शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

जळगाव जिल्ह्यात धरणांचे पाणी आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 12:56 IST

जिल्हाधिका-यांची परवानगी बंधनकारक

जळगाव : जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्पातील पाणी आरक्षण जाहीर करण्यात आले असून प्रत्येक धरणात शिल्लक साठा व त्याचे नियोजन करीत पाणी सोडावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित खात्यांना दिलेल्या आहेत.गिरणा धरणात २६ सप्टेंबर रोजी ८८८८ दलघफु पाणीसाठा होता. त्यापैकी ७२१४ दलघफु अर्थात ९५ टक्के पाणी आरक्षित केले आहे. मन्याड धरणात जिवंत साठा नसल्याने मृतसाठ्यावर आरक्षण दिले आहे. २७८.९७ दलघफु असलेला १८ टक्के साठा आरक्षित केला आहे. सोबतच बोरी ४६८.६४ दलघफु, हतनूर धरणात ९००५.३३ दलघफु पाणी साठा आहे. त्यापैकी औद्योगिक साठी १५८८.७६ दलघफू, सावादा, भुसावळ, रावेर, यावल, धरणगाव, अमळनेर, चोपडा या नगर परिषदसाठी २१२३.६२ दलघफू आरक्षित, ग्रामीणसाठी ३९८.५० असा एकूण ४११०.८८ दलघफू पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे. वाघूर धरणात ४१९१.३५ दलघफु पाणी साठा आहे. या पैकी १५९२.२५ दलघफू पाणीसाठा आरक्षित केला आहे. गुळ धरणात ६९३.१३ दलघफू पैकी ५२३.३५ दलघफू, बहुळा धरणात पाणी नाही. त्यावर पाचोरा नगर परिषदसह १७ गावे अवलंबून आहे. हिवरा धरणात ११६.८९ दलघफूपैकी १३.२४ दलघफू, तोंडापूर धरणात ८.४८ दलघफूपैकी ५.९३, अग्नावती धरणात ६६.७५ दलघफूपैकी ७.९४ दलघफू, सुकी धरणात १४०७.३० दलघफूपैकी ४५.१६ दलघफू, अंजनी धरणात ८२.०३ दलघफूपैकी ३७.५० दलघफू पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे भोकरबारी धरणात मात्र पाणीसाठाच नाही.प्रत्येक महिन्याच्या शेवटी धरणात किती साठा शिल्लक आहे त्याचे नियोजन करावे व त्यानुसार पाणी सोडावे अशा सूचना जिल्हाधिका-यांनी संबंधित खात्यांना दिलेल्या आहेत.जिल्हाधिका-यांची परवानगी बंधनकारकजिल्ह्यात सध्या दुष्काळाची भीषण स्थिती असून १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. भविष्यातील टंचाई लक्षात प्रकल्प व धरणातील पाणी सोडण्यापूर्वी जिल्हाधिकाºयांची परवानगी बंधनकारक असून कुठल्याही परिस्थितीत पिण्याचे पाणी सिंचनासाठी देता येणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :WaterपाणीJalgaonजळगाव