायाप्रत मिळविल्यानंतर ५ दिवसात पुनर्मुल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.बारावीचा निकालाचा टक्का का घसरला याचा शोध घेवून उपाययोजना करणे आवश्यक आहे. कॉपी रोखण्यासाठीही उपायोजना आवश्यक आहे.१२ वीच्या निकालात यंदा ग्रामीण भागाने बाजी मारली आहे. कला, वाणिज्य व विज्ञान शाखांमध्ये जिल्ह्यातील ३१ शाळांचा निकाल हा १०० टक्के राहिला आहे. त्यातील ५ उच्च माध्यमिक विद्यालय वगळता बहुतांश शाळा या ग्रामीण भागातील आहेत. त्यात काही आश्रमशाळांचा देखील समावेश आहे.परीक्षे दरम्यान गैरमार्गाचा अवलंब करणाºयांमध्ये वाढइयत्ता १२ वीच्या परीक्षे दरम्यान कॉपी केल्याप्रकरणी २२४ विद्यार्थ्यांवर शास्तीचा प्रस्ताव मंडळाकडे प्राप्त झाला. त्यातील जळगाव जिल्ह्यातील १०९, धुळे जिल्ह्यातील ५३, नाशिक जिल्ह्यातील ३६, तर नंदुरबार जिल्ह्यातील ०८ विद्यार्थ्यांचा समावेश होता. मार्च २०१७ मध्ये १३१, मार्च २०१६ मध्ये ११९ व मार्च २०१५ मध्ये ७१ विद्यार्थ्यांवर शास्ती करण्यात आली होती. जळगाव जिल्ह्यात मार्च २०१५ मध्ये २४, मार्च २०१६ मध्ये ५१, मार्च २०१७ मध्ये २१ जणांवर कारवाई झाली होती. यावर्षी कारवाईत तब्बल पाच पट वाढ झाली आहे. गैरमार्गाचा अवलंब करणाºयांमध्ये जळगाव जिल्हा नाशिक, धुळे व नंदुबारच्या पुढे आहे.परीक्षे दरम्यान गैरमार्गाचा अवलंब करणाºयांवर कारवाईवर्ष प्राप्त प्रकरणे२०१८ २२४२०१७ १३१२०१६ १३२२०१५ ८६(प्राप्त प्रकरणांची संख्या नाशिक विभागाची आहे.)

टॅग्स :educationशैक्षणिकJalgaonजळगाव